शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तुकडेबंदी कायद्याचा परिणाम; सोलापुरातील गुंठेवारीचे खरेदी-विक्री व्यवहार राेखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 16:22 IST

जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळाली तरच व्यवहाराला परवानगी

साेलापूर : राज्य सरकारच्या तुकडेबंदी कायद्याचे कारण देऊन दुय्यम निबंधकांनी गुंठेवारीचे खरेदी-विक्री व्यवहार राेखले आहेत. याचा फटका हद्दवाढ भागातील अनेक मिळकतदारांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय गुंठेवारीचा काेणताही व्यवहार हाेणार नाही, असे मुद्रांक जिल्हाधिकारी गाेविंद गीते यांनी बुधवारी स्पष्ट केले.

राज्य सरकारने नुकतेच तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. अनेक लाेक एकर-दाेन एकर जागेत दाेन किंवा तीन गुंठ्यांचे तुकडे पाडून खरेदी-विक्री व्यवहार करीत हाेते. या व्यवहारांना आळा घालण्यात आला आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्या नवीन आदेशानुसार तुकडे जमिनीचे अंतिम ले-आऊट मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. या परवानगीशिवाय दस्त नाेंदणी हाेणार नाही. महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडील लेआऊट मंजूर असेल तरच दस्त नाेंदणी हाेईल. यापूर्वी ज्यांनी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरेदी घेतली असेल तर अशा तुकड्याच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी सुद्धा तुकडेबंदी कायद्यातील कलम ८-ब नुसार संबंधित प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक राहणार आहे. भूमी अभिलेख विभागामार्फत हद्द निश्चित होऊन किंवा मोजणी होऊन त्याचा स्वतंत्र हद्द निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल तर त्या क्षेत्राची विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. त्या तुकड्याच्या विभाजनास शर्ती लागू राहतील, असेही दुय्यम निबंधक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

..........

हद्दवाढला माेठा फटका

महापालिका आयुक्तांनी गुंठेवारी क्षेत्रातील बांधकाम परवाने राेखले आहेत. आता मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने खरेदी-विक्री व्यवहार राेखले आहेत. शहराच्या हद्दवाढ भागात गुंठेवारीचे प्लाॅट्स आहेत. या सर्वांना नव्या निर्णयाचा फटका बसणार आहे.

गुंठ्यांमध्ये जमिनी विकताना संबंधित जमिनीचे ले-आऊट मंजूर असणे अपेक्षित होते, परंतु काही लोक तुकडा जमिनीचे ले-आऊट मंजूर न करताच खरेदी-विक्री करत होते. आता अशा फसवणूक प्रकरणाला आळा बसेल.

गाेविंद गीते, मुद्रांक जिल्हाधिकारी

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयagricultureशेती