शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

जगाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य अभियांत्रिकीत, आनंद कुलकर्णी यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:15 IST

वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी सोलापूर आयोजित ‘विचार-१८’ चे उदघाटन

ठळक मुद्देशिक्षण हे उत्क्रांतीचे साधन आहे - आनंद कुलकर्णीमहाविद्यालयातील प्रत्येक उपक्रम जीवनासाठी दिशादर्शक असतो - आनंद कुलकर्णी

सोलापूर : बदल हा निसर्गाचा नियम आहे, वर्गातील प्रत्येक तास नावीन्यपूर्ण बदलासाठी प्रोत्साहन देणारे ठरत. त्यामुळे शंभर टक्के वर्गातील उपस्थिती निश्चितच ध्येयाचा मार्ग सुकर करणारा ठरतो. जगाला कवेत घेण्यासाठी शिक्षण हा मूलभूत पाया मानला जात असला तरी, जगाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य अभियांत्रिकी शिक्षणात आहे, असे मत आय.एम.ए.पी.जी. इंडिया लिमिटेडचे संचालक आनंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी सोलापूर आयोजित ‘विचार-१८’ च्या उद्घाटनपर भाषणात आनंद कुलकर्णी बोलत होते. यावेळी पुणे येथील मेटालिस्ट फोरजिंगचे व्हा. प्रेसिडेंट किशोर भोसले, प्राचार्य डॉ.शशिकांत हलकुडे, विचार समन्वयक प्रा. मृत्युंजय मडकी, गुलबर्गा येथील पीडीए इंजिनिअरिंग कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्रकुमार हरसूर, तुळजापूर इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. एस.एम. जगदे उपस्थित होते.

यावेळी आनंद कुलकर्णी म्हणाले की, शिक्षण हे उत्क्रांतीचे साधन आहे. संशोधन हा त्याचा पाया ठरतो. महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रम जीवनासाठी दिशादर्शक असतो. महाविद्यालयाच्या शिस्तीत शिकत असताना आपल्या सोयीनुसार काही गैरसमज आपण स्वत:हून पक्के करून घेत असतो, परंतु जेव्हा प्रत्यक्ष जबाबदारीच्या कार्यात यशस्वी होण्यासाठी धडपडत असता तेव्हा महाविद्यालयातील प्रत्येक शिकवण मोलाची वाटते असे कुलकर्णी यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय कंदी, महेश आवताडे, अभिजित ढेरे, सिद्धांत पांडे, वृषभ लोढा, नैतिक मंडोत, प्रदीप जगताप, आदित्य घोंगडे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. आशा थळंगे व प्रा. श्रुताली नारकर यांनी केले. 

निर्मितीसक्षम शिक्षण अंगीकारणे महत्त्वाचे : हलकुडे- अभियांत्रिकी शिक्षण जगाला उभारी देणारे आहे. जगातील शिक्षणाची आव्हाने समजून घेताना अचूक विचाराचा वेध घेणारे, सातत्याने नावीन्याचा ध्यास घेणे आणि ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे निर्मितीसक्षम शिक्षण अंगीकारणे महत्त्वाचे आहे. शिक्षक उपस्थित प्रश्नास योग्य संक्षिप्त स्वरुपातून उत्तरे देतात. त्याचे विश्लेषणात्मक संशोधन करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरते. कौशल्य, ज्ञान, नावीन्यता याचे सादरीकरण करीत राहा असे मार्गदर्शन यावेळी प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांनी केले. 

टॅग्स :Solapurसोलापूरtechnologyतंत्रज्ञानcollegeमहाविद्यालय