शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

निवडणुकीनंतरही पाणीप्रश्नावर भाजप-राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST

आ. परिचारक यांनी केंद्र सरकारमुळे तर भगीरथ भालके यांनी राज्य सरकारमुळे पाणी आले असे सांगत आहेत. याची चर्चा पंढरपूर-मंगळवेढ्यातील ...

आ. परिचारक यांनी केंद्र सरकारमुळे तर भगीरथ भालके यांनी राज्य सरकारमुळे पाणी आले असे सांगत आहेत. याची चर्चा पंढरपूर-मंगळवेढ्यातील अनेक ग्रुपवर सुरू आहे. निवडणुकीनंतरही मंगळवेढ्यात पाणी प्रश्नावरून संघर्ष पाहावयास मिळू लागला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी शुक्रवारी पोहचले. त्यानंतर आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रसिद्धीप्रमुखांकडून म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्याचे पूजनासंदर्भात प्रसिध्द पत्रक काढले. यात त्यांनी १९९२-९३ पासून बंद असलेली मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ योजना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत राज्यातील एकूण ७ प्रकल्पांचा समावेश केला होता. त्या समाविष्ट यादीत मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा समावेश केला. त्या अनुषंगाने योजना कार्यान्वित होण्यासाठी पंतप्रधानांनी साधारणत: ३ हजार कोटी रुपये मंजूर करुन दिले. या योजनेअंतर्गत शुक्रवारी मारोळी, जंगलगी, चिक्कलगी, शिरनांदगी येथे पाणी सोडून चाचणी करण्यात येत आहे.

दुसरीकडे भगीरथ भालके यांनी सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन मारोळी येथे जलपूजन केल्याचे छायाचित्र व मजकूर टाकून राष्ट्रवादीनेच पाणी प्रश्न सोडवल्याचा दावा केला आहे. स्व. आमदार भारत भालके यांचे दक्षिण भागातील गावांना म्हैसाळचे पाणी मिळावे हे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. जयंत पाटील यांनी म्हैसाळचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. यामुळे म्हैसाळचे पाणी मारोळी, शिरनांदगी हद्दीतमध्ये दाखल झाले, असे म्हटले आहे.

----

म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे आज सर्वात प्रथम मी पाणीपूजन केले. स्व. आ. भारत भालके यांनी या योजनेचे पाणी शिरणांदगी तलावापर्यत आणले होते. आता त्याच्या खालच्या काही गावांना या योजनेचे पाणी मिळणार आहे. या पाण्यातून शिरणांदगी तलाव भरून घेण्यात यावा, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी करणार आहे. भविष्यात या योजनेचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे.

- भगीरथ भालके,अध्यक्ष विठ्ठल सहकारी साखर कारखाना

----

या योजनेचे काम युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात सुरू झाले होते. त्यानंतर गेल्या २० वर्षांपासून राज्य सरकारने काहीही न केल्याने ही योजना निधीअभावी रखडली. गत दोन वर्षात केंद्र सरकारने प्रधानमंत्री जलसंपदा योजनेअंतर्गत राज्यातील रखडलेल्या ७ प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला. त्यामधून हे रखडलेले काम झाले आहे. आता सोडलेल्या पाण्यातून कालव्याची चाचणी होणार आहे. हे पाणी आठ ते दहा दिवस चालेल. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती, बदल केले जातील. पुढच्या काळात पाणी मागणी अर्ज भरून घेऊन लाभार्थी ११ गावांमधील शेतकऱ्यांना रोटेशनप्रमाणे पाणी मिळेल. शेवटच्या टोकापर्यतच्या प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेपर्यंत आमचा प्रयत्न सुरु राहील.

- प्रशांत परिचारक, आमदार, विधानपरिषद सदस्य

फोटो

१४जलपूजन-आवताडे, परिचारक

म्हैसाळ योजनेतून मंगळवेढा तालुक्यात पाणी पोहोचल्यानंतर जलपूजन करताना आ. समाधान आवताडे, आ. प्रशांत परिचारक यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी.

फोटो

१४जलपूजन-भालके

ओळी

म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात पोहोचल्यानंतर जलपूजन करताना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके व अन्य पदाधिकारी.

----

१४जलपूजन