शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

ुकरमाळा निवडणुक; इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांची वाढली डोकेदुखी

By admin | Updated: January 28, 2017 12:31 IST

ुकरमाळा निवडणुक; इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांची वाढली डोकेदुखी

ुकरमाळा निवडणुक; इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांची वाढली डोकेदुखीकरमाळा : करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत चारही गटात इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने नेतेमंडळींची तिकीट फिक्स करताना डोकेदुखी वाढली असून, आपणास तिकीट मिळणार नाही असे अंदाज घेत अनेक इच्छुक या गटातून त्या गटात प्रवेश करीत आहेत तर आपणास बंडखोरीचा फटका बसू नये म्हणून नेतेमंडळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर लगेच होणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अ‍ॅडजेस्टमेंट करून घेण्याचीही भूमिका घेत आहेत. करमाळा तालुका पंचायत समितीमध्ये गेल्या वीस वर्षांपासून बागल गटाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता आहे. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बागल गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली स्वबळावर निवडणूक लढविणार असून, त्यांच्या सत्तेचा अश्वमेघ रोखण्यासाठी आ. नारायण पाटील शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणुका लढविणार आहेत तर माजी आ.जयवंतराव जगताप व संजय शिंदे हे दोन्ही गट निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत.भाजपाने बैठक घेऊन निवडणुकीची तयारी चालविली आहे.भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली आहे. कोण कोणाबरोबर युती करेल याविषयी उलटसुलट चर्चा गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. आ.नारायण पाटील यांच्या बरोबर जगताप गटाची युतीसंदर्भात बोलणी सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे तर जगताप-पाटील युती झाली नाही तर जगतापांची संजय शिंदे यांच्या बरोबर युती होईल असेही बोेलले जात आहे.गत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आ.नारायण पाटील व शामलताई बागल हे दोन्ही गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरखाली युती करून एकत्रित लढले होते. त्यांच्या विरोधात माजी आ.जयवंतराव जगताप काँग्रेस आय पक्षाच्या बॅनरखाली विरोधात लढले होते.त्यावेळी संजय शिंदे हे बागल व पाटील यांच्या बरोबर होते.त्यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतसुद्धा संजय शिंदे यांनी बागल व पाटील यांची युती घडवून आणली होती. निवडणूक निकालानंतर जिल्हा परिषदेत बागल व पाटील गटाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सहा पैकी सहा तर पंचायत समितीत बारा पैकी दहा उमेदवार विजयी झाले होते. तर जगताप यांच्या नेतृत्वाखालील काँगे्रस आयने पंचायत समितीच्या दोन जागा जिंकल्या होत्या.आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतसुद्धा बागल-पाटील गटाने निर्विवाद सत्ता मिळवली होती. पुढे बदलत्या राजकीय समीकरणानुसार बागल-पाटील युती संपुष्टात आल्याने संजय शिंदे ही विधानसभा मतदारसंघात उभे राहिले. एक गट व दोन गण कमी..करमाळा तालुक्यात गत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सहा गट होते त्यामधून पोथरे जिल्हा परिषद गट कमी होऊन पाच गट राहिलेले आहेत तर पंचायत समितीचे बारा गण होते त्यामध्ये देवळाली,चिखलठाण हे दोन गण कमी झाले आहेत.होऊ घातलेल्या निवडणुकीत पांडे,वीट,कोर्टी,वांगी व केम हे पाच जिल्हा परिषदेचे गट आहेत. तर पांडे,रावगाव,केम,साडे,कुंभेज,जेऊर,रावगाव,वीट,कोर्टी,केत्तूर हे दहा गण आहेत.वांगी जिल्हा परिषद गट ,पांडे,वीट ,जेऊर हे गण सर्वसाधारण असल्याने या गट व गणातून आ.नारायण पाटील,बागल गटातून इच्छुकांची संख्या मोठी आहे कोणाला उमेदवारी द्यावी व कोणाला नाराज करावे असा प्रश्न नेतेमंडळींना पडला आहे. नाराज उमेदवार बंडखोरीची भाषा ही बोलू लागला आहे. केम गण हा अनुसूचित जातीकरिता राखीव असून पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या गटात ही इच्छुकांची संख्या मोठी आहे.उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. असंतुष्टांच्या खेळीला महत्त्व..करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका बहुरंगी होणार असून, बागल,आ.पाटील,जगताप,शिंदे या सर्वच गटातून इच्छुकांची भाऊगर्दी असून उमेदवारी मिळेल की नाही या चिंतेत असणारे इच्छुक कार्यकर्ते या गटातून त्या गटात उड्या मारीत असून प्रवेशाचे वारे सर्वच गटात जोरदारपणे सुरू आहे. उमेदवारी न मिळणारे असंतुष्ट कार्यकर्त्यांच्या खेळीला या निवडणुकीत महत्त्व प्राप्त झाले आहे.