शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जगाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य अभियांत्रिकीत, आनंद कुलकर्णी यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:15 IST

वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी सोलापूर आयोजित ‘विचार-१८’ चे उदघाटन

ठळक मुद्देशिक्षण हे उत्क्रांतीचे साधन आहे - आनंद कुलकर्णीमहाविद्यालयातील प्रत्येक उपक्रम जीवनासाठी दिशादर्शक असतो - आनंद कुलकर्णी

सोलापूर : बदल हा निसर्गाचा नियम आहे, वर्गातील प्रत्येक तास नावीन्यपूर्ण बदलासाठी प्रोत्साहन देणारे ठरत. त्यामुळे शंभर टक्के वर्गातील उपस्थिती निश्चितच ध्येयाचा मार्ग सुकर करणारा ठरतो. जगाला कवेत घेण्यासाठी शिक्षण हा मूलभूत पाया मानला जात असला तरी, जगाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य अभियांत्रिकी शिक्षणात आहे, असे मत आय.एम.ए.पी.जी. इंडिया लिमिटेडचे संचालक आनंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी सोलापूर आयोजित ‘विचार-१८’ च्या उद्घाटनपर भाषणात आनंद कुलकर्णी बोलत होते. यावेळी पुणे येथील मेटालिस्ट फोरजिंगचे व्हा. प्रेसिडेंट किशोर भोसले, प्राचार्य डॉ.शशिकांत हलकुडे, विचार समन्वयक प्रा. मृत्युंजय मडकी, गुलबर्गा येथील पीडीए इंजिनिअरिंग कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्रकुमार हरसूर, तुळजापूर इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. एस.एम. जगदे उपस्थित होते.

यावेळी आनंद कुलकर्णी म्हणाले की, शिक्षण हे उत्क्रांतीचे साधन आहे. संशोधन हा त्याचा पाया ठरतो. महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रम जीवनासाठी दिशादर्शक असतो. महाविद्यालयाच्या शिस्तीत शिकत असताना आपल्या सोयीनुसार काही गैरसमज आपण स्वत:हून पक्के करून घेत असतो, परंतु जेव्हा प्रत्यक्ष जबाबदारीच्या कार्यात यशस्वी होण्यासाठी धडपडत असता तेव्हा महाविद्यालयातील प्रत्येक शिकवण मोलाची वाटते असे कुलकर्णी यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय कंदी, महेश आवताडे, अभिजित ढेरे, सिद्धांत पांडे, वृषभ लोढा, नैतिक मंडोत, प्रदीप जगताप, आदित्य घोंगडे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. आशा थळंगे व प्रा. श्रुताली नारकर यांनी केले. 

निर्मितीसक्षम शिक्षण अंगीकारणे महत्त्वाचे : हलकुडे- अभियांत्रिकी शिक्षण जगाला उभारी देणारे आहे. जगातील शिक्षणाची आव्हाने समजून घेताना अचूक विचाराचा वेध घेणारे, सातत्याने नावीन्याचा ध्यास घेणे आणि ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे निर्मितीसक्षम शिक्षण अंगीकारणे महत्त्वाचे आहे. शिक्षक उपस्थित प्रश्नास योग्य संक्षिप्त स्वरुपातून उत्तरे देतात. त्याचे विश्लेषणात्मक संशोधन करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरते. कौशल्य, ज्ञान, नावीन्यता याचे सादरीकरण करीत राहा असे मार्गदर्शन यावेळी प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांनी केले. 

टॅग्स :Solapurसोलापूरtechnologyतंत्रज्ञानcollegeमहाविद्यालय