शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

तीन महिने जतन केलेल्या सापाच्या अंड्यातून पाच पिल्ले बाहेर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 11:32 IST

सर्पमित्रांनी शास्त्रीय पध्दतीने अंड्याला दिले अनुकूल वातावरण; नैसर्गिक आवासात सोडण्याचा घेतला निर्णय

ठळक मुद्देसापाच्या मोजक्या काही जाती सोडल्या तर त्यांना उबविण्याची गरज नसतेबाळे येथे सापडलेल्या सापाच्या अंड्यांना उबविण्याची गरज नव्हतीअंड्यांना बुरशी लागू नये, गरजेपुरती हवा मिळणे महत्त्वाचे होते

सोलापूर : तीन महिन्यांपूर्वी बाळे येथे तस्कर या बिनविषारी सापाची सात अंडे आढळली. सर्पमित्रांनी शास्त्रीय पद्धतीने या अंड्यांची तब्बल तीन महिने काळजी घेतली. त्यांच्या या कष्टाला यश आले असून, अंड्यांमधून आता पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सातपैकी पाच अंड्यांमधून पिल्ले बाहेर आली आहेत, अशी माहिती नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे पप्पू जमादार यांनी दिली.

बाळे येथील खडक गल्लीमध्ये १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ३:३० वाजता एक तस्कर जातीचा साप जाताना तेथील रहिवासी कासीम पठाण यांना दिसला. त्यांनी याची माहिती संतोष धाकपाडे यांना दिली. काही वेळातच धाकपाडे तेथे पोहोचले. त्यांनी एका कपाटाखाली लपलेल्या सापाला पकडून बरणीमध्ये बंद केले. काही वेळानंतर त्या सापाला सोडण्यासाठी म्हणून बरणी उघडली. त्यावेळी त्या मादी सापाने बरणीत चक्क सात अंडी घातली होती.  अंडी ठेवण्यासाठी सुरक्षित जागा शोधत असताना तेथील लोकांनी त्या सापाला पाहिले होते. यानंतर सर्पमित्रांनी सापाला नैसर्गिक आवासात सोडून दिले. 

फक्त सापांच्या काही जाती अशा आहेत की जी अंडी दिल्यानंतर त्यातून पिल्लं बाहेर येईपर्यंत त्याची निगा राखतात. बाकीचे साप अंडी घातल्यानंतर ती अंडी सोडून निघून जातात. या तस्कर सापाची अंडी खराब होऊ नये म्हणून संतोष धाकपाडे यांनी नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे प्रमुख भरत छेडा आणि डॉ. प्रतीक तलवाड यांच्याशी संपर्क साधून त्या अंड्याची निगा कशी राखायची याचे मार्गदर्शन घेतले.

अशी घेतली अंड्यांची काळजी- सापांची अंडी रबरासारखी मऊ कवचाची व लांबट असतात. त्यांना योग्य तापमानासोबत योग्य आर्द्रता द्यावी लागते. एका मोठ्या बरणीत वाळू, खडी आणि फरशीचे तुकडे व तसेच अर्धा ग्लासभर पाणी टाकून योग्य तापमान तयार केले. त्यात अंडी ठेवली. अंडी मिळालेल्या दिवसापासून ११५ दिवसांत सात अंड्यांपैकी पाच अंड्यातून पाच पिल्लांचा जन्म झाला. ही सापाची पिल्ले साधारण १० ते १२ इंच लांबीची आहेत. लहानपणापासूनच छोटी पाल, उंदीर, कीटक यांची शिकार करून निसर्गात राहू शकतात.

सापाच्या मोजक्या काही जाती सोडल्या तर त्यांना उबविण्याची गरज नसते. बाळे येथे सापडलेल्या सापाच्या अंड्यांना उबविण्याची गरज नव्हती, मात्र त्यांना विशिष्ट वातावरणाची गरज असते. अंड्यांना बुरशी लागू नये, गरजेपुरती हवा मिळणे महत्त्वाचे होते. अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यानंतर २४ ते ४८ तासात ते पहिल्यांदा कात टाकतात. जन्मानंतर पहिल्या आठवड्यात ते काही खात देखील नाहीत. या सर्व पिल्लांना त्यांच्या नैसर्गिक आवासात आम्ही सोडणार आहेत.- डॉ. प्रतीक तलवाड

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरण