शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

गालबोट न लागता निवडणूक प्रथमच शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:36 IST

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ; १३ हजार ७० मतदार वाढले : गतवर्षीच्या तुलनेत टक्केवारी घटली

ठळक मुद्दे२०१४ मध्ये अक्कलकोट विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीने झाली होती

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : २०१४  साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अक्कलकोटविधानसभा निवडणुकीत यंदा नव्याने १३ हजार ७० मतदार वाढले आहेत. आता याचा फायदा कोणाला अन् तोटा कोणाला होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. यंदा काही ठिकाणच्या केंद्रांवर मतदारांना काही किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागले़ प्रचारातही काही उमेदवारांनी काही मागील मुद्दे उपस्थित केले होते. त्यामुळे ते फारसे प्रभावी ठरलेले नाही. एकूणच २० वर्षांनंतर गालबोट न लागता निवडणूक शांततेत झाली़ आरोप, प्रत्यारोपाविना ही निवडणूक पार पडली. त्यामुळे मतदानानंतर तालुक्यात वातावरण शांत राहिले आहे.

२०१४ मध्ये अक्कलकोट विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीने झाली होती. आरोप-प्रत्यारोप, हाणामारी अशा अनेक घटना घडल्या़ तापलेल्या वातावरणातही ६३.९४ टक्के मतदान झाले होते.

यंदा नव्याने झालेल्या मतदार नोंदणीला प्रतिसाद मिळाला आहे़ तरीही ६२.०२ टक्के मतदान झालेले आहे. यंदा वाढलेले नवमतदार कोणाच्या बाजूने जाणार हे निकालाअंतीच कळणार आहे. फायदा-तोटा कोणाला होणार? अशी चर्चा आता रंगत आहे.

विधानसभा मतदारसंघातील अनेक बूथवर पिण्याचे पाणी आणि ज्येष्ठांना बराच वेळ रांगेत उभे राहण्याबरोबरच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले़ तसेच दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था नव्हती़ अशा अनेक अडचणींना तोंड देत मतदारांनी मतदान केले. 

जुनेच मुद्दे उगाळले- या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने एकरूख उपसा सिंचन व देगाव जोडकालवा योजना लवकरात लवकर पूर्ण करू, अशी ग्वाही देत मागील दहा वर्षांपासूनचे तेच ते मुद्दे प्रचारात उपस्थित केले. भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांनी मागील १५ वर्षांत रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आणि अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी या तिन्ही नगरपालिकेच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे सांगितले़ तडवळ-तिलाठी-कडबगाव, दुधनी रेल्वे उड्डाणपूल करू, अक्कलकोट शहरातील भुयारी गटार योजना करूश अशी अनेक आश्वासने त्यांनी दिली आहेत.

गैरसोयींना तोंड देत केले मतदान - अक्कलकोट शहरातील एनटीसी शाळा मतदान केंद्र (क्र. १५३, १५४) मध्ये पावसामुळे पाणी साचले होते. अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशा राऊत यांच्या सूचनेनंतर मोटार लावून पाण्याचा उपसा केला. त्या ठिकाणी चिखल, गळकी पत्रे, ज्येष्ठांची गैरसोय झाली. भोसगे गावीसुद्धा मतदान केंद्र चक्क धोकादायक इमारतीत होते. अशाच प्रकारे कासेगाव, मुस्ती या ठिकाणीही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले़

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणakkalkot-acअक्कलकोट