शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राष्ट्रीय महामार्गांवर चारचाकी वाहनांना १ डिसेंबरपासून फास्टॅग बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 03:11 IST

वाहनमालकांची वेळ आणि इंधनाची होणार बचत; बँका, टोलनाके आणि आॅनलाइन मिळेल चिप

सोलापूर : राज्यातील सर्व चारचाकी वाहनांना १ डिसेंबरपासून टोल नाक्यांवरील रांगांमध्ये अडकून राहावे लागणार नाही. मात्र त्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना फास्टॅग असणे बंधनकारक आहे. महामार्गांवरील टोल नाक्यांवर एक डिसेंबर २०१९ पासून टोलची रक्कम रोखीने स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे चार चाकी व मोठ्या वाहनधारकांनी फास्टॅग बसवून घ्यावेत, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सोलापूर येथील प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले. भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २०१६ पासून फास्टॅग इलेक्ट्रॉनिक सिस्टीम सुरू केली आहे. मंत्रालयाने १ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर रोख रकमेने टोल भरता येणार नाही आणि वाहनचालकांनी फास्टॅग यंत्रणेचा वापर करावा, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे, असे कदम यांनी नमूद केले.

फास्टॅग यंत्रणा सर्व पथकर नाक्यांवर उपलब्ध असून, स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, आयडीएफसी आदी बँकांच्या शाखांमध्येही ते विकत घेता येतील. याशिवाय आॅनलाइन परचेस पोर्टलवर ते मिळतील आणि गुगल प्ले स्टोअरवरही फास्टॅग अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहे. फास्टॅग एक पातळ इलेक्ट्रॉनिक चिप असून, ती वाहनांच्या समोरील भागात लावायची असते. विविध रकमांची चिप विकत घेता येते तसेच ती बँक अकाउंटला जोडता येते. फास्टॅग असलेले वाहन टोल नाक्यावरून जाताच तेथील टोलची रक्कम आपोआप त्यातून जमा केली जाते. सर्व टोल नाक्यांवर फास्टॅगसाठी पथकर उपकरणे आहेत. चिप स्कॅन होताच टोल नाक्यावरील बूम आपोआप उघडले जाईल आणि कोणत्याही अडथळ्याविना वाहन पुढे जाऊ शकेल.फास्टॅगचे फायदे...फास्टॅगच्या वापरामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. अनेक टोल नाक्यांवर बऱ्याचदा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे पुढे जाण्यास विलंब तर होतोच, पण इंधनही वाया जाते.ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया आणि कोलकाताच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटने अभ्यासातून आणलेल्या फास्टॅगमुळे देशभरात ८७ हजार कोटी रुपयांची वर्षाला बचत होईल, असे म्हटले आहे. शिवाय प्रदूषणही कमी होईल.

टॅग्स :Mumbaiमुंबईcarकार