शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सोलापुरात आगीमुळे एका वर्षात चौदा कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 11:16 IST

अग्निशमन दिनी हुतात्म्यांचे स्मरण; ३९२ आगी विझवल्या; एक कोटीवर किमतीची मालमत्ता वाचवली

ठळक मुद्देमहापालिका हद्दीबाहेर ११ आगी विझवण्यात आल्या आहेत, ६ अपघात मदतकार्य केले१ कोटी २६ हजार रुपये किमतीची मालमत्ताा वाचवण्यात यश आले२ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातर्फे वर्षभरात शहर व जिल्ह्यातील ३९२ आगी विझवण्यात आल्या आहेत. दरम्यानच्या काळात १३ कोटी ८१ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र एक कोटी ३१ लाख ५० हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. आजच्या अग्निशमन दिनी आग विझविताना शहीद झालेल्या अधिकारी व जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दल हे नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करीत २४ तास विनामूल्य सेवा उपलब्ध आहे. शहरात एकूण पाच ठिकाणी अग्निशमन केंद्रे आहेत. सध्या दलाकडे सर्व मिळून ९ गाड्या असून त्यापैकी एका अपघाताच्या वेळी त्वरित मदत करण्यासाठी एक स्पेशल अ­ॅडव्हान्स रेस्क्यू टेंडर गाडी आहे. अरूंद रस्ते व लहान गल्लीबोळमधील आग विझवण्याकामी एक मिनी फायटर वाहन, दोन फोम टेंडर फायटर गाड्या उपलब्ध आहेत. 

फोम टेंडर फायटर वाहनाचा उपयोग विमानतळ बंदोबस्त अथवा केमिकलच्या आगीवर अत्यंत उपयुक्त आहे. महापालिका हद्दीत आग विझवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. शहरातील जनतेसाठी आग, अपघात आणि आणीबाणीप्रसंगी २४ तास विनामूल्य सेवा उपलब्ध आहे. महापालिका हद्दीत वर्षभरात ३ हजार ८१ आगी विझवण्यात आल्या आहेत. ४५ अपघात ठिकाणी मदतकार्य केले आहे. ११ कोटी ४२ हजार ७८ हजार ४५२ रुपये किमतीचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र ५ लाख ५० हजार रुपये किमतीची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे.

महापालिका हद्दीबाहेर ११ आगी विझवण्यात आल्या आहेत, ६ अपघात मदतकार्य केले आहे. २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र १ कोटी २६ हजार रुपये किमतीची मालमत्ताा वाचवण्यात यश आले आहे. 

हुतात्म्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो दिन...- दि. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत झालेल्या प्रचंड स्फोटामध्ये मोठी आग लागली होती. ही आग विझवताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ कर्मचाºयांना आपले प्राण गमवावे लागले होते. अग्निशमन अधिकारी/कर्मचारी यांच्या स्मरणार्थ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार अग्निशमन दिन साजरा केला जातो. 

आग ही आपोआप कधी लागत नाही, बºयाच वेळेला आपला निष्काळजीपणा व नियम न पाळल्याने लागत असते. आपला शत्रू समजून त्याच्यापासून स्वत:चे व मालमत्तेचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे काम आहे. - केदार आवटे, अधीक्षक, अग्निशमन दल. 

टॅग्स :Solapurसोलापूरfireआग