शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खंडित वीजपुरवठ्यांअभावी सोलापुरातील यंत्रमाग कामगारांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:49 IST

पावसाळ्यातही त्रास; वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण

ठळक मुद्देसोलापुरी टेक्स्टाईल्स उत्पादनांना देशी बाजारपेठांमध्ये मागणी कमी झाल्याने सध्या यंत्रमाग कारखानदार अडचणीत तयार मालाला बाजारात उठाव नसल्याने कारखानदारांची आर्थिक नाडी काहीशी मंद झालीपाच दिवसांचा आठवडा आणि रोजच्या वेळेत कपात केली असून उत्पादन निर्मिती तीस ते चाळीस टक्के घटवली

सोलापूर : सोलापुरी टेक्स्टाईल्स उत्पादनांना देशी बाजारपेठांमध्ये मागणी कमी झाल्याने सध्या यंत्रमाग कारखानदार अडचणीत आहेत़ तयार मालाला बाजारात उठाव नसल्याने कारखानदारांची आर्थिक नाडी काहीशी मंद झाली आहे़ त्यामुळे त्यांनी उत्पादन प्रक्रियेला देखील ब्रेक दिला आहे़ पाच दिवसांचा आठवडा आणि रोजच्या वेळेत कपात केली असून उत्पादन निर्मिती तीस ते चाळीस टक्के घटवली आहे़ याचा सर्वाधिक फटका गरीब यंत्रमाग कामगारांना बसत आहे़ पाच दिवसांचा आठवडा झाल्याने कामगारांचे उत्पन्न देखील घटले आहे़ त्यामुळे कामगारांचे आर्थिक नियोजन देखील कोलमडले आह़े़ अशात आता दसरा आणि दिवाळी सारखा मोठा उत्सव उंबरठ्यावर असल्याने कामगारांची चिंता वाढत चालली आहे.

बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस कामगारांना साप्ताहिक सुुुट्टी दिली जात आहे़  या डबल सुट्टीचा धसका कामगारांनी घेतला असून सुट्टीच्या दिवशी कामगार दुसºया ठिकाणी कामाला जात आहेत़ काही कारखान्यात दिवसाचे टायमिंग बदलले असून रोजच्या वेळेत कपात करण्यात आली आहे़ सध्या यंत्रमाग उद्योगात कामगार आणि मालकांना अच्छे दिवस नाहीत़ अनेकदृष्ट्या हा उद्योग अडचणीत सापडला आहे़ विशेष म्हणजे, निर्यात देखील पन्नास टक्क्यांहून अधिक घटल्याने कारखानदारांची आर्थिक उलाढाल खूप कमी झाली आहे़ काही कारखानदार या उद्योगातून बाहेर पडताहेत तर काही मालक पॉवरलुम्स भंगारात विकायला काढत आहेत.

कामगारांच्या विविध प्रश्नावर कामगार संघटना वारंवार रस्त्यावर उतरतात़ मालक संघटना आणि कामगार संघटना वर्षातून एक-दोनवेळा आमनेसामने येतात़ बोनस प्रश्न, पगारवाढीच्या प्रश्नावर मालक आणि कामगारांचे खटके उडतात़ याचाही परिणाम उद्योगावर होत आहे, असे मालक सांगतात़ मागच्या वर्षी कामगारांच्या पीएफ प्रश्नावर कामगार संघटनांनी संप पुकारला होता.

सोलापुरी चादर आणि टॉवेल्सला देशीबाजारपेठांमध्ये मोठी मागणी होती़ आता पानीपत तसेच तामिळनाडू येथेही चादर आणि टॉवेल्सचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे़ त्यामुळे सोलापुरी मार्केटला देशी मार्केटमध्ये उठावच नाही़ तसेच आहे त्या मालाला कमी रेट येत असल्याने मालक उत्पादन विक्रीला पुढे येईनात़ माल स्टॉकचे प्रमाण प्रचंड वाढले आहे़ त्यामुळे नवीन उत्पादन घेण्याचे धाडस मालक करणार नाहीत़ दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत चालल्याने उत्पादनाची किंमत देखील वाढत आहे़ - पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष,सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ

यंत्रमाग कामगार गरीब आहेत़ सहा दिवस काम केल्यानंतर त्यांना हजार ते पंधराशे रुपये मजुरी मिळते़ यात त्यांच्या परिवाराचे पालनपोषण होणे अशक्य आहे़ यातून मार्र्ग काढत कामगार संसाराचा गाडा हाकत असतात़ बाजारात मालाला उठाव नसल्याचे कारण सांगत बहुतांश कारखानदारांनी आता पाच दिवसांचा आठवडा केला़ यामुळे कामगारांची मजुरी आणखीन कमी झाली़ कामगारांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे विस्कटले आहे़ कामगार बेजार झाला आहे़  कामगारांचे भविष्यात कसे होणार, याची चिंता आम्हाला सतावत आहे़- श्रीधर गुडेली, कार्याध्यक्ष, मनसे यंत्रमाग कामगार संघटना

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगbusinessव्यवसायmahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन