शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उजनीचे पाणी कालव्यातून सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण

By दिपक दुपारगुडे | Updated: October 14, 2023 17:39 IST

करकंब व परिसरावर पावसाळा संपत आला तरी विहिरी, बोअरवेल आटू लागल्या आहेत.

दीपक दुपारगुडे, सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील करकंब व परिसरात पावसाअभावी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उजनीच्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माजी ग्रा.पं.सदस्य सचिन शिंदे यांनी करकंब - नेमतवाडी रोडवर असलेल्या उजनीच्या डाव्या कालव्यावर उपोषण सुरू केले आहे.

करकंब व परिसरावर पावसाळा संपत आला तरी विहिरी, बोअरवेल आटू लागल्या आहेत. अशातच करकंबच्या पाणी पुरवठयाचे प्रमुख साधन असलेल्या डाव्या कालव्या लगत पाच एकर क्षेत्रात असलेला पाणी साठवण तलाव मागील एक महिन्यापासून कोरडा पडला आहे. करकंबकरांवर पाणीटंचाईचे संकट आहे. पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने पाणी सोडण्याचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय आरपीआय, धाडस सामाजिक संघटना, दलित महासंघ, प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना, महाराष्ट्र विकास सेना, अहिल्या फाउंडेशन, करकंब, सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्र, संभाजी ब्रिगेड, आम आदमी, मनसे आदी संघटनांनी घेतला आहे.

यावेळी उपसरपंच आदिनाथ देशमुख, सरपंच प्रतिनिधी शरदचंद्र पांढरे, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल शेळके, प्रा.सतीश देशमुख, अर्जुन शेटे, सुरेश शिंदे, राजू शिंदे, विजय नलवडे, राहुल शिंगटे, बाळासाहेब गुळमे, भीमराव मदने, सावता खारे, सुभाष खारे, विजय शेटे, दिलीप व्यवहारे, ज्योतिराम मदने, सुरय्या आतार, सुनीता देशपांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ujine Damउजनी धरण