शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा परिणाम; नोव्हेंबर संपत आला तरी रब्बीची पेरणी ५९ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 19:23 IST

सोलापूर जिल्ह्यातील चित्र; हंगाम लांबल्याने हरभरा, गव्हावर भर

सोलापूर : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील पाणी न हटल्याने नोव्हेंबर संपत आला तरी सोलापूर जिल्ह्यात यंदा रब्बीच्या पेरण्या सुरूच आहेत. हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांनी हरभरा आणि गव्हाची लागवड करण्यावर भर दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीचे सर्वाधिक म्हणजे ३ लाख ५० हजार ८१७ हेक्टर इतके क्षेत्र आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रब्बीच्या पेरणीला सुरूवात केली जाते. पण यंदा याच काळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले गेले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पेरण्या होण्यास अडचण निर्माण झाली. सखल भागातील पाणी आटल्यावर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपत्या घेतल्या. पण ओढे, नाले, कालवे आणि नदी शेजारी असलेल्या क्षेत्रात पाणी साचून राहिल्याने पेरण्या करता आल्या नाहीत. वाफसा येईल तसे शेतकऱ्यांनी पेरण्यास सुरूवात केली आहे. आता ज्वारीच्या पेरणीला विलंब झाल्याने गहू व हरभरा पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.

१८ नोव्हेंबरअखेर ५९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची कृषी विभागाकडे नोंद झाली आहे. पीकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र पुढीलप्रमाणे असून, कंसातील आकडे सरासरी क्षेत्र दर्शवित आहेत. ज्वारी: २ लाख २७ हजार ३५५ (३ लाख ५0 हजार), मका: १८ हजार ७२१ (३४ हजार २५८), गहू: ९ हजार ८0 (३८ हजार ८0३), हरभरा: ३३ हजार ११२ (५७ हजार ७९), तीळ: १४ (२३), जवस: १२२ (१४७), सूर्यफूल: ७५ (२ हजार २0५), करडई: ७५0 (२ हजार ६२७).

ऊस लागवडीवर भर

अतिवृष्टीमुळे यंदा रब्बी पेरणीला विलंब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता गहू व हरभऱ्याच्या पेरणीवर भर दिला आहे. त्याचबरोबर उसाचे क्षेत्र घटले होते. पण आता पाण्याची सोय झाल्याने सिंचन असलेले शेतकरी पुन्हा ऊस शेतीकडे वळले असून, लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.  

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीfloodपूर