शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

पंढरीत अगरबत्तीमुळे दरवळतोय पाच पिढ्यांपासूनचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:34 IST

तयारी आषाढीची...भक्ती सोहळ्याची; मालक-कामगार यांच्यातील ऋणानुबंध, ताटे-देशमुखांनी जपली नाती

ठळक मुद्देवर्तमानकाळात मशीनद्वारेही अगरबत्ती बनविल्या जातातआता पाचव्या पिढीतील त्यांची सून मनीषा चव्हाण याही अगरबत्तीच बनवित आहेत केवळ अगरबत्तीमध्येच सध्या पाचवी पिढी कार्यरत

पंढरपूर : मालक आणि कामगारांचे व्यावहारिक संबंध हे अल्पकालीन असू शकतात. मात्र, पंढरपुरात मालक-कामगारांमधील ऋणानुबंध यास अपवाद आहे, याचे कारण एकच ते म्हणजे ‘अगरबत्ती’ होय़ या अगरबत्तीमुळेच एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पाच पिढ्यांचे मालक अन् कामगारांचे ऋणानुबंध पाहावयास मिळतात.

एखादा व्यवसाय किती पिढ्या करायचा यालाही मर्यादा येतात़ मात्र, ताटे-देशमुख यांची पुढील पिढी त्याला अपवाद ठरली. केवळ अगरबत्तीमध्येच सध्या पाचवी पिढी कार्यरत आहे. सुमारे ३०० वर्षांपूर्वी तात्याबा कृष्णाजीराव ताटे-देशमुख हे पंढरपुरात कुंकू, बुक्का, अष्टगंध, धूप तयार करत असत. त्यांनी धूप व सुगंधी द्रव्ये वापरून अगरबत्ती बनविण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे पुत्र नारायण तात्याबा ताटे-देशमुख यांनी धूप, चंदन, तेल, गुलाब अशा निरनिराळ्या सुगंधी वस्तूंचा वापर करून नवा फॉर्म्युला बनविला आणि ताटे डेक्कन क्वीन अगरबत्ती नावारूपाला आणली. त्यानंतर त्याच नावाने त्यांचे पुत्र गणपत नारायण ताटे-देशमुख, त्यांचे पुत्र शिवाजी गणपत ताटे-देशमुख, संभाजी ताटे-देशमुख आणि आता त्यांचे पुत्र सागर शिवाजी ताटे-देशमुख व शुभम ताटे-देशमुख ही ताटे-देशमुख कुटुंबातील पाचवी पिढी सध्या हाच अगरबत्तीचा व्यवसाय करताना दिसते.

अगरबत्ती बनविणे ही एक हस्तकला आहे. त्यासाठी मशीनचा वापर करता येत नाही़ वर्तमानकाळात मशीनद्वारेही अगरबत्ती बनविल्या जातात़ ताटे-देशमुख यांनी हस्तकलेद्वारे बनविल्या जाणाºया अगरबत्तीलाच प्राधान्य दिले़ तात्याबा कृष्णाजीराव ताटे-देशमुख यांच्या कार्यकाळात रखमाबाई रामभाऊ सोमवंशी या हस्तकलेद्वारे अगरबत्ती बनवित होत्या़ त्यानंतर त्यांची मुलगी सोनाबाई हरिभाऊ सोमवंशी, त्यानंतर त्यांची मुलगी मीराबाई रामचंद्र चव्हाण, त्यांच्या तीन मुली रंजना दादासाहेब शिंदे (वाखरी), अलका पांडुरंग सपाटे (तारापूर), आशा अरुण रणदिवे (मगरवाडी) या अगरबत्ती बनविण्याचा व्यवसाय करीत आहेत. आता पाचव्या पिढीतील त्यांची सून मनीषा चव्हाण याही अगरबत्तीच बनवित आहेत.

मालक चांगला मिळाला, त्यांनी चांगली वागणूक देत कामगारांवर विश्वास दाखविला की, कामगारही कधी कामात खोटेपणा करीत नाहीत. ताटे-देशमुख मालक यांनी आम्हा कामगारांना कधी कामगाराप्रमाणे वागणूक दिलीच नाही तर आपल्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखी वागणूक दिली़ त्यामुळे आम्हालाही वाटते काम केल्यानंतर पैसे कोणही देतो, पण मालकांकडे माणुसकी असली पाहिजे़ ती आम्हाला या ठिकाणी दिसली म्हणूनच पिढ्यान्पिढ्या एकाच ठिकाणी काम करीत आहोत़- मीराबाई रामचंद्र चव्हाण, महिला कामगार

या कामगारांनी आम्हाला कधी मालक समजलेच नाही़ त्यामुळे आम्हीही त्यांना कधी कामगार म्हणून वागणूक दिली नाही तर आमच्या परिवारातील सदस्य आहेत, असे समजलो़ शिवाय त्यांच्या सुख-दु:खात आम्ही सहभागी असतो़ केवळ या कारणामुळे पाच पिढ्यांपर्यंतचा हा मालक-कामगारांमधील ऋणानुबंध टिकला आहे़- सागर ताटे-देशमुख,पाचव्या पिढीतील मालक

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा