शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

‘एनआरसी’साठी गरिबाने कुठून आणायचे पुरावे ? मौलाना मदनींचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 12:13 IST

‘सीएए’मुळे भारतीय संविधानाला धक्का;  देशात फूट पाडू नका, कायदा मागे घ्या !

ठळक मुद्देनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ जमिअत उलेमा - ए - हिंदतर्फे सोलापुरातील पानगल हायस्कूलच्या मैदानावर संविधान बचाव संमेलनमौलाना महमूद असद मदनी यांनी भारतीय संविधानाला धक्का पोहोचविणारा ‘सीएए’ हा कायदा मागे घेण्याचे आवाहन केले

सोलापूर : सरकार एनआरसी (नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन्स) आणि सीएए (सिटीझनशिप अमेंडमेंट अ‍ॅक्ट) कायद्याची अंमलबजावणी करत आहे. या कायद्यांचा विपरित परिणाम केवळ मुस्लिमांवर होणार नाही; तर अन्य समाजातील गरिबांवरही होणार आहे, असे स्पष्ट करून जमिअत उलेमा-ए-हिंदचे सचिव मौलाना महमूद असद मदनी यांनी भारतीय संविधानाला धक्का पोहोचविणारा ‘सीएए’ हा कायदा मागे घेण्याचे आवाहन केले. यावेळी तसा ठरावही पारीत करण्यात आला.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ जमिअत उलेमा - ए - हिंदतर्फे सोलापुरातील पानगल हायस्कूलच्या मैदानावर संविधान बचाव संमेलन आयोजित  करण्यात आले होते. या कार्यक्रमात मौलाना महमूद असद मदनी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष तथा खासदार हुसेन दलवाई, हाफिज नदीम सिद्दिकी, अजमेर शरीफ दर्गाहचे विश्वस्त सय्यद मुईन मियाँ, अहले हदीस जमियतचे मौलाना असलम जामई, बौद्ध महासभेचे भंते बी. सारिपुत्त, संविधान बचाव समितीचे समन्वयक रंगा राचुरे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, पीपल्स रिपब्लिकनचे राजाभाऊ इंगळे, रिपाइं सुबोध वाघमोडे, शाम कदम, कीर्तीपाल गायकवाड, यशवंत फडतरे आदी उपस्थित होते.

मौलाना महमूद असद मदनी म्हणाले, सच्चर कमिटीच्या अहवालानुसार भारतात सर्वात गरीब हे मुस्लीम आहेत. त्यांच्यावर याचा परिणाम होणार आहे. यासोबतच आदिवासी, भटके, मागासवर्गीय यांच्यावरही याचा परिणाम होणार आहे. त्यांच्याकडे पुरावे नाहीत. भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास पाहिला तर हा देश स्वतंत्र होण्यासाठी मुस्लिमांनी आपले रक्त सांडले आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मुस्लीम पुढे होता. स्वातंत्र्य टिकवायचे असल्यास मुस्लीम पुढेच राहणार आहे. खूप मोठ्या बलिदानानंतर हा देश स्वतंत्र झाला आहे. तुम्हाला निवडणूक जिंकायची असेल तर जिंका, पण फक्त निवडणुुका जिंकण्यासाठी देशात फूट पाडण्याचे काम करू नका, असेही आवाहन मौलाना मदनी यांनी केले.

नदीम सिद्दीकी म्हणाले, या कायद्याच्या बाजूने काढलेल्या रॅलीमध्ये खूप कमी लोक होते. जे या रॅलीमध्ये सामील झाले नाहीत, असे लोक आपल्यासोबत आहेत. त्यांना सोबत घेऊन या कायद्याच्या विरोधात आपल्याला संवैधानिक मार्गाने विरोध करायचा आहे. ज्या संस्था, संघटना किंवा पक्ष या कायद्याला विरोध करतील त्यांच्यासोबत आपण राहायला हवे.

खासदार हुसेन दलवाई म्हणाले, महात्मा गांधी यांनी ज्या अहिंसेच्या पद्धतीने ब्रिटिशांना विरोध केला, त्याच पद्धतीने आपल्याला विरोध करायचा आहे. या अहिंसेच्या मार्गाला ब्रिटिश घाबरले तसेच हे सरकारदेखील घाबरेल. संविधानाला हात घालाल तर ही जनता तुम्हाला बेदखल करेल.

या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात लोक आले होते. पानगल शाळेचे मैदान भरल्यामुळे शाळेच्या इमारतीतील व्हरांड्यामध्ये लोक उभे होते. पानगल शाळेच्या समोरील रस्त्यावर लावलेल्या एलईडी स्क्रीनवर कार्यक्रम दाखवत असल्यामुळे हा रस्ता देखील गर्दीने भरला होता. उपस्थितांनी हात उंचावून आपल्या मोबाईलचे टॉर्च दाखवत कार्यक्रमातील ठरावाला समर्थन दर्शविले. कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला़ कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

ठराव आणि विविध आंदोलनाला पाठिंबा

  • - संवैधानिक पद्धतीने सीएए कायद्याचा विरोध करावा
  • - संविधानाला धक्का लावणारा सीएए कायदा मागे घ्यावा
  • - एनआरसीकडे जाणाºया एनपीआरला आमचा विरोध
  • - हा कायदा लागू न करण्याचा निर्णय घेतलेल्या महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन
  • - देशातील सर्व राज्य सरकारने केरळप्रमाणे हा कायदा लागू न करण्याचा ठराव करावा
  • - २४ जानेवारीला अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा द्या
  • - २९ जानेवारीला बामसेफचे वामन मेश्राम यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा द्या
  • - ३० जानेवारी रोजी होणाºया मानवी साखळीत सहभाग नोंदवावा
टॅग्स :SolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतMuslimमुस्लीम