शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गालबोट न लागता निवडणूक प्रथमच शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:36 IST

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ; १३ हजार ७० मतदार वाढले : गतवर्षीच्या तुलनेत टक्केवारी घटली

ठळक मुद्दे२०१४ मध्ये अक्कलकोट विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीने झाली होती

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : २०१४  साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अक्कलकोटविधानसभा निवडणुकीत यंदा नव्याने १३ हजार ७० मतदार वाढले आहेत. आता याचा फायदा कोणाला अन् तोटा कोणाला होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. यंदा काही ठिकाणच्या केंद्रांवर मतदारांना काही किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागले़ प्रचारातही काही उमेदवारांनी काही मागील मुद्दे उपस्थित केले होते. त्यामुळे ते फारसे प्रभावी ठरलेले नाही. एकूणच २० वर्षांनंतर गालबोट न लागता निवडणूक शांततेत झाली़ आरोप, प्रत्यारोपाविना ही निवडणूक पार पडली. त्यामुळे मतदानानंतर तालुक्यात वातावरण शांत राहिले आहे.

२०१४ मध्ये अक्कलकोट विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीने झाली होती. आरोप-प्रत्यारोप, हाणामारी अशा अनेक घटना घडल्या़ तापलेल्या वातावरणातही ६३.९४ टक्के मतदान झाले होते.

यंदा नव्याने झालेल्या मतदार नोंदणीला प्रतिसाद मिळाला आहे़ तरीही ६२.०२ टक्के मतदान झालेले आहे. यंदा वाढलेले नवमतदार कोणाच्या बाजूने जाणार हे निकालाअंतीच कळणार आहे. फायदा-तोटा कोणाला होणार? अशी चर्चा आता रंगत आहे.

विधानसभा मतदारसंघातील अनेक बूथवर पिण्याचे पाणी आणि ज्येष्ठांना बराच वेळ रांगेत उभे राहण्याबरोबरच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले़ तसेच दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था नव्हती़ अशा अनेक अडचणींना तोंड देत मतदारांनी मतदान केले. 

जुनेच मुद्दे उगाळले- या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने एकरूख उपसा सिंचन व देगाव जोडकालवा योजना लवकरात लवकर पूर्ण करू, अशी ग्वाही देत मागील दहा वर्षांपासूनचे तेच ते मुद्दे प्रचारात उपस्थित केले. भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांनी मागील १५ वर्षांत रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आणि अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी या तिन्ही नगरपालिकेच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे सांगितले़ तडवळ-तिलाठी-कडबगाव, दुधनी रेल्वे उड्डाणपूल करू, अक्कलकोट शहरातील भुयारी गटार योजना करूश अशी अनेक आश्वासने त्यांनी दिली आहेत.

गैरसोयींना तोंड देत केले मतदान - अक्कलकोट शहरातील एनटीसी शाळा मतदान केंद्र (क्र. १५३, १५४) मध्ये पावसामुळे पाणी साचले होते. अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशा राऊत यांच्या सूचनेनंतर मोटार लावून पाण्याचा उपसा केला. त्या ठिकाणी चिखल, गळकी पत्रे, ज्येष्ठांची गैरसोय झाली. भोसगे गावीसुद्धा मतदान केंद्र चक्क धोकादायक इमारतीत होते. अशाच प्रकारे कासेगाव, मुस्ती या ठिकाणीही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले़

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणakkalkot-acअक्कलकोट