शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

महाराष्ट्र-कर्नाटकातील शेतकऱ्यांची धुमश्चक्री

By admin | Updated: March 30, 2017 03:47 IST

उजनीच्या पाण्यासाठी आक्रमक झालेल्या भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कर्नाटक हद्दीतील उमराणी बंधाऱ्याचे दरवाजे

नारायण चव्हाण / सोलापूरउजनीच्या पाण्यासाठी आक्रमक झालेल्या भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कर्नाटक हद्दीतील उमराणी बंधाऱ्याचे दरवाजे उचकटण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. सोलापुरच्या ३१ शेतकऱ्यांवर चडचण (कर्नाटक) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमानदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीकाठचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शनिवारी सुमारे दोन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी या मागणीसाठी सोलापूर-विजापूर महामार्ग रोखून धरला होता. शेतकरी सोमवारी मध्यरात्री झुंडीने उमराणी बंधाऱ्यावर चालून गेले. बरुर, हत्तरसंग, चणेगाव आणि अणची या भीमेकाठच्या चार गावांना उजनीच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याचा राग त्यांच्यात धुमसत होता. पाणी मिळणारच नसेल तर शेती उद्ध्वस्त होणार ही भावना त्यांच्यात प्रबळ झाली. बरुर येथील ५० ते ६० तरुण शेतकऱ्यांनी सोमवारी रात्री उमराणी बंधारा गाठला. मध्यरात्री लोखंडी दरवाजे उचकटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गोंधळ ऐकून कर्नाटक हद्दीतील शेतकऱ्यांनी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने त्यांना घेरले. काही शेतकरी पळून जाण्यात यशस्वी झाले. बरुर व उमराणीच्या शेतकऱ्यांची तुंबळ हाणामारी झाली. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने कोंडी करून मोठ्या जमावाने त्यांना दगड, काठ्याने बेदम मारले. रात्रभर ही धुमश्चक्री सुरू होती. पहाटे कर्नाटक पोलिसांना ही माहिती देण्यात आली. नेत्यांची चिथावणीबंधारा फोडण्याचा प्रयत्न केल्याने उमराणीच्या शेतकऱ्यांनी बरुरच्या शेतकऱ्यांवर हल्ला केला. त्यात आ. राजू अलगूर, महादेव बहीरगुंडे या कर्नाटकच्या नेत्यांनी उमराणीच्या शेतकऱ्यांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे.