शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

कारकलच्या शेतकऱ्यांनी ऊस शेतीला नवा पर्याय देत शतावरीपासून मिळवले एकरी ९ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:29 IST

यशकथा : उसाच्या शेतीला नव्या पर्याय शोधणाऱ्या कारकलच्या शेतकऱ्यांना शतावरीने मोठा आधार दिला आहे.

- नारायण चव्हाण (सोलापूर)

पारंपरिक शेतीला छेद देऊन कारकल (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकऱ्यांनी शतावरी या औषधी वनस्पतीच्या उत्पादनाला प्राधान्य दिले. त्यातून मोठा आर्थिक लाभ झाला आणि उसाच्या शेतीला नवा पर्याय शतावरीमुळे निर्माण झाला आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या परिसरात ऊस आणि केळीच्या पिकांना शेतकरी अधिक प्राधान्य देतात. नद्यांना पाणी सोडले नाही, तर या नगदी पिकांचे मोठे नुकसान होते. तसेच वषार्नुवर्षे ऊस या एकाच पिकाची लागवड केल्याने जमीन नापीक बनत चालली आहे. त्यात ऊस उत्पादनातून मिळणारी रक्कम ही अत्यंत तोकडी असते. अशा स्थितीत उसाच्या शेतीला नव्या पर्याय शोधणाऱ्या कारकलच्या शेतकऱ्यांना शतावरीने मोठा आधार दिला आहे. ही औषधी वनस्पती नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरली आहे.

पुणे येथील एका कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे सोमनाथ छपरे यांनी कारकलच्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला. मल्लिकार्जुन गवसणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उत्सुकतेपोटी शतावरीच्या शेतीची माहिती मिळवली. त्यातून नवा प्रयोग म्हणून शतावरीची लागवड करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.  मल्लिकार्जुन गवसणे, अनिल बिराजदार, गुंडेराव कुलकर्णी, राजशेखर बोराळे, सोमनाथ बिराजदार या पाच शेतकऱ्यांनी औषधी आणि सुगंधी वनस्पतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीशी करार केला.

उत्तम निचऱ्याची, डोंगराळ, मुरमाड, रेताड, उजाड माळरान अशा जमिनीत शतावरीचे पीक जोमदार येते. पाणी साठवणारी, खोलगट, पाणथळ आणि चुनखडीची जमीन शतावरीसाठी उपयुक्त ठरत नाही.  हवामानाच्या दृष्टीने ही समशीतोष्ण, उष्ण आणि दुष्काळी भागात शतावरीच्या पिकाची चांगली वाढ होते. कमी पाण्यात येणारे शतावरी पीक आहे. ठिबक सिंचनाच्या साहाय्याने आठवड्यातून एकदा पाणी दिले. जास्तीचे पाणी या पिकाला मारक ठरते. कंपनीने कारकल येथील लागवडीसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींची पाहणी केली. शेतकऱ्यांनी या कंपनीसोबत उत्पादन प्रति किलो ५० रुपये दराने विकत घेण्याचा करार केला होता. त्यांना रोपे पुरविली. १५ महिन्यांनंतर शतावरीची जेसीबीच्या साह्याने काढणी करण्यात आली. रोपागणिक सरासरी १५ ते १७ किलो वजनाची शतावरीची मुळी झाली. एका एकरात १८ मे टन शतावरीचे उत्पादन झाले.

कंपनीने करारानुसार वाहतूक खर्च सोसून ही शतावरीची मुळी विकत घेतली. त्यातून शेतकऱ्यांना एकरी ९ लाख रुपये मिळाले. खर्च वजा जाता एकरी ७ लाख रुपये त्यांच्या हाती पडले. अन्य कोणत्याही पिकापेक्षा हे उत्पादन निश्चितच अधिक मिळाले. त्यामुळे ही शेती पारंपरिक शेतीला छेद देणारी ठरली आहे. इतर पिकांच्या तुलनेत शतावरीने आम्हाला खुप उत्पन्न मिळवून दिले. यामुळे आमचा विश्वास बळावला असल्याचे उत्पादक मल्लिकार्जुन गवसणे म्हणाले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी