शहरं
Join us  
Trending Stories
1
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: २०११ पासून केला जातो मार्कर पेनचा वापर, शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही - निवडणूक आयोग
3
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
4
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
5
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
6
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
7
धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये राडा, EVM ची तोडफोड, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
8
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
9
ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले
10
BSNL चा 'महाधमाका'! हाय-स्पीड WiFi प्लॅनवर २०% सवलत; ५००० GB डेटासोबत OTT देखील मोफत!
11
संसार मोडला अन् आयुष्यही संपवलं! पत्नी ४ मुलांसह गायब; संतापलेल्या पतीने सासरच्या दारातच स्वतःला पेटवले
12
'या' महाराणीनं भारत-चीन युद्धात देशासाठी दान केलेलं ६०० किलो सोनं, खासगी विमानं, विमानतळ; घराण्याकडे होती अफाट संपत्ती
13
नऊ वर्षे निवडणूक आयुक्त काय करत होते? पगार कशासाठी घेतात? उद्धव ठाकरे संतापले...
14
"मला राजकारण कळत नाही, वरचे निर्णय घेतात', मतदानाच्या दिवशीच सुभाष देशमुखांचा भाजपाला घरचा आहेर
15
IND vs PAK T20 World Cup: तिकीट बुकिंगसाठी चाहत्यांची ऑनलाईन गर्दी; वेबसाइटच झाली क्रॅश; अन्...
16
Palmistry: तळहातावर शंख, कमळ, मासा, धनुष्य यांसारखी चिन्ह देतात राजयोगाचे संकेत
17
बटन धनुष्यबाणाचे दाबतोय, लाईट कमळासमोरची पेटतेय...; नाशिकमध्ये शिंदेसेना बुचकळ्यात 
18
"निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु..."; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला
19
Nota Rules for Re Election : 'नोटा' जिंकला तर पुन्हा निवडणूक, काय आहे संपूर्ण प्रक्रिया?
20
Vaibhav Suryavanshi Record : U19 वर्ल्ड कपमध्ये वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम; इथंही विक्रमांची ‘वैभवशाही’ परंपरा कायम
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतरही पाणीप्रश्नावर भाजप-राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST

आ. परिचारक यांनी केंद्र सरकारमुळे तर भगीरथ भालके यांनी राज्य सरकारमुळे पाणी आले असे सांगत आहेत. याची चर्चा पंढरपूर-मंगळवेढ्यातील ...

आ. परिचारक यांनी केंद्र सरकारमुळे तर भगीरथ भालके यांनी राज्य सरकारमुळे पाणी आले असे सांगत आहेत. याची चर्चा पंढरपूर-मंगळवेढ्यातील अनेक ग्रुपवर सुरू आहे. निवडणुकीनंतरही मंगळवेढ्यात पाणी प्रश्नावरून संघर्ष पाहावयास मिळू लागला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी शुक्रवारी पोहचले. त्यानंतर आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रसिद्धीप्रमुखांकडून म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्याचे पूजनासंदर्भात प्रसिध्द पत्रक काढले. यात त्यांनी १९९२-९३ पासून बंद असलेली मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ योजना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत राज्यातील एकूण ७ प्रकल्पांचा समावेश केला होता. त्या समाविष्ट यादीत मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा समावेश केला. त्या अनुषंगाने योजना कार्यान्वित होण्यासाठी पंतप्रधानांनी साधारणत: ३ हजार कोटी रुपये मंजूर करुन दिले. या योजनेअंतर्गत शुक्रवारी मारोळी, जंगलगी, चिक्कलगी, शिरनांदगी येथे पाणी सोडून चाचणी करण्यात येत आहे.

दुसरीकडे भगीरथ भालके यांनी सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन मारोळी येथे जलपूजन केल्याचे छायाचित्र व मजकूर टाकून राष्ट्रवादीनेच पाणी प्रश्न सोडवल्याचा दावा केला आहे. स्व. आमदार भारत भालके यांचे दक्षिण भागातील गावांना म्हैसाळचे पाणी मिळावे हे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. जयंत पाटील यांनी म्हैसाळचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. यामुळे म्हैसाळचे पाणी मारोळी, शिरनांदगी हद्दीतमध्ये दाखल झाले, असे म्हटले आहे.

----

म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे आज सर्वात प्रथम मी पाणीपूजन केले. स्व. आ. भारत भालके यांनी या योजनेचे पाणी शिरणांदगी तलावापर्यत आणले होते. आता त्याच्या खालच्या काही गावांना या योजनेचे पाणी मिळणार आहे. या पाण्यातून शिरणांदगी तलाव भरून घेण्यात यावा, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी करणार आहे. भविष्यात या योजनेचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे.

- भगीरथ भालके,अध्यक्ष विठ्ठल सहकारी साखर कारखाना

----

या योजनेचे काम युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात सुरू झाले होते. त्यानंतर गेल्या २० वर्षांपासून राज्य सरकारने काहीही न केल्याने ही योजना निधीअभावी रखडली. गत दोन वर्षात केंद्र सरकारने प्रधानमंत्री जलसंपदा योजनेअंतर्गत राज्यातील रखडलेल्या ७ प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला. त्यामधून हे रखडलेले काम झाले आहे. आता सोडलेल्या पाण्यातून कालव्याची चाचणी होणार आहे. हे पाणी आठ ते दहा दिवस चालेल. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती, बदल केले जातील. पुढच्या काळात पाणी मागणी अर्ज भरून घेऊन लाभार्थी ११ गावांमधील शेतकऱ्यांना रोटेशनप्रमाणे पाणी मिळेल. शेवटच्या टोकापर्यतच्या प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेपर्यंत आमचा प्रयत्न सुरु राहील.

- प्रशांत परिचारक, आमदार, विधानपरिषद सदस्य

फोटो

१४जलपूजन-आवताडे, परिचारक

म्हैसाळ योजनेतून मंगळवेढा तालुक्यात पाणी पोहोचल्यानंतर जलपूजन करताना आ. समाधान आवताडे, आ. प्रशांत परिचारक यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी.

फोटो

१४जलपूजन-भालके

ओळी

म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात पोहोचल्यानंतर जलपूजन करताना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके व अन्य पदाधिकारी.

----

१४जलपूजन