शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळातही शासकीय रानात बहरली ज्वारी, हरभरा अन् करडई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:29 IST

सोलापूर : पाण्याचा एक थेंबही नसताना दुष्काळी परिस्थितीत शहराच्या हद्दीत शंभर एकर क्षेत्राचे नंदनवन झाले आहे. शासकीय रानात ज्वारी, ...

ठळक मुद्देमार्केट यार्ड ते दहिटणे मार्गावरील जमिनीत फुलवली कोरडवाहू शेतीपाण्याचा एक थेंबही नसताना दुष्काळी परिस्थितीत शहराच्या हद्दीत शंभर एकर क्षेत्राचे नंदनवन शासकीय रानात ज्वारी, हरभरा व करडईची पिके या ठिकाणी सध्या उंच भरारी

सोलापूर : पाण्याचा एक थेंबही नसताना दुष्काळी परिस्थितीत शहराच्या हद्दीत शंभर एकर क्षेत्राचे नंदनवन झाले आहे. शासकीय रानात ज्वारी, हरभरा व करडईची पिके या ठिकाणी सध्या उंच भरारी घेत आहेत. सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील मार्केट यार्ड ते दहिटणेपर्यंतच्या शासनाच्या जमिनीवर ही शेती फुलविण्यात आली आहे.

विभागीय कृषी संशोधन केंद्र, पुणे यांच्या नियंत्रणाखालील मुळेगाव फार्म हाऊसवरील प्रक्षेत्र अधीक्षक प्रा. एस. बी. थोरवे यांच्या नेतृत्वाखालील टीमने घेतलेल्या कष्टाचे परिणाम या ठिकाणी दिसून येत आहेत. शहराच्या हद्दीत व वर्दळीच्या ठिकाणी शासकीय जमिनीत दिसणारी पिके सर्वांनाच आश्चर्यचकीत करीत आहेत. ५० एकर क्षेत्रावर कोरडवाहू रानात आलेली, उंचच्या उंच वाढलेली ज्वारी सर्वांचे प्रमुख आकर्षण बनले आहे. पाण्याचा एक थेंबही नसताना हरभरा व करडई या ठिकाणी सध्या हंगामाच्या अंतिम टप्प्यात आले आहे. ३० एकर क्षेत्रावर करडई तर १० एकर क्षेत्रावर आलेला हरभरा कौतुकास्पद ठरत आहे. शंभर एकरातील उभ्या पिकांचे रक्षण करण्यासाठी अत्यंत अपुरा मनुष्यबळ असतानाही या ठिकाणी पिकाचे एक धाटही उपटल्याचे दिसून येत नाही. 

संशोधन केंद्राच्या या युनिटमार्फत दरवर्षी खरीप व रब्बी पिकांचे उत्पादन आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने घेण्यात येते. यंदाच्या रब्बी हंगामात घेण्यात आलेल्या पिकांची चांगली वाढ झाल्याने जिल्ह्यातील शेतकºयांना हा प्रयोग पाहण्यासारखा झाला आहे. पिकांची कोळपणी सहा ते आठ वेळा करण्यात आली आहे. जमिनीच्या हलक्या व भारी प्रकारानुसार या ठिकाणी मालदांडी, फुले, सुचित्रा, वसुदा, यशोदा आदी ज्वारी बियाणांची पेरणी करण्यात आली आहे. हरभºयासाठी विजय, दिग्विजय तर करडईसाठी एसएसएफ बियाणांची पेरणी करण्यात आली आहे. पेरणी पश्चात आवश्यक अन्नद्रव्ये पुरविण्यात आली आहेत. पेरणी करताना खत खाली व बी वर राहील, या पद्धतीने पेरणी करण्यात आल्याने पिकांची चांगली वाढ होत असल्याची माहिती येथील अधिकाºयांनी दिली. 

राष्ट्रीय महामार्गाच्या लगत व शहरातच शंभर एकरावर फुलविण्यात आलेल्या या शेतीला कोणाचेही उपद्रव दिसून येत नाही. पिकांची निगराणी करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर काही कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. शासनाच्या रानात अन् तेही वर्दळीच्या ठिकाणी शहरात फुलविण्यात आलेली ही शेती सर्वांसाठीच आकर्षित ठरणारी झाली आहे. पुणे विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम शेतकºयांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या ठिकाणी पिकांची पाहणी करण्यासाठी गर्दी करीत असून, त्यांना पिकांचे तंत्रज्ञान व शास्त्राची माहिती देण्यात येत आहे. यासाठी येथील कृषी सहायक गणेश कटारे, वैशाली मलाबादे आदींसह अन्य कर्मचारी परिश्रम घेताना दिसून येत आहेत. 

वाफेतच अडवून जिरवले पाणी- या पिकांच्या यशाचे गमक सांगताना प्रा. थोरवे म्हणाले, पेरणीपूर्वी दरवर्षी जमिनीत बंदिस्त वाफा करण्यात येतात. सहा बाय सहा किंवा दहा बाय दहा फूट खोल असणाºया या वाफेत पडणाºया पावसाचे पाणी अडवून जिरविण्यात येते. पेरणी करतानाही दीड फूट खाली बियाणांची पेरणी करण्यात येते. खाली खत व वर बियाणे राहील, अशा पद्धतीने पेरणी होते. या तंत्रामुळे पिकांच्या उत्पादकतेत सुमारे दीडपट वाढ होेते. शेतकºयांनी वाफे करून रानात पडणाºया पावसाचे पाणी जिरवावे, असे आवाहन थोरवे यांनी केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीGovernmentसरकार