शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

दुष्काळमुक्तीसाठी गावागावात चांगुलपणाचा वणवा पेटलाय, तुम्हीही सहभागी व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:56 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा, जलमित्र मोहिमेत सहभागी होण्याचे गिरीश कुलकर्णी यांचे आवाहन

ठळक मुद्देपाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष २४ जिल्ह्यातील ७५ तालुक्यांतील ४ हजार गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला

सोलापूर : ग्रामीण भागातील लोक गट-तट आणि मतभेद विसरुन पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपसाठी श्रमदान करीत आहेत. दुष्काळमुक्तीसाठी गावागावात चांगुलपणाचा वणवा पेटला आहे. या मोहिमेत शहरातील नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी पाणी फाउंडेशनने ‘जलमित्र’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत सहभागी व्हा आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करा, असे आवाहन प्रसिध्द अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात  झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश म्हणाले, पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. २४ जिल्ह्यातील ७५ तालुक्यांतील ४ हजार गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. पाणी फाउंडेशन गावकºयांना सहभागी करुन घेते, त्यांना ज्ञान देते आणि त्यांच्याकडून श्रमदान करुन घेते.

योग्य पध्दतीच्या वैज्ञानिक दुष्टिकोनातून गावागावात कामे सुरु आहेत. ग्रामसेवक, कृषी अधिकारी मुक्कामी आहेत. पूर्वी ग्रामसेवक सापडत नव्हता. परंतु, तो आता यात सहभागी झालेला दिसतोय. जी गावे श्रमदान करीत आहेत त्यांना जलमित्र मोहिमेच्या माध्यमातून आणखी मदत मिळू शकते. शहरातील माणसांनाही यात सहभागी होता येऊ शकते. या उपक्रमाच्या घोषणेनंतर १ लाखापेक्षा अधिक जलमित्रांनी सहभाग नोंदविला आहे. १ मे रोजी महाश्रमदान करायचे आहे. 

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जलयुक्त शिवार अभियानाचे प्रकल्प संचालक रवींद्र माने, पाणी फाउंडेशनचे प्रकल्प संचालक नामदेव ननावरे, जिल्हा समन्वयक आबा लाड आदी उपस्थित होते. 

नान्नजच्या ग्रामस्थांनी दिलाय शब्द...- गिरीश म्हणाले, मी आमच्या नान्नजला गेलो होतो. खूप कमी लोक श्रमदान करीत असल्याचे दिसले. त्याबद्दल विचारल्यानंतर पूर्वी द्राक्षाच्या बागा होत्या. बागा कमी झाल्यामुळे लोक हैदराबादला गेल्याचे सांगितले. नान्नज पूर्वी पानमळ्यासाठी प्रसिध्द होते, नंतर द्राक्ष बागांसाठी प्रसिध्द झाले. ते आता दुष्काळासाठी प्रसिध्द होणार का, असा प्रश्न ग्रामस्थांना विचारल्यानंतर त्यांनी श्रमदानात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याचा शब्द दिला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा