शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

गालबोट न लागता निवडणूक प्रथमच शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:36 IST

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ; १३ हजार ७० मतदार वाढले : गतवर्षीच्या तुलनेत टक्केवारी घटली

ठळक मुद्दे२०१४ मध्ये अक्कलकोट विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीने झाली होती

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : २०१४  साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अक्कलकोटविधानसभा निवडणुकीत यंदा नव्याने १३ हजार ७० मतदार वाढले आहेत. आता याचा फायदा कोणाला अन् तोटा कोणाला होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. यंदा काही ठिकाणच्या केंद्रांवर मतदारांना काही किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागले़ प्रचारातही काही उमेदवारांनी काही मागील मुद्दे उपस्थित केले होते. त्यामुळे ते फारसे प्रभावी ठरलेले नाही. एकूणच २० वर्षांनंतर गालबोट न लागता निवडणूक शांततेत झाली़ आरोप, प्रत्यारोपाविना ही निवडणूक पार पडली. त्यामुळे मतदानानंतर तालुक्यात वातावरण शांत राहिले आहे.

२०१४ मध्ये अक्कलकोट विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीने झाली होती. आरोप-प्रत्यारोप, हाणामारी अशा अनेक घटना घडल्या़ तापलेल्या वातावरणातही ६३.९४ टक्के मतदान झाले होते.

यंदा नव्याने झालेल्या मतदार नोंदणीला प्रतिसाद मिळाला आहे़ तरीही ६२.०२ टक्के मतदान झालेले आहे. यंदा वाढलेले नवमतदार कोणाच्या बाजूने जाणार हे निकालाअंतीच कळणार आहे. फायदा-तोटा कोणाला होणार? अशी चर्चा आता रंगत आहे.

विधानसभा मतदारसंघातील अनेक बूथवर पिण्याचे पाणी आणि ज्येष्ठांना बराच वेळ रांगेत उभे राहण्याबरोबरच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले़ तसेच दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था नव्हती़ अशा अनेक अडचणींना तोंड देत मतदारांनी मतदान केले. 

जुनेच मुद्दे उगाळले- या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने एकरूख उपसा सिंचन व देगाव जोडकालवा योजना लवकरात लवकर पूर्ण करू, अशी ग्वाही देत मागील दहा वर्षांपासूनचे तेच ते मुद्दे प्रचारात उपस्थित केले. भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांनी मागील १५ वर्षांत रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आणि अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी या तिन्ही नगरपालिकेच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे सांगितले़ तडवळ-तिलाठी-कडबगाव, दुधनी रेल्वे उड्डाणपूल करू, अक्कलकोट शहरातील भुयारी गटार योजना करूश अशी अनेक आश्वासने त्यांनी दिली आहेत.

गैरसोयींना तोंड देत केले मतदान - अक्कलकोट शहरातील एनटीसी शाळा मतदान केंद्र (क्र. १५३, १५४) मध्ये पावसामुळे पाणी साचले होते. अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशा राऊत यांच्या सूचनेनंतर मोटार लावून पाण्याचा उपसा केला. त्या ठिकाणी चिखल, गळकी पत्रे, ज्येष्ठांची गैरसोय झाली. भोसगे गावीसुद्धा मतदान केंद्र चक्क धोकादायक इमारतीत होते. अशाच प्रकारे कासेगाव, मुस्ती या ठिकाणीही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले़

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणakkalkot-acअक्कलकोट