शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

अतिवृष्टीचा परिणाम; नोव्हेंबर संपत आला तरी रब्बीची पेरणी ५९ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 19:23 IST

सोलापूर जिल्ह्यातील चित्र; हंगाम लांबल्याने हरभरा, गव्हावर भर

सोलापूर : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील पाणी न हटल्याने नोव्हेंबर संपत आला तरी सोलापूर जिल्ह्यात यंदा रब्बीच्या पेरण्या सुरूच आहेत. हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांनी हरभरा आणि गव्हाची लागवड करण्यावर भर दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीचे सर्वाधिक म्हणजे ३ लाख ५० हजार ८१७ हेक्टर इतके क्षेत्र आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रब्बीच्या पेरणीला सुरूवात केली जाते. पण यंदा याच काळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले गेले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पेरण्या होण्यास अडचण निर्माण झाली. सखल भागातील पाणी आटल्यावर शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपत्या घेतल्या. पण ओढे, नाले, कालवे आणि नदी शेजारी असलेल्या क्षेत्रात पाणी साचून राहिल्याने पेरण्या करता आल्या नाहीत. वाफसा येईल तसे शेतकऱ्यांनी पेरण्यास सुरूवात केली आहे. आता ज्वारीच्या पेरणीला विलंब झाल्याने गहू व हरभरा पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.

१८ नोव्हेंबरअखेर ५९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची कृषी विभागाकडे नोंद झाली आहे. पीकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र पुढीलप्रमाणे असून, कंसातील आकडे सरासरी क्षेत्र दर्शवित आहेत. ज्वारी: २ लाख २७ हजार ३५५ (३ लाख ५0 हजार), मका: १८ हजार ७२१ (३४ हजार २५८), गहू: ९ हजार ८0 (३८ हजार ८0३), हरभरा: ३३ हजार ११२ (५७ हजार ७९), तीळ: १४ (२३), जवस: १२२ (१४७), सूर्यफूल: ७५ (२ हजार २0५), करडई: ७५0 (२ हजार ६२७).

ऊस लागवडीवर भर

अतिवृष्टीमुळे यंदा रब्बी पेरणीला विलंब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता गहू व हरभऱ्याच्या पेरणीवर भर दिला आहे. त्याचबरोबर उसाचे क्षेत्र घटले होते. पण आता पाण्याची सोय झाल्याने सिंचन असलेले शेतकरी पुन्हा ऊस शेतीकडे वळले असून, लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.  

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीfloodपूर