शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
5
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
6
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
8
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
9
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
10
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
11
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
12
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
13
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
14
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
15
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
16
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
17
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
18
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
19
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
20
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...

ईईएसएल कंपनीचा एलईडीचा मक्ता रद्द करण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 10:57 IST

सोलापूर महापालिकेचे नगरसेवक वैतागले; भाजप, शिवसेना, एमआयएम सदस्यांचा पुढाकार

ठळक मुद्देमहापालिकेच्या वीज बिलात बचत व्हावी यासाठी शहरातील पथदिव्यांवर ४० हजार एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय झालाजानेवारी २०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली. गेल्या आठ महिन्यात ३१ हजार दिवे बसविण्यात आलेसोलापूर शहरातील पथदिव्यांवर एलईडी बसविण्याचे काम संथगतीने सुरू आहे

सोलापूर : शहरातील पथदिव्यांवर एलईडी बसविण्याचे काम संथगतीने सुरू आहे. वीज बिल बचतीचा उद्देश सफल झालेला नाही. त्यामुळे एलईडी दिवे बसविण्यासाठी ईईएसएल कंपनीला दिलेला मक्ता रद्द करण्यात यावा, असा सभासद प्रस्ताव भाजप, शिवसेना, एमआयएमच्या नगरसेवकांनी  दाखल केला.

महापालिकेच्या वीज बिलात बचत व्हावी यासाठी शहरातील पथदिव्यांवर ४० हजार एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय झाला. यासाठी महापालिका, स्मार्ट सिटी कंपनी आणि ईईएसएल कंपनीमध्ये करार झाला होता. जानेवारी २०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली. गेल्या आठ महिन्यात ३१ हजार दिवे बसविण्यात आले आहेत. पण अनेक दिवे बंद पडल्याची तक्रार नगरसेवक करीत आहेत. मनपाची सर्वसाधारण सभा २७ आॅगस्ट रोजी होणार आहे.

यापार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ आणि सुभाष शेजवाल यांनी गुरुवारी सभासद प्रस्ताव दाखल केला. यावर भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील, संतोष भोसले, शिवसेनेचे राजकुमार हंचाटे, शिवसेनेचे भारतसिंग बडूरवाले, एमआयएमचे रियाज खरादी यांच्या सह्या आहेत. ईईएसएल कंपनीला एलईडीचे काम पूर्ण करण्यासाठी १० जून २०१९ चा कालावधी देण्यात आला होता. कंपनीला १७ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. करारपत्राप्रमाणे कंपनीने शहरात उत्तम दर्जाचे दिवे बसविणे आवश्यक असताना हलक्या दर्जाचे दिवे बसविले आहेत. आजवर ३० हजार ३५६ दिवे बसविले आहेत. त्यातील २० टक्के दिवे बंद आहेत. ज्या ठिकाणी १०० किंवा ७० वॅटचे दिवे बसविण्यात येणार होते त्या ठिकाणी ४५, ३५ आणि २४ वॅटचे दिवे बसविले आहेत. रस्त्यावर पुरेसा प्रकाश न पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरसेवकांनी वेळोवेळी लक्षवेधी उपस्थित करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. 

विद्युत विभाग म्हणते ३९ लाख रुपयांची बचत - एलईडी बसविल्यामुळे महापालिकेचा वीज बचतीचा उद्देश सफल झाला नसल्याचा आरोप भाजप, शिवसेना आणि एमआयएमचे नगरसेवक करीत आहेत; मात्र महापालिकेच्या गेल्या महिन्यातील वीज बिलात ३९ लाख रुपयांची बचत झाल्याचा दावा विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी यांनी केला आहे. एलईडी दिवे बंद पडण्याच्या तक्रारी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 

एलईडी दिवे बसविण्याचे काम कंत्राटदार करीत आहे. मनपाच्या विद्युत विभागातील कर्मचारी बसून आहेत. त्यांनी किमान बंद पडलेले दिवे बदलून घ्यायला हवेत. विद्युत विभागाच्या प्रमुखाने याकडे लक्ष द्यायला हवे. प्रशासनाचा वचक नसल्याने अनेक भागातील एलईडी बंद पडले आहेत. लोक वैतागले आहेत. त्यासाठी कंत्राटदाराचा मक्ता रद्द करायला हवा. - नागेश वल्याळ, नगरसेवक, भाजप. 

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीmahavitaranमहावितरणSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका