शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

अकरावी प्रवेश; भारती विद्यापीठ ९१.४०, दयानंद ९१, एडी जोशी ८५ टक्क्यांना क्लोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 10:51 IST

‘कट ऑफ’ जाहीर : अकरावी प्रवेशासाठी टक्का घसरला

सोलापूर : सोमवारी अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यंदा जाणकारांचा अंदाज चुकवत प्रमुख महाविद्यालयांची कट ऑफ लिस्ट घसरल्याचे चित्र पहायला मिळाले. सोलापूर शहरातील प्रमुख महाविद्यालयांची विज्ञान शाखेची खुल्या प्रवर्गासाठी सर्वात जास्त कट ऑफ ही भारती विद्यापीठ ज्युनिअर कॉलेजची ९१.४० टक्के, त्यापाठोपाठ डी.बी.एफ. दयानंदची ९१ टक्के व ए.डी. जोशी, कुचन ८५ व आर.एस. चंडक ७५.२० टक्क्यावर बंद झाल्याचे पहायला मिळाले. यंदाचा कट ऑफ कमी लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदही पहायला मिळाला.

सोमवारी दुपारी ३ वाजता सर्वच महाविद्यालयात गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यंदा विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण शंभर टक्के आहे. तसेच विद्यार्थ्यांची टक्केवारीही वाढेल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत होता. पण अकरावीच्या प्रवेशासाठी प्रमुख महाविद्यालयात अर्ज संख्या कमी आली. यामुळे शहरातील प्रमुख महाविद्यालयांची टक्केवारी घसरल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, वाणिज्य शाखेची हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सची कट ऑफ ८२.४०, तर डी.ए.व्ही वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्सची कट ऑफ लिस्ट ७८.८० वर क्लोज झाला.

दरम्यान, सोमवार सकाळपासूनच विद्यार्थी व पालकांची महाविद्यालयात गुणवत्ता यादी पाहण्यासाठी गर्दी दिसून येत होती. सोमवारी गुणवत्ता यादीत नाव दिसतात काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यास ही सुरुवात केली. दुसरी यादी ३ सप्टेंबर रोजी लागणार आहे.

जिल्ह्यात एकूण ४२८ महाविद्यालये आहेत. त्यामध्ये अकरावीच्या ७६ हजार ७३६ जागा आहेत. एकूण ४० हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामध्ये विज्ञानासाठी २७ हजार, वाणिज्य आठ हजार, तर कला शाखेसाठी सात हजार अर्ज आले. यंदा दहावी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ही जवळपास ६८ हजार आहे. अकरावीत सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSSC Resultदहावीचा निकालEducationशिक्षण