शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतरही पाणीप्रश्नावर भाजप-राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST

आ. परिचारक यांनी केंद्र सरकारमुळे तर भगीरथ भालके यांनी राज्य सरकारमुळे पाणी आले असे सांगत आहेत. याची चर्चा पंढरपूर-मंगळवेढ्यातील ...

आ. परिचारक यांनी केंद्र सरकारमुळे तर भगीरथ भालके यांनी राज्य सरकारमुळे पाणी आले असे सांगत आहेत. याची चर्चा पंढरपूर-मंगळवेढ्यातील अनेक ग्रुपवर सुरू आहे. निवडणुकीनंतरही मंगळवेढ्यात पाणी प्रश्नावरून संघर्ष पाहावयास मिळू लागला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी शुक्रवारी पोहचले. त्यानंतर आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रसिद्धीप्रमुखांकडून म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्याचे पूजनासंदर्भात प्रसिध्द पत्रक काढले. यात त्यांनी १९९२-९३ पासून बंद असलेली मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ योजना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत राज्यातील एकूण ७ प्रकल्पांचा समावेश केला होता. त्या समाविष्ट यादीत मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा समावेश केला. त्या अनुषंगाने योजना कार्यान्वित होण्यासाठी पंतप्रधानांनी साधारणत: ३ हजार कोटी रुपये मंजूर करुन दिले. या योजनेअंतर्गत शुक्रवारी मारोळी, जंगलगी, चिक्कलगी, शिरनांदगी येथे पाणी सोडून चाचणी करण्यात येत आहे.

दुसरीकडे भगीरथ भालके यांनी सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन मारोळी येथे जलपूजन केल्याचे छायाचित्र व मजकूर टाकून राष्ट्रवादीनेच पाणी प्रश्न सोडवल्याचा दावा केला आहे. स्व. आमदार भारत भालके यांचे दक्षिण भागातील गावांना म्हैसाळचे पाणी मिळावे हे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. जयंत पाटील यांनी म्हैसाळचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. यामुळे म्हैसाळचे पाणी मारोळी, शिरनांदगी हद्दीतमध्ये दाखल झाले, असे म्हटले आहे.

----

म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे आज सर्वात प्रथम मी पाणीपूजन केले. स्व. आ. भारत भालके यांनी या योजनेचे पाणी शिरणांदगी तलावापर्यत आणले होते. आता त्याच्या खालच्या काही गावांना या योजनेचे पाणी मिळणार आहे. या पाण्यातून शिरणांदगी तलाव भरून घेण्यात यावा, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी करणार आहे. भविष्यात या योजनेचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे.

- भगीरथ भालके,अध्यक्ष विठ्ठल सहकारी साखर कारखाना

----

या योजनेचे काम युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात सुरू झाले होते. त्यानंतर गेल्या २० वर्षांपासून राज्य सरकारने काहीही न केल्याने ही योजना निधीअभावी रखडली. गत दोन वर्षात केंद्र सरकारने प्रधानमंत्री जलसंपदा योजनेअंतर्गत राज्यातील रखडलेल्या ७ प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला. त्यामधून हे रखडलेले काम झाले आहे. आता सोडलेल्या पाण्यातून कालव्याची चाचणी होणार आहे. हे पाणी आठ ते दहा दिवस चालेल. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती, बदल केले जातील. पुढच्या काळात पाणी मागणी अर्ज भरून घेऊन लाभार्थी ११ गावांमधील शेतकऱ्यांना रोटेशनप्रमाणे पाणी मिळेल. शेवटच्या टोकापर्यतच्या प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेपर्यंत आमचा प्रयत्न सुरु राहील.

- प्रशांत परिचारक, आमदार, विधानपरिषद सदस्य

फोटो

१४जलपूजन-आवताडे, परिचारक

म्हैसाळ योजनेतून मंगळवेढा तालुक्यात पाणी पोहोचल्यानंतर जलपूजन करताना आ. समाधान आवताडे, आ. प्रशांत परिचारक यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी.

फोटो

१४जलपूजन-भालके

ओळी

म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात पोहोचल्यानंतर जलपूजन करताना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके व अन्य पदाधिकारी.

----

१४जलपूजन