शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

लोहमार्ग विद्युतीकरणामुळे डिझेलचा वापर घटला; वर्षाला ३५ कोटींची बचत

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 2, 2023 19:21 IST

जवळपास ९७६ किलोमीटर रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: मध्ये रेल्वे विभागातून सोलापूर रेल्वे विभागाने रेल्वे डब्यांचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे. जवळपास ९७६ किलोमीटर रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे रेल्वे विभागाकडून वार्षिक ३५ कोटी ४८ लाख रुपयांची बचत होत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

भारतीय रेल्वे विभागाने पर्यावरणपूरक रेल्वे बनविण्याचा संकल्प केला आहे. २०३० पूर्वी नेट झिरो कार्बन एमिटर मोहीम पूर्ण करण्याचा मानस रेल्वेने केला आहे. यामुळे सर्वच गाड्यांची गती वाढणार आहे. वेळेची बचत होणार आहे. धूरदेखील कमी होणार आहे. सोलापूर विभागाने ऑगस्ट २०१४ मध्ये मनमाड, पुणतांबा, साईनगर शिर्डी असा ७३ किमी रूटचा पहिला विभाग विद्युतीकरण केले होते. सोलापूर विभागातील मध्य रेल्वेचा शेवटचा नॉन-इलेक्ट्रीफाईड सेक्शन म्हणजेच औसा रोड- लातूर रोड (५२ किमी) २३ फेब्रुवारी २०२३ मध्ये पूर्ण केला आहे. यामुळे सोलापूर विभागात एकूण तीन हजार ११६ किमीकरिता लागणाऱ्या डिझेलची बचत होत आहे. यामुळे वार्षिक ३५ कोटी ४८ लाख रुपयांची बचत होत आहे. तसेच कुर्डूवाडी लातूर विभागातील ८२६९ टन कार्बन फूटप्रिंट कमी होईल. यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही.

टॅग्स :railwayरेल्वे