शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

सोलापुरात आगीमुळे एका वर्षात चौदा कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 11:16 IST

अग्निशमन दिनी हुतात्म्यांचे स्मरण; ३९२ आगी विझवल्या; एक कोटीवर किमतीची मालमत्ता वाचवली

ठळक मुद्देमहापालिका हद्दीबाहेर ११ आगी विझवण्यात आल्या आहेत, ६ अपघात मदतकार्य केले१ कोटी २६ हजार रुपये किमतीची मालमत्ताा वाचवण्यात यश आले२ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातर्फे वर्षभरात शहर व जिल्ह्यातील ३९२ आगी विझवण्यात आल्या आहेत. दरम्यानच्या काळात १३ कोटी ८१ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र एक कोटी ३१ लाख ५० हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. आजच्या अग्निशमन दिनी आग विझविताना शहीद झालेल्या अधिकारी व जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दल हे नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करीत २४ तास विनामूल्य सेवा उपलब्ध आहे. शहरात एकूण पाच ठिकाणी अग्निशमन केंद्रे आहेत. सध्या दलाकडे सर्व मिळून ९ गाड्या असून त्यापैकी एका अपघाताच्या वेळी त्वरित मदत करण्यासाठी एक स्पेशल अ­ॅडव्हान्स रेस्क्यू टेंडर गाडी आहे. अरूंद रस्ते व लहान गल्लीबोळमधील आग विझवण्याकामी एक मिनी फायटर वाहन, दोन फोम टेंडर फायटर गाड्या उपलब्ध आहेत. 

फोम टेंडर फायटर वाहनाचा उपयोग विमानतळ बंदोबस्त अथवा केमिकलच्या आगीवर अत्यंत उपयुक्त आहे. महापालिका हद्दीत आग विझवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. शहरातील जनतेसाठी आग, अपघात आणि आणीबाणीप्रसंगी २४ तास विनामूल्य सेवा उपलब्ध आहे. महापालिका हद्दीत वर्षभरात ३ हजार ८१ आगी विझवण्यात आल्या आहेत. ४५ अपघात ठिकाणी मदतकार्य केले आहे. ११ कोटी ४२ हजार ७८ हजार ४५२ रुपये किमतीचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र ५ लाख ५० हजार रुपये किमतीची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे.

महापालिका हद्दीबाहेर ११ आगी विझवण्यात आल्या आहेत, ६ अपघात मदतकार्य केले आहे. २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र १ कोटी २६ हजार रुपये किमतीची मालमत्ताा वाचवण्यात यश आले आहे. 

हुतात्म्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो दिन...- दि. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत झालेल्या प्रचंड स्फोटामध्ये मोठी आग लागली होती. ही आग विझवताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ कर्मचाºयांना आपले प्राण गमवावे लागले होते. अग्निशमन अधिकारी/कर्मचारी यांच्या स्मरणार्थ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार अग्निशमन दिन साजरा केला जातो. 

आग ही आपोआप कधी लागत नाही, बºयाच वेळेला आपला निष्काळजीपणा व नियम न पाळल्याने लागत असते. आपला शत्रू समजून त्याच्यापासून स्वत:चे व मालमत्तेचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे काम आहे. - केदार आवटे, अधीक्षक, अग्निशमन दल. 

टॅग्स :Solapurसोलापूरfireआग