शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळातही शासकीय रानात बहरली ज्वारी, हरभरा अन् करडई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:29 IST

सोलापूर : पाण्याचा एक थेंबही नसताना दुष्काळी परिस्थितीत शहराच्या हद्दीत शंभर एकर क्षेत्राचे नंदनवन झाले आहे. शासकीय रानात ज्वारी, ...

ठळक मुद्देमार्केट यार्ड ते दहिटणे मार्गावरील जमिनीत फुलवली कोरडवाहू शेतीपाण्याचा एक थेंबही नसताना दुष्काळी परिस्थितीत शहराच्या हद्दीत शंभर एकर क्षेत्राचे नंदनवन शासकीय रानात ज्वारी, हरभरा व करडईची पिके या ठिकाणी सध्या उंच भरारी

सोलापूर : पाण्याचा एक थेंबही नसताना दुष्काळी परिस्थितीत शहराच्या हद्दीत शंभर एकर क्षेत्राचे नंदनवन झाले आहे. शासकीय रानात ज्वारी, हरभरा व करडईची पिके या ठिकाणी सध्या उंच भरारी घेत आहेत. सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील मार्केट यार्ड ते दहिटणेपर्यंतच्या शासनाच्या जमिनीवर ही शेती फुलविण्यात आली आहे.

विभागीय कृषी संशोधन केंद्र, पुणे यांच्या नियंत्रणाखालील मुळेगाव फार्म हाऊसवरील प्रक्षेत्र अधीक्षक प्रा. एस. बी. थोरवे यांच्या नेतृत्वाखालील टीमने घेतलेल्या कष्टाचे परिणाम या ठिकाणी दिसून येत आहेत. शहराच्या हद्दीत व वर्दळीच्या ठिकाणी शासकीय जमिनीत दिसणारी पिके सर्वांनाच आश्चर्यचकीत करीत आहेत. ५० एकर क्षेत्रावर कोरडवाहू रानात आलेली, उंचच्या उंच वाढलेली ज्वारी सर्वांचे प्रमुख आकर्षण बनले आहे. पाण्याचा एक थेंबही नसताना हरभरा व करडई या ठिकाणी सध्या हंगामाच्या अंतिम टप्प्यात आले आहे. ३० एकर क्षेत्रावर करडई तर १० एकर क्षेत्रावर आलेला हरभरा कौतुकास्पद ठरत आहे. शंभर एकरातील उभ्या पिकांचे रक्षण करण्यासाठी अत्यंत अपुरा मनुष्यबळ असतानाही या ठिकाणी पिकाचे एक धाटही उपटल्याचे दिसून येत नाही. 

संशोधन केंद्राच्या या युनिटमार्फत दरवर्षी खरीप व रब्बी पिकांचे उत्पादन आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने घेण्यात येते. यंदाच्या रब्बी हंगामात घेण्यात आलेल्या पिकांची चांगली वाढ झाल्याने जिल्ह्यातील शेतकºयांना हा प्रयोग पाहण्यासारखा झाला आहे. पिकांची कोळपणी सहा ते आठ वेळा करण्यात आली आहे. जमिनीच्या हलक्या व भारी प्रकारानुसार या ठिकाणी मालदांडी, फुले, सुचित्रा, वसुदा, यशोदा आदी ज्वारी बियाणांची पेरणी करण्यात आली आहे. हरभºयासाठी विजय, दिग्विजय तर करडईसाठी एसएसएफ बियाणांची पेरणी करण्यात आली आहे. पेरणी पश्चात आवश्यक अन्नद्रव्ये पुरविण्यात आली आहेत. पेरणी करताना खत खाली व बी वर राहील, या पद्धतीने पेरणी करण्यात आल्याने पिकांची चांगली वाढ होत असल्याची माहिती येथील अधिकाºयांनी दिली. 

राष्ट्रीय महामार्गाच्या लगत व शहरातच शंभर एकरावर फुलविण्यात आलेल्या या शेतीला कोणाचेही उपद्रव दिसून येत नाही. पिकांची निगराणी करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर काही कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. शासनाच्या रानात अन् तेही वर्दळीच्या ठिकाणी शहरात फुलविण्यात आलेली ही शेती सर्वांसाठीच आकर्षित ठरणारी झाली आहे. पुणे विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम शेतकºयांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या ठिकाणी पिकांची पाहणी करण्यासाठी गर्दी करीत असून, त्यांना पिकांचे तंत्रज्ञान व शास्त्राची माहिती देण्यात येत आहे. यासाठी येथील कृषी सहायक गणेश कटारे, वैशाली मलाबादे आदींसह अन्य कर्मचारी परिश्रम घेताना दिसून येत आहेत. 

वाफेतच अडवून जिरवले पाणी- या पिकांच्या यशाचे गमक सांगताना प्रा. थोरवे म्हणाले, पेरणीपूर्वी दरवर्षी जमिनीत बंदिस्त वाफा करण्यात येतात. सहा बाय सहा किंवा दहा बाय दहा फूट खोल असणाºया या वाफेत पडणाºया पावसाचे पाणी अडवून जिरविण्यात येते. पेरणी करतानाही दीड फूट खाली बियाणांची पेरणी करण्यात येते. खाली खत व वर बियाणे राहील, अशा पद्धतीने पेरणी होते. या तंत्रामुळे पिकांच्या उत्पादकतेत सुमारे दीडपट वाढ होेते. शेतकºयांनी वाफे करून रानात पडणाºया पावसाचे पाणी जिरवावे, असे आवाहन थोरवे यांनी केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीGovernmentसरकार