शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पंढरीत अगरबत्तीमुळे दरवळतोय पाच पिढ्यांपासूनचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:34 IST

तयारी आषाढीची...भक्ती सोहळ्याची; मालक-कामगार यांच्यातील ऋणानुबंध, ताटे-देशमुखांनी जपली नाती

ठळक मुद्देवर्तमानकाळात मशीनद्वारेही अगरबत्ती बनविल्या जातातआता पाचव्या पिढीतील त्यांची सून मनीषा चव्हाण याही अगरबत्तीच बनवित आहेत केवळ अगरबत्तीमध्येच सध्या पाचवी पिढी कार्यरत

पंढरपूर : मालक आणि कामगारांचे व्यावहारिक संबंध हे अल्पकालीन असू शकतात. मात्र, पंढरपुरात मालक-कामगारांमधील ऋणानुबंध यास अपवाद आहे, याचे कारण एकच ते म्हणजे ‘अगरबत्ती’ होय़ या अगरबत्तीमुळेच एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पाच पिढ्यांचे मालक अन् कामगारांचे ऋणानुबंध पाहावयास मिळतात.

एखादा व्यवसाय किती पिढ्या करायचा यालाही मर्यादा येतात़ मात्र, ताटे-देशमुख यांची पुढील पिढी त्याला अपवाद ठरली. केवळ अगरबत्तीमध्येच सध्या पाचवी पिढी कार्यरत आहे. सुमारे ३०० वर्षांपूर्वी तात्याबा कृष्णाजीराव ताटे-देशमुख हे पंढरपुरात कुंकू, बुक्का, अष्टगंध, धूप तयार करत असत. त्यांनी धूप व सुगंधी द्रव्ये वापरून अगरबत्ती बनविण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे पुत्र नारायण तात्याबा ताटे-देशमुख यांनी धूप, चंदन, तेल, गुलाब अशा निरनिराळ्या सुगंधी वस्तूंचा वापर करून नवा फॉर्म्युला बनविला आणि ताटे डेक्कन क्वीन अगरबत्ती नावारूपाला आणली. त्यानंतर त्याच नावाने त्यांचे पुत्र गणपत नारायण ताटे-देशमुख, त्यांचे पुत्र शिवाजी गणपत ताटे-देशमुख, संभाजी ताटे-देशमुख आणि आता त्यांचे पुत्र सागर शिवाजी ताटे-देशमुख व शुभम ताटे-देशमुख ही ताटे-देशमुख कुटुंबातील पाचवी पिढी सध्या हाच अगरबत्तीचा व्यवसाय करताना दिसते.

अगरबत्ती बनविणे ही एक हस्तकला आहे. त्यासाठी मशीनचा वापर करता येत नाही़ वर्तमानकाळात मशीनद्वारेही अगरबत्ती बनविल्या जातात़ ताटे-देशमुख यांनी हस्तकलेद्वारे बनविल्या जाणाºया अगरबत्तीलाच प्राधान्य दिले़ तात्याबा कृष्णाजीराव ताटे-देशमुख यांच्या कार्यकाळात रखमाबाई रामभाऊ सोमवंशी या हस्तकलेद्वारे अगरबत्ती बनवित होत्या़ त्यानंतर त्यांची मुलगी सोनाबाई हरिभाऊ सोमवंशी, त्यानंतर त्यांची मुलगी मीराबाई रामचंद्र चव्हाण, त्यांच्या तीन मुली रंजना दादासाहेब शिंदे (वाखरी), अलका पांडुरंग सपाटे (तारापूर), आशा अरुण रणदिवे (मगरवाडी) या अगरबत्ती बनविण्याचा व्यवसाय करीत आहेत. आता पाचव्या पिढीतील त्यांची सून मनीषा चव्हाण याही अगरबत्तीच बनवित आहेत.

मालक चांगला मिळाला, त्यांनी चांगली वागणूक देत कामगारांवर विश्वास दाखविला की, कामगारही कधी कामात खोटेपणा करीत नाहीत. ताटे-देशमुख मालक यांनी आम्हा कामगारांना कधी कामगाराप्रमाणे वागणूक दिलीच नाही तर आपल्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखी वागणूक दिली़ त्यामुळे आम्हालाही वाटते काम केल्यानंतर पैसे कोणही देतो, पण मालकांकडे माणुसकी असली पाहिजे़ ती आम्हाला या ठिकाणी दिसली म्हणूनच पिढ्यान्पिढ्या एकाच ठिकाणी काम करीत आहोत़- मीराबाई रामचंद्र चव्हाण, महिला कामगार

या कामगारांनी आम्हाला कधी मालक समजलेच नाही़ त्यामुळे आम्हीही त्यांना कधी कामगार म्हणून वागणूक दिली नाही तर आमच्या परिवारातील सदस्य आहेत, असे समजलो़ शिवाय त्यांच्या सुख-दु:खात आम्ही सहभागी असतो़ केवळ या कारणामुळे पाच पिढ्यांपर्यंतचा हा मालक-कामगारांमधील ऋणानुबंध टिकला आहे़- सागर ताटे-देशमुख,पाचव्या पिढीतील मालक

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा