शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

कारकलच्या शेतकऱ्यांनी ऊस शेतीला नवा पर्याय देत शतावरीपासून मिळवले एकरी ९ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:29 IST

यशकथा : उसाच्या शेतीला नव्या पर्याय शोधणाऱ्या कारकलच्या शेतकऱ्यांना शतावरीने मोठा आधार दिला आहे.

- नारायण चव्हाण (सोलापूर)

पारंपरिक शेतीला छेद देऊन कारकल (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकऱ्यांनी शतावरी या औषधी वनस्पतीच्या उत्पादनाला प्राधान्य दिले. त्यातून मोठा आर्थिक लाभ झाला आणि उसाच्या शेतीला नवा पर्याय शतावरीमुळे निर्माण झाला आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या परिसरात ऊस आणि केळीच्या पिकांना शेतकरी अधिक प्राधान्य देतात. नद्यांना पाणी सोडले नाही, तर या नगदी पिकांचे मोठे नुकसान होते. तसेच वषार्नुवर्षे ऊस या एकाच पिकाची लागवड केल्याने जमीन नापीक बनत चालली आहे. त्यात ऊस उत्पादनातून मिळणारी रक्कम ही अत्यंत तोकडी असते. अशा स्थितीत उसाच्या शेतीला नव्या पर्याय शोधणाऱ्या कारकलच्या शेतकऱ्यांना शतावरीने मोठा आधार दिला आहे. ही औषधी वनस्पती नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरली आहे.

पुणे येथील एका कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे सोमनाथ छपरे यांनी कारकलच्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला. मल्लिकार्जुन गवसणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उत्सुकतेपोटी शतावरीच्या शेतीची माहिती मिळवली. त्यातून नवा प्रयोग म्हणून शतावरीची लागवड करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.  मल्लिकार्जुन गवसणे, अनिल बिराजदार, गुंडेराव कुलकर्णी, राजशेखर बोराळे, सोमनाथ बिराजदार या पाच शेतकऱ्यांनी औषधी आणि सुगंधी वनस्पतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीशी करार केला.

उत्तम निचऱ्याची, डोंगराळ, मुरमाड, रेताड, उजाड माळरान अशा जमिनीत शतावरीचे पीक जोमदार येते. पाणी साठवणारी, खोलगट, पाणथळ आणि चुनखडीची जमीन शतावरीसाठी उपयुक्त ठरत नाही.  हवामानाच्या दृष्टीने ही समशीतोष्ण, उष्ण आणि दुष्काळी भागात शतावरीच्या पिकाची चांगली वाढ होते. कमी पाण्यात येणारे शतावरी पीक आहे. ठिबक सिंचनाच्या साहाय्याने आठवड्यातून एकदा पाणी दिले. जास्तीचे पाणी या पिकाला मारक ठरते. कंपनीने कारकल येथील लागवडीसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींची पाहणी केली. शेतकऱ्यांनी या कंपनीसोबत उत्पादन प्रति किलो ५० रुपये दराने विकत घेण्याचा करार केला होता. त्यांना रोपे पुरविली. १५ महिन्यांनंतर शतावरीची जेसीबीच्या साह्याने काढणी करण्यात आली. रोपागणिक सरासरी १५ ते १७ किलो वजनाची शतावरीची मुळी झाली. एका एकरात १८ मे टन शतावरीचे उत्पादन झाले.

कंपनीने करारानुसार वाहतूक खर्च सोसून ही शतावरीची मुळी विकत घेतली. त्यातून शेतकऱ्यांना एकरी ९ लाख रुपये मिळाले. खर्च वजा जाता एकरी ७ लाख रुपये त्यांच्या हाती पडले. अन्य कोणत्याही पिकापेक्षा हे उत्पादन निश्चितच अधिक मिळाले. त्यामुळे ही शेती पारंपरिक शेतीला छेद देणारी ठरली आहे. इतर पिकांच्या तुलनेत शतावरीने आम्हाला खुप उत्पन्न मिळवून दिले. यामुळे आमचा विश्वास बळावला असल्याचे उत्पादक मल्लिकार्जुन गवसणे म्हणाले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी