शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कारकलच्या शेतकऱ्यांनी ऊस शेतीला नवा पर्याय देत शतावरीपासून मिळवले एकरी ९ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:29 IST

यशकथा : उसाच्या शेतीला नव्या पर्याय शोधणाऱ्या कारकलच्या शेतकऱ्यांना शतावरीने मोठा आधार दिला आहे.

- नारायण चव्हाण (सोलापूर)

पारंपरिक शेतीला छेद देऊन कारकल (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकऱ्यांनी शतावरी या औषधी वनस्पतीच्या उत्पादनाला प्राधान्य दिले. त्यातून मोठा आर्थिक लाभ झाला आणि उसाच्या शेतीला नवा पर्याय शतावरीमुळे निर्माण झाला आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या परिसरात ऊस आणि केळीच्या पिकांना शेतकरी अधिक प्राधान्य देतात. नद्यांना पाणी सोडले नाही, तर या नगदी पिकांचे मोठे नुकसान होते. तसेच वषार्नुवर्षे ऊस या एकाच पिकाची लागवड केल्याने जमीन नापीक बनत चालली आहे. त्यात ऊस उत्पादनातून मिळणारी रक्कम ही अत्यंत तोकडी असते. अशा स्थितीत उसाच्या शेतीला नव्या पर्याय शोधणाऱ्या कारकलच्या शेतकऱ्यांना शतावरीने मोठा आधार दिला आहे. ही औषधी वनस्पती नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरली आहे.

पुणे येथील एका कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे सोमनाथ छपरे यांनी कारकलच्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला. मल्लिकार्जुन गवसणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उत्सुकतेपोटी शतावरीच्या शेतीची माहिती मिळवली. त्यातून नवा प्रयोग म्हणून शतावरीची लागवड करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.  मल्लिकार्जुन गवसणे, अनिल बिराजदार, गुंडेराव कुलकर्णी, राजशेखर बोराळे, सोमनाथ बिराजदार या पाच शेतकऱ्यांनी औषधी आणि सुगंधी वनस्पतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीशी करार केला.

उत्तम निचऱ्याची, डोंगराळ, मुरमाड, रेताड, उजाड माळरान अशा जमिनीत शतावरीचे पीक जोमदार येते. पाणी साठवणारी, खोलगट, पाणथळ आणि चुनखडीची जमीन शतावरीसाठी उपयुक्त ठरत नाही.  हवामानाच्या दृष्टीने ही समशीतोष्ण, उष्ण आणि दुष्काळी भागात शतावरीच्या पिकाची चांगली वाढ होते. कमी पाण्यात येणारे शतावरी पीक आहे. ठिबक सिंचनाच्या साहाय्याने आठवड्यातून एकदा पाणी दिले. जास्तीचे पाणी या पिकाला मारक ठरते. कंपनीने कारकल येथील लागवडीसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींची पाहणी केली. शेतकऱ्यांनी या कंपनीसोबत उत्पादन प्रति किलो ५० रुपये दराने विकत घेण्याचा करार केला होता. त्यांना रोपे पुरविली. १५ महिन्यांनंतर शतावरीची जेसीबीच्या साह्याने काढणी करण्यात आली. रोपागणिक सरासरी १५ ते १७ किलो वजनाची शतावरीची मुळी झाली. एका एकरात १८ मे टन शतावरीचे उत्पादन झाले.

कंपनीने करारानुसार वाहतूक खर्च सोसून ही शतावरीची मुळी विकत घेतली. त्यातून शेतकऱ्यांना एकरी ९ लाख रुपये मिळाले. खर्च वजा जाता एकरी ७ लाख रुपये त्यांच्या हाती पडले. अन्य कोणत्याही पिकापेक्षा हे उत्पादन निश्चितच अधिक मिळाले. त्यामुळे ही शेती पारंपरिक शेतीला छेद देणारी ठरली आहे. इतर पिकांच्या तुलनेत शतावरीने आम्हाला खुप उत्पन्न मिळवून दिले. यामुळे आमचा विश्वास बळावला असल्याचे उत्पादक मल्लिकार्जुन गवसणे म्हणाले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी