शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

चारवेळा लाभला कुर्डूवाडी जंक्शनला बाबासाहेबांचा पदस्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:20 IST

कुर्डूवाडी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९३७ ते १९४१च्या दरम्यान एकूण चार वेळा कुर्डूवाडी ...

कुर्डूवाडी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९३७ ते १९४१च्या दरम्यान एकूण चार वेळा कुर्डूवाडी रेल्वे जंक्शनमुळे शहराला वेगवेगळ्या कामानिमित्ताने भेटी दिल्या. त्यात एका भेटीदरम्यान तर त्यावेळच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने आमदारकी लढवत असलेल्या जिवाप्पा ऐंदाळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने याबरोबरच कुर्डूवाडीशिवाय माढा, मोडनिंब व बावी या गावालादेखील त्यांचा पदस्पर्श झालेला आहे. त्यांच्या आठवणी आजही ऊर्जा देणाऱ्या ठरतात असे मत इतिहास संशोधक प्रा. डॉ. आशिष रजपूत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

प्रा.डॉ आशिष रजपूत यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ३१ डिसेंबर १९३७ साली पंढरपूर येथील दलित परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भल्या पहाटे ५ वाजताच ऐन थंडीत कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. त्यावेळी माढा तालुक्यातील अनुयायांनी फलाट तिकिटाविना मोठी गर्दी रेल्वेस्थानकावर केली होती.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दंडाची रक्कम जमा करण्यास सांगितले. काही वेळाने बाबासाहेबांमुळे तो प्रसंग विनाकारवाईवर अनुयायी पैसे देऊ शकत नसल्याने कसाबसा टळला. २२ फेब्रुवारी १९४१ साली बार्शी तालुक्यातील तडवळे (कसबे) येथील महार मांग परिषदेस जाण्यासाठी ते कुर्डूवाडी जंक्शनवर आले. यावेळी नागरिकांनी बाबासाहेबांचा सत्कार केला. तेथील कार्यक्रम उरकून २३ फेब्रुवारी रोजी पुन्हा माघारी येत असताना बार्शीतील नगरपरिषदेच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या होस्टेलला मदत केली म्हणून त्यांनी तिथे जाऊन आभार मानले होते. त्यानंतर ते कुर्डूवाडीत पोहोचले. यावेळी येथील किसन सोनवणे व रेल्वे लाईट स्टाफच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुर्डूवाडीकरांनी १०१ रुपयांची देणगीदेखील दिली होती. त्यांनी येथील सर्वांचे आभार मानले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज सुधारणेच्या चळवळीत अठरापगड जातींच्या शिलेदारांनी योगदान दिले. त्यात माढा तालुक्यातील चार जणांचा समावेश होतो. तेही आज हयात नाहीत. त्यात सोपान गंगाराम पोळ (कुर्डूवाडी), ठाकूजी सावळा जानराव गुरुजी(माढा), शिवमूर्ती मारुती रजपूत (रेल्वे कर्मचारी, कुर्डूवाडी), दलितमित्र केरुजी लंकेश्वर (माढा) यांचा प्रामुख्याने समावेश होतो. हे चौघे डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या अगदी जवळचे मानले जायचे. डॉक्टरांचा दौरा कुर्डूवाडीकडे निश्चित झाला की, या चौघांना स्वतः बाबासाहेब पहिल्यांदा कळवायचे. मग ते त्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय नियोजित करीत असत. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यावेळी येथील संबंधित चौघे दुपारीच रेल्वेने मुंबईला अंत्यसंस्कारासाठी गेले होते. त्यावेळी ठाकूजी जानराव व शिवमूर्ती रजपूत यांनी त्यांच्या अस्थी सोबत आणल्या होत्या. त्या आजतागायत त्यांच्या घरात डबाबंद स्थितीत जतन करून ठेवल्या आहेत.

....

कुर्डूवाडीत स्मारकासाठी पाठपुरावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कुर्डूवाडी नगरीत त्यांच्या इतिहासाचे वर्णन केलेली कोनशीला किंवा मोठे सुसज्ज असे स्मारक रेल्वेस्थानकावर बसविण्यात यावे म्हणून येथील प्रा.डॉ आशिष रजपूत हे रेल्वेच्या वरिष्ठांकडे सध्या पाठपुरावा करत आहेत. त्यास रेल्वेच्या वरिष्ठांनीही सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे.

--

बाबासाहेबांनी माढा न्यायालयात जमिनीचा दावा लढला

डॉ.बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई या आजारी पडल्यानंतर काही दिवसांसाठी हवा पालटासाठी माढा तालुक्यातल्या बावी गावी आल्या होत्या. त्यावेळी बाबासाहेबांनी तिथेही भेट दिलेली होती. त्याचबरोबर येथील मोडनिंब या गावातील कोठारी बंधूंच्या जमिनीच्या वादसंदर्भात माढा कोर्टात स्वतः हजर राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक केस लढलेली आहे. त्यामुळे या सर्व ऐतिहासिक बाबीवरून माढा, मोडनिंब व बावी,कुर्डूवाडी या गावांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेम दिसून येत असल्याचे मत प्रा. डॉ. रजपूत यांनी सांगितले.