शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दुष्काळमुक्तीसाठी गावागावात चांगुलपणाचा वणवा पेटलाय, तुम्हीही सहभागी व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:56 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा, जलमित्र मोहिमेत सहभागी होण्याचे गिरीश कुलकर्णी यांचे आवाहन

ठळक मुद्देपाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष २४ जिल्ह्यातील ७५ तालुक्यांतील ४ हजार गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला

सोलापूर : ग्रामीण भागातील लोक गट-तट आणि मतभेद विसरुन पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपसाठी श्रमदान करीत आहेत. दुष्काळमुक्तीसाठी गावागावात चांगुलपणाचा वणवा पेटला आहे. या मोहिमेत शहरातील नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी पाणी फाउंडेशनने ‘जलमित्र’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत सहभागी व्हा आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करा, असे आवाहन प्रसिध्द अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात  झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश म्हणाले, पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. २४ जिल्ह्यातील ७५ तालुक्यांतील ४ हजार गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. पाणी फाउंडेशन गावकºयांना सहभागी करुन घेते, त्यांना ज्ञान देते आणि त्यांच्याकडून श्रमदान करुन घेते.

योग्य पध्दतीच्या वैज्ञानिक दुष्टिकोनातून गावागावात कामे सुरु आहेत. ग्रामसेवक, कृषी अधिकारी मुक्कामी आहेत. पूर्वी ग्रामसेवक सापडत नव्हता. परंतु, तो आता यात सहभागी झालेला दिसतोय. जी गावे श्रमदान करीत आहेत त्यांना जलमित्र मोहिमेच्या माध्यमातून आणखी मदत मिळू शकते. शहरातील माणसांनाही यात सहभागी होता येऊ शकते. या उपक्रमाच्या घोषणेनंतर १ लाखापेक्षा अधिक जलमित्रांनी सहभाग नोंदविला आहे. १ मे रोजी महाश्रमदान करायचे आहे. 

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जलयुक्त शिवार अभियानाचे प्रकल्प संचालक रवींद्र माने, पाणी फाउंडेशनचे प्रकल्प संचालक नामदेव ननावरे, जिल्हा समन्वयक आबा लाड आदी उपस्थित होते. 

नान्नजच्या ग्रामस्थांनी दिलाय शब्द...- गिरीश म्हणाले, मी आमच्या नान्नजला गेलो होतो. खूप कमी लोक श्रमदान करीत असल्याचे दिसले. त्याबद्दल विचारल्यानंतर पूर्वी द्राक्षाच्या बागा होत्या. बागा कमी झाल्यामुळे लोक हैदराबादला गेल्याचे सांगितले. नान्नज पूर्वी पानमळ्यासाठी प्रसिध्द होते, नंतर द्राक्ष बागांसाठी प्रसिध्द झाले. ते आता दुष्काळासाठी प्रसिध्द होणार का, असा प्रश्न ग्रामस्थांना विचारल्यानंतर त्यांनी श्रमदानात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याचा शब्द दिला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा