शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सोलापुरात आगीमुळे एका वर्षात चौदा कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 11:16 IST

अग्निशमन दिनी हुतात्म्यांचे स्मरण; ३९२ आगी विझवल्या; एक कोटीवर किमतीची मालमत्ता वाचवली

ठळक मुद्देमहापालिका हद्दीबाहेर ११ आगी विझवण्यात आल्या आहेत, ६ अपघात मदतकार्य केले१ कोटी २६ हजार रुपये किमतीची मालमत्ताा वाचवण्यात यश आले२ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातर्फे वर्षभरात शहर व जिल्ह्यातील ३९२ आगी विझवण्यात आल्या आहेत. दरम्यानच्या काळात १३ कोटी ८१ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र एक कोटी ३१ लाख ५० हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. आजच्या अग्निशमन दिनी आग विझविताना शहीद झालेल्या अधिकारी व जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दल हे नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करीत २४ तास विनामूल्य सेवा उपलब्ध आहे. शहरात एकूण पाच ठिकाणी अग्निशमन केंद्रे आहेत. सध्या दलाकडे सर्व मिळून ९ गाड्या असून त्यापैकी एका अपघाताच्या वेळी त्वरित मदत करण्यासाठी एक स्पेशल अ­ॅडव्हान्स रेस्क्यू टेंडर गाडी आहे. अरूंद रस्ते व लहान गल्लीबोळमधील आग विझवण्याकामी एक मिनी फायटर वाहन, दोन फोम टेंडर फायटर गाड्या उपलब्ध आहेत. 

फोम टेंडर फायटर वाहनाचा उपयोग विमानतळ बंदोबस्त अथवा केमिकलच्या आगीवर अत्यंत उपयुक्त आहे. महापालिका हद्दीत आग विझवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. शहरातील जनतेसाठी आग, अपघात आणि आणीबाणीप्रसंगी २४ तास विनामूल्य सेवा उपलब्ध आहे. महापालिका हद्दीत वर्षभरात ३ हजार ८१ आगी विझवण्यात आल्या आहेत. ४५ अपघात ठिकाणी मदतकार्य केले आहे. ११ कोटी ४२ हजार ७८ हजार ४५२ रुपये किमतीचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र ५ लाख ५० हजार रुपये किमतीची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे.

महापालिका हद्दीबाहेर ११ आगी विझवण्यात आल्या आहेत, ६ अपघात मदतकार्य केले आहे. २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र १ कोटी २६ हजार रुपये किमतीची मालमत्ताा वाचवण्यात यश आले आहे. 

हुतात्म्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो दिन...- दि. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत झालेल्या प्रचंड स्फोटामध्ये मोठी आग लागली होती. ही आग विझवताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ कर्मचाºयांना आपले प्राण गमवावे लागले होते. अग्निशमन अधिकारी/कर्मचारी यांच्या स्मरणार्थ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार अग्निशमन दिन साजरा केला जातो. 

आग ही आपोआप कधी लागत नाही, बºयाच वेळेला आपला निष्काळजीपणा व नियम न पाळल्याने लागत असते. आपला शत्रू समजून त्याच्यापासून स्वत:चे व मालमत्तेचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे काम आहे. - केदार आवटे, अधीक्षक, अग्निशमन दल. 

टॅग्स :Solapurसोलापूरfireआग