शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षात राज्यातील ४३ साखर कारखान्यांनी थकवले शेतकऱ्यांचे ३४२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर: गेल्या आठ वर्षात एफआरपीनुसार ३४२ कोटी ३७ लाख इतकी रक्कम राज्यातील ४३ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर: गेल्या आठ वर्षात एफआरपीनुसार ३४२ कोटी ३७ लाख इतकी रक्कम राज्यातील ४३ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकविले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आठ कारखान्यांकडे १२१ कोटी ४८ लाख रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत. ही रक्कम बुडाल्यात जमा असल्याचे सध्याचे चित्र आहे.

२०१२-१३ पासून एक-एक करीत राज्यातील ४३ साखर कारखान्यांकडे वरचेवर एफआरपीची रक्कम थकली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ साखर कारखान्यांनी गेल्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. २०१२-१३ पासून एफआरपीची रक्कम थकली असताना ती शेतकऱ्यांना मिळाली नाही व ती मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणा काही करू शकली नाही. मात्र या ४३ पैकी पाच साखर कारखान्यांनी थकलेल्यापैकी १२ कोटी ८५ हजार रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. या पाचसह उर्वरित ३८ साखर कारखान्यांकडे ३३० कोटी ३६ लाख रुपये अडकले आहेत.

थकबाकीत सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक आठ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १२१ कोटी ४८ लाख रुपये थकीत आहेत. तर सोलापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडील उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी १५ कोटी ९७ लाख रुपये थकवले आहेत.

-----------

या कारखानाने थकवली रक्कम

- सोलापूर जिल्हा- गोकूळ-१६ लाख, आदिनाथ- २३४ लाख, सीताराम महाराज खर्डी- २५ कोटी ४८ लाख, सहकार शिरोमणी वसंतराव काळे- १२ कोटी ४४ लाख, स्वामी समर्थ अक्कलकोट- ९ कोटी ७ लाख, आर्यन बार्शी- २१ कोटी ५ लाख, विजय शुगर करकंब- २० कोटी १८ लाख, शंकर अकलूज- ३० कोटी ७७ लाख रुपये.

उस्मानाबाद जिल्हा- भीमाशंकर- १६० लाख, जय लक्ष्मी- ७६९ लाख, तेरणा- १०९ लाख, नरसिंह इंदापूर- ३५३ लाख, शंभू महादेव- २ कोटी ७ लाख रुपये.

- कोल्हापूर जिल्ह्यातील दौलत कारखाना १८ कोटी १२ लाख, आजरा शेतकरी १५ कोटी ४६ लाख, सांगली जिल्ह्यातील वसंतदादा शेतकरी ५ कोटी ५४ लाख, महाकाली ७ कोटी ९८ लाख, मानगंगा ३ कोटी ३३ लाख, पुणे जिल्ह्यातील केन ॲग्रो डोंगरी ८ कोटी ६६ लाख, यशवंत थेऊर १० कोटी ८४ लाख, सातारा जिल्ह्यातील रयत ९९५ लाख व न्यू फलटण २३ कोटी ६६ लाख रुपये.

- नाशिक जिल्ह्यातील के. के. वाघ २ कोटी ८५ लाख, के. जी. एस. ५२६ लाख, जालना जिल्ह्यातील समर्थ-१ कारखाना ३६५ लाख, समर्थ-२ कारखाना १९७ लाख, जय भवानी ७१२ लाख, व्ही.व्ही. पाटील ९६ लाख, जळगाव जिल्ह्यातील बेलगंगा १६ लाख, अंबाजी शुगर ३८६ लाख, चोपडा १५ कोटी ५८ लाख, मधुकर यावल १५ कोटी ८१ लाख,

नरसिंह लोहगाव (परभणी) २२१ लाख, महाराष्ट्र शेतकरी ४२२ लाख, पूर्णा ( हिंगोली) ११४ लाख, नांदेड जिल्ह्यातील एच.जे. पाटील ५५८ लाख, शंकर वागलवाडा १६ लाख, जय शिवशंकर १२९ लाख, लातूर जिल्ह्यातील शेतकरी किल्लारी ६२ लाख, पन्नगेश्वर ६६१ लाख व नागपूरच्या श्रीराम कारखान्याने ३८ लाख रुपये थकविले आहेत.