शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

दुष्काळमुक्तीसाठी गावागावात चांगुलपणाचा वणवा पेटलाय, तुम्हीही सहभागी व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:56 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा, जलमित्र मोहिमेत सहभागी होण्याचे गिरीश कुलकर्णी यांचे आवाहन

ठळक मुद्देपाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष २४ जिल्ह्यातील ७५ तालुक्यांतील ४ हजार गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला

सोलापूर : ग्रामीण भागातील लोक गट-तट आणि मतभेद विसरुन पाणी फाउंडेशनच्या वॉटर कपसाठी श्रमदान करीत आहेत. दुष्काळमुक्तीसाठी गावागावात चांगुलपणाचा वणवा पेटला आहे. या मोहिमेत शहरातील नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी पाणी फाउंडेशनने ‘जलमित्र’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत सहभागी व्हा आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करा, असे आवाहन प्रसिध्द अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात  झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश म्हणाले, पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. २४ जिल्ह्यातील ७५ तालुक्यांतील ४ हजार गावांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. पाणी फाउंडेशन गावकºयांना सहभागी करुन घेते, त्यांना ज्ञान देते आणि त्यांच्याकडून श्रमदान करुन घेते.

योग्य पध्दतीच्या वैज्ञानिक दुष्टिकोनातून गावागावात कामे सुरु आहेत. ग्रामसेवक, कृषी अधिकारी मुक्कामी आहेत. पूर्वी ग्रामसेवक सापडत नव्हता. परंतु, तो आता यात सहभागी झालेला दिसतोय. जी गावे श्रमदान करीत आहेत त्यांना जलमित्र मोहिमेच्या माध्यमातून आणखी मदत मिळू शकते. शहरातील माणसांनाही यात सहभागी होता येऊ शकते. या उपक्रमाच्या घोषणेनंतर १ लाखापेक्षा अधिक जलमित्रांनी सहभाग नोंदविला आहे. १ मे रोजी महाश्रमदान करायचे आहे. 

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जलयुक्त शिवार अभियानाचे प्रकल्प संचालक रवींद्र माने, पाणी फाउंडेशनचे प्रकल्प संचालक नामदेव ननावरे, जिल्हा समन्वयक आबा लाड आदी उपस्थित होते. 

नान्नजच्या ग्रामस्थांनी दिलाय शब्द...- गिरीश म्हणाले, मी आमच्या नान्नजला गेलो होतो. खूप कमी लोक श्रमदान करीत असल्याचे दिसले. त्याबद्दल विचारल्यानंतर पूर्वी द्राक्षाच्या बागा होत्या. बागा कमी झाल्यामुळे लोक हैदराबादला गेल्याचे सांगितले. नान्नज पूर्वी पानमळ्यासाठी प्रसिध्द होते, नंतर द्राक्ष बागांसाठी प्रसिध्द झाले. ते आता दुष्काळासाठी प्रसिध्द होणार का, असा प्रश्न ग्रामस्थांना विचारल्यानंतर त्यांनी श्रमदानात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याचा शब्द दिला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा