शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

उजनीचे पाणी दर्गनहळ्ळी, रामपूर तलावात, जलपूजन करुन शेतकऱ्यांनी केला जल्लोष

By काशिनाथ वाघमारे | Updated: December 12, 2023 17:01 IST

यात दर्गनहळळी, शिर्पनहळळी, कुंभारी, रामपूर परिसरातील ग्रामस्थ या जलपूजनात मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले उजनी धरणाचे पाणी अखेर एकरुख उपसा सिंचन योजनेद्वारे दर्गनहळ्ळी आणि रामपूर तलावापर्यंत पोहोचले. यानिमित्ताने शेतकऱ्यांनी जलपूजन करत गुलालाची मुक्तपणे उधळण करत या क्षणाचा आनंदोत्सव साजरा केला.

यात दर्गनहळळी, शिर्पनहळळी, कुंभारी, रामपूर परिसरातील ग्रामस्थ या जलपूजनात मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रारंभी ज्या ठिकाणी कर्देहळ्ळीचे शेतकरी कृष्णात पवार यांनी उपोषण सुरू केले होते त्याठिकाणी दुपारी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व पदाधिकाऱ्यांनी पुन्हा उपस्थित राहत त्यांना पाणी पाजून उपोषण सोडविले. त्यानंतर दर्गनहळळी जवळ पाणी आलेल्या ठिकाणी जाऊन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कृष्णांत पवार यांच्याच हस्ते जलपूजन केले. यावेळी उजनी कालवा विभागाचे सहायक अभियंता ज्योतिर्लिंग पाटकर यांची उपस्थिती होती. 

यावेळी माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, महेश बिराजदार, अनिल बर्वे, सिद्धाराम भंडारकवठे, देविदास कोळी, अमित ढोले, श्रीशैल माळी, विरूपाक्ष घेरडे, राजू बिराजदार, दीपक पाटील, लक्ष्मण बिराजदार, राजू हगरे, बसवराज दिंडुरे, संगप्पा बिराजदार, मोहन देडे आदी उपस्थित होते.

उजनीच्या पाण्याचा प्रवास सुरू

एकरुखमधून दर्गनहळळी कॅनॉलमध्ये पाणी सोडले गेले. रामपूर तलावामध्ये पाणी येत आहे. तीन ते चार दिवसात दक्षिणमधील दोन्ही तलाव भरून घेण्यात येईल. त्यानंतर दर्शनाळ कॅनॉलमध्ये पाणी सोडले जाणार आहे आणि ते पाणी पुढे हरणा नदीद्वारे कुरनूर धरणात येणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर