शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

वाढीव मोबदल्यासाठी बार्शीतील शेतकऱ्यांचे तहसीलसमोर उपोषण

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 28, 2023 18:14 IST

आंदोलन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर, परभणी जिल्हाध्यक्ष शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली झाले.

सोलापूर : सुरत-चेन्नई महामार्गांचे भूसंपादन करताना बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देऊ केलेला अल्प मोबदला स्वीकारण्यास विरोध असून वारंवार याचा पाठपुरावा करूनही शासन विचार करत नसल्याने बार्शी तहसील समोर आंदोलकांनी शुक्रवारी लाक्षणिक उपोषण करून लक्ष वेधले.

हे आंदोलन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर, परभणी जिल्हाध्यक्ष शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली झाले.यावेळी शिवाजी कदम म्हणाले सुरत-सोलापूर हा बिझनेस कॅरिडॉर असून या मधून हजारो कोटींचा धंदा खाजगी कंपन्या करणार आहेत. त्यासाठी कवडीमोलाने जमिनी देणार नसून शासनाने भूसंपादन नोटिफिकेशन रद्द करून २०१३ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी.

आंदोलनकर्त्यांच्या वतीने शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा पाचपट मोबदला मिळावा, रेडिरेकनर नुसार केलेले मूल्यांकन रद्द करावे, शेतात जाण्यास दोन्ही बाजूंनी रस्ता द्यावा, जमिनीचे दोन भाग पडल्यास दुसऱ्या बाजूस राहणाऱ्या क्षेत्राची नुकसान भरपाई मिळावी, धरणाप्रमाणे भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करावे, २०१३ च्या अध्यादेशानुसार भूसंपादनाची कार्यवाही करावी अशा मागण्या केल्या. या मागण्याचे निवेदन तहसीलदार एफ. ए. शेख यांना दिले.

यावेळी किसान सभेचे राज्य सरचिटणीस राजन क्षीरसागर, संघर्ष समिती अध्यक्ष ओमप्रकाश पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य मकरंद निंबाळकर, सुधीर गव्हाणे, प्रकाश गुंड, दत्ता भोसले, प्रवीण मस्तूद, बाबा गव्हाणे, सतीश जाजू, रमेश गुंड, माणिक पाटील, सुहास देशमुख हे आंदोलनात सहभागी झाले.

टॅग्स :Solapurसोलापूर