शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

ऊस पीक ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील आठ धरणांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 16:59 IST

ऊस पिकाखालील क्षेत्र ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील टेंभू उपसा सिंचन, उजनी, मुळा, निम्न माना, हतनूर, उर्ध्वपूस, कानोळी, नाला(नागपूर) व अंबोली(सिंधुदुर्ग) या प्रकल्पांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली

ठळक मुद्देनाबार्डकडून कर्ज उपलब्ध करण्यात येणार राज्यात उसाचे सर्वसाधारण ९ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रसध्या सव्वादोन लाख हेक्टर ठिबक ऊस क्षेत्र

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २६ : ऊस पिकाखालील क्षेत्र ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील टेंभू उपसा सिंचन, उजनी, मुळा, निम्न माना, हतनूर, उर्ध्वपूस, कानोळी, नाला(नागपूर) व अंबोली(सिंधुदुर्ग) या प्रकल्पांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली असून, प्रतिहेक्टरी ८५ हजार ४०० दोन टक्के दराने शेतकºयांना कर्जरुपाने दिले जाणार आहेत. राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्टÑात वरचेवर ऊस पिकाचे क्षेत्र वाढत आहे. उसासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, ठिबकचा वापर केला तर किमान ४० टक्के पाण्याची बचत होईल असा अभ्यासकांचा अंदाज आहे. राज्यातील एकूण उपलब्ध पाणी साठ्यांपैकी सुमारे ७० टक्के पाणी हे सिंचनासाठी वापरले जात असल्याचा शासनाचा दावा आहे. एक-दोन वर्षांनंतर राज्याच्या विविध भागात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होते.   त्यामुळे ठिबक सिंचनाचा अवलंब केला तर दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यावर शेतीचे काहीअंशी तरी नुकसान टळण्यास मदत होणार आहे. यासाठी नाबार्डकडून कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रतिहेक्टरी ८५ हजार ४०० च्या मर्यादेत  पाच वर्षांच्या परतफेडीच्या अटीवर कर्ज दिले जाणार आहे. राज्य शासन, साखर कारखाना व शेतकरी  अशी संयुक्त योजना राबवली जाणार आहे.एका शेतकºयाला पाच हेक्टर मर्यादेत दिले जाणारे कर्ज राज्य व जिल्हा बँकेकडून वितरित केले जाणार आहे.--------------------- सध्या सव्वादोन लाख हेक्टर ठिबक ऊस क्षेत्र- राज्यात उसाचे सर्वसाधारण ९ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र.- त्यापैकी सध्या दोन लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र ठिबकखाली.- उर्वरित ७.१८ लाख हेक्टर क्षेत्रापैैकी नद्या नाले, विहिरी, नैसर्गिक प्रवाह, ओढे आदीच्या पाण्यावरील क्षेत्र प्रामुख्याने ठिबकवर आणण्याचे शासनाचे आदेश आहेत.- पहिल्या टप्प्यात १७-१८ मध्ये एक लाख ५ हजार व दुसºया टप्प्यात २०१८-१९ मध्ये एक लाख ५५ हजार हेक्टर असे एकूण ३ लाख पाच हजार हेक्टर क्षेत्र ठिबकखाली आणण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.- कोकण, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्टÑातील आठ प्रकल्पाखालील ऊस ठिबकखाली आणण्याचे उद्दिष्ट.