शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

किल्लारी भूकंपाग्रस्तांना मदत करण्यात सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची कौतुकास्पद सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 17:15 IST

३० सप्टेंबर १९९३ अत्यंत काळोखी रात्र; पण सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत ऐतिहासिक दिवस!

ठळक मुद्देसोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत ऐतिहासिक दिवसएका दिवसात ४६० अ‍ॅडमिशन्स, त्यात २२९ पुरुष व २३१ स्त्रियादहा दिवसात जवळपास ७५० शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या

३० सप्टेंबर १९९३ अत्यंत काळोखी रात्र; पण सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत ऐतिहासिक दिवस! मी त्यावेळी डॉ.के.पी. डागांच्या अस्थिरोग विभागाच्या युनिट-२ चा रजिस्ट्रार म्हणून सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे आॅनड्युटी कामावर होतो. पहाटे ५ च्या सुमारास कॅज्युअल्टीमधून माझ्या हाऊसमनचा फोन आला व जाऊन बघतो तर सात-आठ लोक अपघातात जखमी झालेले व भांबावलेला जमाव होता. सुरुवातीला वाटले की रस्ते अपघात असेल; परंतु दर पाच-दहा मिनिटांनी ट्रक, बस, जीपमधून जखमींचे जथ्थेच्या जथ्थे येऊ लागले व नंतर कळले की हे सर्व लातूर-उस्मानाबादकडील भूकंपग्रस्त आहेत. त्वरित मी डॉ. डागांना बोलावून घेतले व त्यांनी सर्व विभागप्रमुख व पोलिसांशी संपर्क साधला.

आमच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंटचा कोणताही अनुभव किंवा प्लॅन उपलब्ध नव्हता. आहे त्या सामग्रीत सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन, डीन, सिव्हिल सर्जन व इंटरनर्स धावून आले. अस्थिरोग विभागातील २० डॉक्टरांच्या दोन प्रमुख तुकड्यांबरोबर हे सर्वजण काम करीत होते. सुरुवातीला सगळेच भेदरलेले, कम्युनिकेशनचा अभाव व योग्य समन्वय नसल्याने अडचणी आल्या; परंतु संध्याकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणली. सर्व जखमी कोणतेही प्रथमोपचार न घेता मिळेल त्या वाहनाने पोहोचत होते. वैद्यकीय दल भूकंपग्रस्त भागात जाईपर्यंत जखमी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते व बाकी सर्व ठार झाले होते. एका दिवसात ४६० अ‍ॅडमिशन्स, त्यात २२९ पुरुष व २३१ स्त्रिया होत्या. अपघाताच्या तीव्रतेनुसार तीन वर्गात वर्गीकरण करून सुरुवातीला सिरिअस रुग्णांना उपचार दिले. यात २४ मयत झाले. सर्वात जास्त रुग्णांची संख्या ही अस्थिरुग्णांची होती. ५६ रुग्णांना डोक्याला मार लागला होता व २५ जणांना पोट व छातीत मार लागला होता. दुसºया दिवशीपर्यंत सर्वांचे एक्स-रे व प्रारंभिक तपासण्या करून आठ-आठ तासांच्या दोन शिफ्टमध्ये शस्त्रक्रिया चालू केल्या व पुढील दहा दिवसात जवळपास ७५० शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या.

तिसºया दिवशीच मुंबईवरून अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. नंदू लाड यांची टीम मदतीला आली. त्यांना नुकत्याच मुंबईतील बॉम्बस्फोटाची पार्श्वभूमी होती; परंतु पहिल्याच दिवसात त्यांची खाण्या-राहण्याची मागणी व सहकार्य करण्याचा अभाव यामुळे त्यांना परत पाठवून द्यावे लागले. १५ दिवसांनी जर्मनीवरून डॉक्टरांचे पथक आले; परंतु तोपर्यंत सर्व शस्त्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडल्याचे पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यावेळी सोलापुरातील इतर हॉस्पिटल व सिव्हिल हॉस्पिटलच्या काही माजी विद्यार्थी व प्राध्यापकांनी आवर्जून येऊन मदत केली. सुरुवातीला आम्ही अक्षरश: फार्मा, इम्पॉर्ट कंपन्यांकडून स्थानिक पातळीवर मदत मिळविली. त्यात काही एनजीओ, दिव्यकांत गांधी यांनी रक्ताचा मोफत पुरवठा व डॉक्टरांसहित सर्वांची खाण्या-पिण्याची व्यवस्था केली.

नंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. सोलापुरात विमाने उतरू न शकल्याने कित्येक मदत परस्पर वळविली गेली. डॉक्टरांना व गरजूंना काही न मिळताच औषधे व वस्तूंचा भ्रष्टाचार झाला. सेलिब्रिटी व नेतेमंडळी फोटो सेशन्समध्ये व्यस्त होती. इतके अभूतपूर्व काम करूनसुद्धा तेव्हापासून आजपर्यंत कौतुक तर सोडाच साधे श्रेयाचे प्रशस्तीपत्रक दिले नाही. काही मंडळींनी येथून रिपोर्ट घेऊन स्वत:च्या नावावर झळकले. आम्ही आपले चार महिन्यांपर्यंत शेवटचा रुग्ण डिस्चार्ज होईपर्यंत मुकाटपणे व दर्जेदार काम करीत राहिलो. 

परवाचा इंडोनेशियातील भूकंप, त्या आधीचे भूज, पाकिस्तान, इराण, तुर्की वगैरेंची परिस्थिती पाहता मन विषन्न होते. २५ वर्षांत आम्ही मिळविलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या अमूल्य अनुभवाचा कोणीही फायदा करून घेतला नाही. आजही सोलापूर व भारतात आपत्ती व्यवस्थापन कशाशी खातात  हे माहिती नाही. त्याचबरोबर पुनर्वसनसुद्धा व्यवस्थापनशून्य, उदासीन व भ्रष्टाचारामुळे डागाळलेले आहे. म्हणून तर आजही किल्लारीच्या जखमा अजून ताज्याच आहेत! पण ज्यांनी कुठलीच मदत व चांगले काम न करता स्वत:चीच पोळी भाजली ते कौतुकाचे गोडवे गाताना चित्र भूकंपापेक्षाही अगदी विदारक दिसत आहे.केवळ आपत्ती व्यवस्थापन नसल्याने आजही भारत व इतरत्र असंख्य निष्पाप बळी जातात. सर्वांनी आपली माणुसकी जपली व स्वार्थ दूर ठेवला तरी खूप काही साध्य होईल. - डॉ. संदीप शं. आडके(लेखक अस्थिरोग तज्ज्ञ आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरKillari Earthquakeकिल्लारी भूकंपhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य