शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आर्थिक अडचणीचे अहवाल पाहता नागपूर, बुलडाणा जिल्हा बँकांच्या निवडणुकीला स्थगिती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 12:18 IST

आर्थिक अडचणीचे कारण : ५३७ कोटी मदतीचा डोस देऊनही आजारीच

सोलापूर : आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी शासनाने ५३७ कोटी रुपये मदतीचा डोस देऊनही विदर्भातील वर्धा, नागपूरबुलडाणा या बँका अडचणीत आहेत. राज्य निवडणूक प्राधिकरणाने निवडणुका जाहीर केल्या असल्या तरी आर्थिक अडचणीचे अहवाल पाहता या बँकांच्या निवडणुकीला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. तसे अहवाल शासनाकडे दिले आहेत.

सहकार खात्याच्या राज्य निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील १६ जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये विदर्भातील नागपूरबुलडाणा या जिल्हा बँकांचा समावेश आहे. वर्धा जिल्हा बँकेची निवडणूक जाहीरच केली नाही. वर्धा जिल्हा बँकेला यावर्षी २२८ कोटी तोटा व ९८ टक्के एनपीए आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एनपीए ८० टक्के तर तोटा ३३३ कोटी, तर बुलडाणा जिल्हा बँकेचा तोटा २५३ कोटी व एनपीए ५४ टक्के इतका आहे. या तिन्ही जिल्हा बँकांना शासनाने भागभांडवल म्हणून ५३७ कोटी रुपये मदतीचा डोस दिला होता. तरीही या बँका आजारातून बाहेर पडल्या नाहीत. आर्थिक अडचणीत बँका असताना निवडणुका लावण्यात आल्या आहेत. या जिल्हा बँकांनी निवडणूक प्राधिकरण व शासनाला आर्थिक परिस्थितीचा अहवाल सादर केला आहे.

शासनच निर्णय घेईल...

  • निवडणूक प्राधिकरणाकडे याबाबत विचारणा केली असता या बँकांचे अहवाल मिळाले. मात्र, निवडणुकीबाबत शासनच निर्णय घेईल, असे सांगण्यात आले. आम्ही मात्र त्यांना निवडणूक घेण्यासाठी कळविले आहे.
  • 0 बुलडाणा व नागपूर या बँकावर प्रशासक असून येथील पालकमंत्र्यांनी निवडणुका स्थगित करण्यास शासनाला कळविले असल्याचे सांगण्यात आले.
  • 0 पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, नाशिक व धुळे- नंदुरबार तसेच जळगाव आणि अमरावती या बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया मात्र सुरू केली आहे.

केंद्र शासनाने सहकार खाते निर्माण केल्याने व हे खाते अमित शहा यांच्याकडे दिल्याने घाईने राज्यातील १६ जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका लावण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. केंद्राने काही बदल केले तर जिल्हा बँकांच्या निवडणुकीची व सत्ताधाऱ्यांची अडचण होईल, असा कयास आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रbuldhanaबुलडाणाnagpurनागपूर