शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

आठ वर्षात राज्यातील ४३ साखर कारखान्यांनी थकवले शेतकऱ्यांचे ३४२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर: गेल्या आठ वर्षात एफआरपीनुसार ३४२ कोटी ३७ लाख इतकी रक्कम राज्यातील ४३ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर: गेल्या आठ वर्षात एफआरपीनुसार ३४२ कोटी ३७ लाख इतकी रक्कम राज्यातील ४३ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकविले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांकडे १२१ कोटी ४८ लाख रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत. ही रक्कम बुडाल्यात जमा असल्याचे सध्याचे चित्र आहे.

२०१२-१३ पासून एक-एक करीत राज्यातील ४३ साखर कारखान्यांकडे वरचेवर एफआरपीची रक्कम थकली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ साखर कारखान्यांनी गेल्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. २०१२-१३ पासून एफआरपीची रक्कम थकली असताना ती शेतकऱ्यांना मिळाली नाही व ती मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणा काही करू शकली नाही. मात्र या ४३ पैकी पाच साखर कारखान्यांनी थकलेल्यापैकी १२ कोटी ८५ हजार रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. या पाचसह उर्वरित ३८ साखर कारखान्यांकडे ३३० कोटी ३६ लाख रुपये अडकले आहेत.

थकबाकीत सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १२१ कोटी ४८ लाख रुपये थकीत आहेत. तर सोलापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडील उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी १५ कोटी ९७ लाख रुपये थकवले आहेत.

-----------

या कारखानाने थकवली रक्कम

- सोलापूर जिल्हा- गोकूळ-१६ लाख, आदिनाथ- २३४ लाख, सीताराम महाराज खर्डी- २५ कोटी ४८ लाख, सहकार शिरोमणी वसंतराव काळे- १२ कोटी ४४ लाख, स्वामी समर्थ अक्कलकोट- ९ कोटी ७ लाख, आर्यन बार्शी- २१ कोटी ५ लाख, विजय शुगर करकंब- २० कोटी १८ लाख, शंकर अकलूज- ३० कोटी ७७ लाख रुपये.

उस्मानाबाद जिल्हा- भीमाशंकर- १६० लाख, जय लक्ष्मी- ७६९ लाख, तेरणा- १०९ लाख, नरसिंह इंदापूर- ३५३ लाख, शंभू महादेव- २ कोटी ७ लाख रुपये.

- कोल्हापूर जिल्ह्यातील दौलत कारखाना १८ कोटी १२ लाख, आजरा शेतकरी १५ कोटी ४६ लाख, सांगली जिल्ह्यातील वसंतदादा शेतकरी ५ कोटी ५४ लाख, महाकाली ७ कोटी ९८ लाख, मानगंगा ३ कोटी ३३ लाख, पुणे जिल्ह्यातील केन ॲग्रो डोंगरी ८ कोटी ६६ लाख, यशवंत थेऊर १० कोटी ८४ लाख, सातारा जिल्ह्यातील रयत ९९५ लाख व न्यू फलटण २३ कोटी ६६ लाख रुपये.

- नाशिक जिल्ह्यातील के. के. वाघ २ कोटी ८५ लाख, के. जी. एस. ५२६ लाख, जालना जिल्ह्यातील समर्थ-१ कारखाना ३६५ लाख, समर्थ-२ कारखाना १९७ लाख, जय भवानी ७१२ लाख, व्ही.व्ही. पाटील ९६ लाख, जळगाव जिल्ह्यातील बेलगंगा १६ लाख, अंबाजी शुगर ३८६ लाख, चोपडा १५ कोटी ५८ लाख, मधुकर यावल १५ कोटी ८१ लाख,

नरसिंह लोहगाव (परभणी) २२१ लाख, महाराष्ट्र शेतकरी ४२२ लाख, पूर्णा ( हिंगोली) ११४ लाख, नांदेड जिल्ह्यातील एच.जे. पाटील ५५८ लाख, शंकर वागलवाडा १६ लाख, जय शिवशंकर १२९ लाख, लातूर जिल्ह्यातील शेतकरी किल्लारी ६२ लाख, पन्नगेश्वर ६६१ लाख व नागपूरच्या श्रीराम कारखान्याने ३८ लाख रुपये थकविले आहेत.