शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘नको तो डामडौल, नको तो मॉल-राहूया स्मॉल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 13:00 IST

खेड्यातून शहरात आलेला आता घाबरलेला अन् गोंधळलेला माणूस म्हणतोय ‘गड्या आपुला गाव बरा.’

कोरोनाने जगभर हाहाकार माजवला असून मानवजातीच्या मानगुटीवर बसलेलं हे भूत काही केल्या उतरायला तयार नाही. शासन, प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करतंय, परंतु कोरोनाचा फैलाव रोखण्यात त्यांना यश येताना दिसत नाही. शहरातील माणसं सैरभैर झाली आहेत. परदेशातून विमानातून आलेला व्ही. आय. पी. कोरोना हळूहळू खेड्यातील बैलगाडीपर्यंत पोहोचतोय.  

कॉर्पोरेट जगतामुळे सामान्यांपासून अतिसामान्य आणि सधन असणाºया सर्वांनाच शहराचं तसं विलक्षण आकर्षण. दिल्ली, मुंबई, कोलकात्ता, चेन्नई, पुणे, नागपूर, औरंगाबादपासून ते सोलापूर शहरातील दाट लोकसंख्या त्याचंच कारण. दाट लोकसंख्येला राहायला जागा कमी पडायला लागली म्हणूनच शहरात जशा झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या तशा चाळीस मजल्यापर्यंतच्या गगनचुंबी इमारतीही उभ्या राहिल्या. या इमारतीत अन् झोपडपट्ट्यात कितीतरी माणसं राहतात. खुराड्यात कोंबड्या अन् गोठ्यात शेळ्या,मेंढ्या कोंडाव्यात तशी माणसांची गर्दी मोठमोठ्या शहरातून दिसून येतेय. 

ही गर्दी म्हणजे कोरोनाचं कुरण. जेवढी गर्दी जास्त तेवढी माणसं एकमेकांना भेटतात.कोरोना संसर्ग बाधित कोण हे कुणालाही माहिती असत नाही. शासकीय रुग्णालयात भरती केल्यानंतरच कळतं की ‘आमका अन् तमका’बाधित आहे. त्यानं चौकशीत तोंड उघडेपर्यंत संपर्कातील लोकांची भंबेरी उडते. कुठे आपण संपर्कात आलो की काय? अशी शंका मनात येते अन् झोप उडून जाते.      

  सोलापूरसारख्या स्मार्ट शहराच्या महापौर देखील संसर्ग बाधित झाल्याच्या बातम्या वाचल्यावर तर धडकी भरल्याशिवाय राहत नाही. राज्याचे विद्यमान मंत्री अन् माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेही सुरक्षित राहू शकत नाहीत ही मोठी खेदाची बाब आहे. ज्यांनी जनतेची काळजी घ्यायची तेच रुग्णालयात दाखल झाले तर सामान्य जणांनी जगायचं कुणाच्या भरवशावर.    

  शासकीय रुग्णालयात गंभीर संसर्ग बाधित रुग्णांना दाखल करून घेण्याची सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाची क्षमता संपली आहे. गोरगरीब गंभीर रुग्ण आला तर त्याला‘वरतीच’ दाखल होण्याशिवाय पर्याय उरणार नाही. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. औदुंबर मस्के हे टाहो फोडून सांगत आहेत. म्हणून ‘लोकमत’ म्हणतोय ‘परिस्थिती हाताबाहेर गेलीय, सोलापूरला वाचवा!’            

  सामान्यजनहो आवरा स्वत:ला, सावरा कुटुंबाला अन् मानवजातीला. डॉक्टरांनी फोडलेला आर्त टाहो काळीज पिळवटून टाकणारा आहे. शासकीय रुग्णालयात बेड रिकामे नाहीत तर खासगी रुग्णालयाची कवाडे बंद आहेत. शासनाने कारवाईचा बडगा उगारूनही गबरगंड अन् धनदांडगी रुग्णालये घाबरायला तयार नाहीत. सोलापूरच्या काही रुग्णालयातील ‘बनवाबनवी’ चालू असून शासनाच्या अन् जनतेच्या डोळ्यात धूळफेक टाकण्याचा प्रयत्न करताना ते दिसून येतात.

पुण्या, मुंबईची परिस्थिती तर विचारूच नका. सर्वच शहरात माणसांचा जीव कोंडून चाललाय, श्वास गुदमरायला लागलाय. म्हणून आज ओस पडणारी खेडी गजबजायला लागलीत. खेड्यापाड्यात  नोकरी करणारा चाकरमानी शहरात अन्  तालुक्याच्या ठिकाणी जाऊन राहायचा. आज तोही खेड्याला पसंती देतोय. त्यामुळे खेडी निश्चितच स्वावलंबी होतील. खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी गांधीजीनीही सांगून ठेवलंय ‘खेड्याकडे  चला’. जातीपातीला मूठमाती द्यायची असेल तर शहराकडे चला असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. कोरोनाने धास्तावलेले सामान्यजण आज म्हणायला  लागलेत नको ते शहराचं आकर्षण, नको ते कॉर्पोरेट जग. ‘नको तो डामडौल, नको तो मॉल-राहूया स्मॉल’. म्हणूनच खेड्यातून शहरात आलेला आता घाबरलेला अन् गोंधळलेला माणूस म्हणतोय ‘गड्या आपुला गाव बरा.’- अण्णासाहेब भालशंकर(लेखक शिक्षण अन् सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या