शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

निवडणुकीनंतरही पाणीप्रश्नावर भाजप-राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST

आ. परिचारक यांनी केंद्र सरकारमुळे तर भगीरथ भालके यांनी राज्य सरकारमुळे पाणी आले असे सांगत आहेत. याची चर्चा पंढरपूर-मंगळवेढ्यातील ...

आ. परिचारक यांनी केंद्र सरकारमुळे तर भगीरथ भालके यांनी राज्य सरकारमुळे पाणी आले असे सांगत आहेत. याची चर्चा पंढरपूर-मंगळवेढ्यातील अनेक ग्रुपवर सुरू आहे. निवडणुकीनंतरही मंगळवेढ्यात पाणी प्रश्नावरून संघर्ष पाहावयास मिळू लागला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी शुक्रवारी पोहचले. त्यानंतर आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रसिद्धीप्रमुखांकडून म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्याचे पूजनासंदर्भात प्रसिध्द पत्रक काढले. यात त्यांनी १९९२-९३ पासून बंद असलेली मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ योजना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत राज्यातील एकूण ७ प्रकल्पांचा समावेश केला होता. त्या समाविष्ट यादीत मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा समावेश केला. त्या अनुषंगाने योजना कार्यान्वित होण्यासाठी पंतप्रधानांनी साधारणत: ३ हजार कोटी रुपये मंजूर करुन दिले. या योजनेअंतर्गत शुक्रवारी मारोळी, जंगलगी, चिक्कलगी, शिरनांदगी येथे पाणी सोडून चाचणी करण्यात येत आहे.

दुसरीकडे भगीरथ भालके यांनी सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन मारोळी येथे जलपूजन केल्याचे छायाचित्र व मजकूर टाकून राष्ट्रवादीनेच पाणी प्रश्न सोडवल्याचा दावा केला आहे. स्व. आमदार भारत भालके यांचे दक्षिण भागातील गावांना म्हैसाळचे पाणी मिळावे हे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. जयंत पाटील यांनी म्हैसाळचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. यामुळे म्हैसाळचे पाणी मारोळी, शिरनांदगी हद्दीतमध्ये दाखल झाले, असे म्हटले आहे.

----

म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे आज सर्वात प्रथम मी पाणीपूजन केले. स्व. आ. भारत भालके यांनी या योजनेचे पाणी शिरणांदगी तलावापर्यत आणले होते. आता त्याच्या खालच्या काही गावांना या योजनेचे पाणी मिळणार आहे. या पाण्यातून शिरणांदगी तलाव भरून घेण्यात यावा, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी करणार आहे. भविष्यात या योजनेचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे.

- भगीरथ भालके,अध्यक्ष विठ्ठल सहकारी साखर कारखाना

----

या योजनेचे काम युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात सुरू झाले होते. त्यानंतर गेल्या २० वर्षांपासून राज्य सरकारने काहीही न केल्याने ही योजना निधीअभावी रखडली. गत दोन वर्षात केंद्र सरकारने प्रधानमंत्री जलसंपदा योजनेअंतर्गत राज्यातील रखडलेल्या ७ प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला. त्यामधून हे रखडलेले काम झाले आहे. आता सोडलेल्या पाण्यातून कालव्याची चाचणी होणार आहे. हे पाणी आठ ते दहा दिवस चालेल. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती, बदल केले जातील. पुढच्या काळात पाणी मागणी अर्ज भरून घेऊन लाभार्थी ११ गावांमधील शेतकऱ्यांना रोटेशनप्रमाणे पाणी मिळेल. शेवटच्या टोकापर्यतच्या प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेपर्यंत आमचा प्रयत्न सुरु राहील.

- प्रशांत परिचारक, आमदार, विधानपरिषद सदस्य

फोटो

१४जलपूजन-आवताडे, परिचारक

म्हैसाळ योजनेतून मंगळवेढा तालुक्यात पाणी पोहोचल्यानंतर जलपूजन करताना आ. समाधान आवताडे, आ. प्रशांत परिचारक यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी.

फोटो

१४जलपूजन-भालके

ओळी

म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात पोहोचल्यानंतर जलपूजन करताना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके व अन्य पदाधिकारी.

----

१४जलपूजन