शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे पंढरपूरला पुराचा फटका, नदीकाठी राहणाºया लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 12:00 IST

पावसाचा हाहाकार; सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून जीव रक्षक, एनडीआरएफची टीम तैनात 

ठळक मुद्देव्यास नारायण, अंबाबाई पटांगण,लखुबाई, आंबेडकर नगर झोपडपट्टी आदी भागातील जवळपास ५०० कुटुंबांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केलीउजनी धरण आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहेशहरातील काही भागात दुपार पर्यंत पुराचे पाणी जाण्याची शक्यता आहे

सोलापूर : सततच्या पावासामुळे ओढे,नाले भरून वाहिले. त्यातच उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, याचा परिणाम पंढरपूर शहर आणि नदीकाठच्या गावांवर झाला आहे़ अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती ओढावली आहे. शहरातील नदीकाठच्या जवळपास ८०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे़ ग्रामीण भागात देखील नागरिकांना स्थलांतरीत केले आहे.

पंढरपूरकडे येणारे सातारा, पुणे सोलापूर, मंगळवेढा या ठिकाणची वाहतूक बंद केली तर काही ठिकाणी वळविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. दरम्यान,चंद्रभागा नदीत येणारा पाण्याचा विसर्ग पाहता दुपार पर्यंत शहरातील अनेक भागात पुराचे पाणी जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. पंढरपूरला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. बुधवारी कुंभार घाटावरील भिंत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला होता. या सततच्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. पंढरपूर परिसरातील ओढे, नाले भरून वाहू लागले ते पाणी चंद्रभागा नादित जाऊन मिसळले. त्यात भर म्हणून उजनी आणि वीर धरणाचे पाणी मिसळून नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

व्यास नारायण, अंबाबाई पटांगण,लखुबाई, आंबेडकर नगर झोपडपट्टी आदी भागातील जवळपास ५०० कुटुंबांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केली. आज सकळी अजून ३०० असे एकूण ८०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. उजनी धरण आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे शहरातील काही भागात दुपार पर्यंत पुराचे पाणी जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जीव रक्षक, एनडीआरएफची टीम तैनात केली आहे.

नागरिकाना सतर्कतेचा इशार दिला आहे. तर दुसरीकडे पंढरपूर ते सातारा,पुणे,सोलापूर,मंगळवेढा याठीकाणचे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवली आहे. काही ठिकाणी पयार्यी मागार्ने वाहतूक सुरु केली आहे .एकंदरीत एकीकडे करोनाचे संकट असताना आता दुसरीकडे पुराचा फटका तालुक्याला बसला आहे. तर या अतिवृष्टीचा फटका बळीराजाला देखील बसला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरRainपाऊसfloodपूर