शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
4
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
5
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
6
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
7
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
8
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
9
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
10
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
11
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
12
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
13
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
14
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
15
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
16
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
17
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
18
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
19
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?

आठ वर्षात राज्यातील ४३ साखर कारखान्यांनी थकवले शेतकऱ्यांचे ३४२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर: गेल्या आठ वर्षात एफआरपीनुसार ३४२ कोटी ३७ लाख इतकी रक्कम राज्यातील ४३ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर: गेल्या आठ वर्षात एफआरपीनुसार ३४२ कोटी ३७ लाख इतकी रक्कम राज्यातील ४३ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकविले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांकडे १२१ कोटी ४८ लाख रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत. ही रक्कम बुडाल्यात जमा असल्याचे सध्याचे चित्र आहे.

२०१२-१३ पासून एक-एक करीत राज्यातील ४३ साखर कारखान्यांकडे वरचेवर एफआरपीची रक्कम थकली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ साखर कारखान्यांनी गेल्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. २०१२-१३ पासून एफआरपीची रक्कम थकली असताना ती शेतकऱ्यांना मिळाली नाही व ती मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणा काही करू शकली नाही. मात्र या ४३ पैकी पाच साखर कारखान्यांनी थकलेल्यापैकी १२ कोटी ८५ हजार रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. या पाचसह उर्वरित ३८ साखर कारखान्यांकडे ३३० कोटी ३६ लाख रुपये अडकले आहेत.

थकबाकीत सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १२१ कोटी ४८ लाख रुपये थकीत आहेत. तर सोलापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडील उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी १५ कोटी ९७ लाख रुपये थकवले आहेत.

-----------

या कारखानाने थकवली रक्कम

- सोलापूर जिल्हा- गोकूळ-१६ लाख, आदिनाथ- २३४ लाख, सीताराम महाराज खर्डी- २५ कोटी ४८ लाख, सहकार शिरोमणी वसंतराव काळे- १२ कोटी ४४ लाख, स्वामी समर्थ अक्कलकोट- ९ कोटी ७ लाख, आर्यन बार्शी- २१ कोटी ५ लाख, विजय शुगर करकंब- २० कोटी १८ लाख, शंकर अकलूज- ३० कोटी ७७ लाख रुपये.

उस्मानाबाद जिल्हा- भीमाशंकर- १६० लाख, जय लक्ष्मी- ७६९ लाख, तेरणा- १०९ लाख, नरसिंह इंदापूर- ३५३ लाख, शंभू महादेव- २ कोटी ७ लाख रुपये.

- कोल्हापूर जिल्ह्यातील दौलत कारखाना १८ कोटी १२ लाख, आजरा शेतकरी १५ कोटी ४६ लाख, सांगली जिल्ह्यातील वसंतदादा शेतकरी ५ कोटी ५४ लाख, महाकाली ७ कोटी ९८ लाख, मानगंगा ३ कोटी ३३ लाख, पुणे जिल्ह्यातील केन ॲग्रो डोंगरी ८ कोटी ६६ लाख, यशवंत थेऊर १० कोटी ८४ लाख, सातारा जिल्ह्यातील रयत ९९५ लाख व न्यू फलटण २३ कोटी ६६ लाख रुपये.

- नाशिक जिल्ह्यातील के. के. वाघ २ कोटी ८५ लाख, के. जी. एस. ५२६ लाख, जालना जिल्ह्यातील समर्थ-१ कारखाना ३६५ लाख, समर्थ-२ कारखाना १९७ लाख, जय भवानी ७१२ लाख, व्ही.व्ही. पाटील ९६ लाख, जळगाव जिल्ह्यातील बेलगंगा १६ लाख, अंबाजी शुगर ३८६ लाख, चोपडा १५ कोटी ५८ लाख, मधुकर यावल १५ कोटी ८१ लाख,

नरसिंह लोहगाव (परभणी) २२१ लाख, महाराष्ट्र शेतकरी ४२२ लाख, पूर्णा ( हिंगोली) ११४ लाख, नांदेड जिल्ह्यातील एच.जे. पाटील ५५८ लाख, शंकर वागलवाडा १६ लाख, जय शिवशंकर १२९ लाख, लातूर जिल्ह्यातील शेतकरी किल्लारी ६२ लाख, पन्नगेश्वर ६६१ लाख व नागपूरच्या श्रीराम कारखान्याने ३८ लाख रुपये थकविले आहेत.