शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

स्थानिकांना टोलमाफी करा, अन्यथा आजपासून प्रहारचे तोडफोड आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:26 AM

सोलापूर : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण रस्ते आणि राज्यमार्ग मंत्रालय भारत सरकारच्या वतीने सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५० ...

सोलापूर : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण रस्ते आणि राज्यमार्ग मंत्रालय भारत सरकारच्या वतीने सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५० हा नवीन रस्ता करण्यात आला आहे. २० सप्टेंबर, २०२१ पासून या मार्गावरून प्रवास करण्याकरिता आता वाहनधारकांना टोल भरावे लागणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे, परंतु या टोल नाका परिसरातील १५ ते २० किलोमीटरपर्यंतच्या वाहनधारकांना टोलमाफी करावी. हा राष्ट्रीय महामार्ग होताना, ज्यांच्या जमिनी, शेती यामध्ये गेल्या आहेत, त्यांना प्रथम प्राधान्याने सवलत मिळावी. स्थानिक रहिवाशांना, तसेच प्रकल्पग्रस्तांना टोल नाक्यावर काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी दक्षिण सोलापूर प्रहार जनशक्ती संघटनेने केली आहे.

स्थानिक रहिवाशांना टोलमाफी द्यावी, त्वरित टोल आकारणी थांबवा, अन्यथा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, २२ सप्टेंबर रोजी तोडफोड आंदोलन आंदोलन करणार असल्याचा इशारा दक्षिण सोलापूर तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष मोहसिन तांबोळी यांनी दिला आहे.

सोलापूर अक्कलकोट हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला आहे. यामध्ये काही दुमत नाही, परंतु येथील स्थानिक रहिवाशांना आपल्या विविध कामांसाठी दिवसातून चार-ते पाच वेळा सोलापूर, अक्कलकोटसाठी जावे लागते. प्रत्येक वेळेस त्यांच्याकडून टोल घेण्यात येतो, परंतु हे सामान्य नागरिकांना परवडणारे नाही. सोलापूर-अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गावर अजून कामे सुरू आहेत. काम हे पूर्णपणे झाले नाही, तरीही टोल आकारण्यात येत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना, कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे १०० ते १५० लोकांचे अपघात या मार्गावर झाले आहेत. काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. याला जबाबदार कोण? त्यांना नुकसान भरपाई मिळणार का? असाही सवाल उपस्थित होत आहे. अगोदर सर्व कामे मार्गी लावा, मगच टोल आकारणी करा, अशी मागणी केली.

---

या टोल नाका परिसरातील १५ ते २० किलोमीटर अंतरातील गावातील नागरिकांच्या वाहनांना टोलमाफी मिळालेच पाहिजे, अन्यथा या पुढील काळात प्रहार संघटना तोडफोड आंदोलन करेल. वेळप्रसंगी टोल प्लाझा बंद पाडू.

- मोहसिन तांबोळी, प्रहार संघटना अध्यक्ष, ता.दक्षिण सोलापूर.