शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ईईएसएल कंपनीचा एलईडीचा मक्ता रद्द करण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 10:57 IST

सोलापूर महापालिकेचे नगरसेवक वैतागले; भाजप, शिवसेना, एमआयएम सदस्यांचा पुढाकार

ठळक मुद्देमहापालिकेच्या वीज बिलात बचत व्हावी यासाठी शहरातील पथदिव्यांवर ४० हजार एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय झालाजानेवारी २०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली. गेल्या आठ महिन्यात ३१ हजार दिवे बसविण्यात आलेसोलापूर शहरातील पथदिव्यांवर एलईडी बसविण्याचे काम संथगतीने सुरू आहे

सोलापूर : शहरातील पथदिव्यांवर एलईडी बसविण्याचे काम संथगतीने सुरू आहे. वीज बिल बचतीचा उद्देश सफल झालेला नाही. त्यामुळे एलईडी दिवे बसविण्यासाठी ईईएसएल कंपनीला दिलेला मक्ता रद्द करण्यात यावा, असा सभासद प्रस्ताव भाजप, शिवसेना, एमआयएमच्या नगरसेवकांनी  दाखल केला.

महापालिकेच्या वीज बिलात बचत व्हावी यासाठी शहरातील पथदिव्यांवर ४० हजार एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय झाला. यासाठी महापालिका, स्मार्ट सिटी कंपनी आणि ईईएसएल कंपनीमध्ये करार झाला होता. जानेवारी २०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली. गेल्या आठ महिन्यात ३१ हजार दिवे बसविण्यात आले आहेत. पण अनेक दिवे बंद पडल्याची तक्रार नगरसेवक करीत आहेत. मनपाची सर्वसाधारण सभा २७ आॅगस्ट रोजी होणार आहे.

यापार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ आणि सुभाष शेजवाल यांनी गुरुवारी सभासद प्रस्ताव दाखल केला. यावर भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील, संतोष भोसले, शिवसेनेचे राजकुमार हंचाटे, शिवसेनेचे भारतसिंग बडूरवाले, एमआयएमचे रियाज खरादी यांच्या सह्या आहेत. ईईएसएल कंपनीला एलईडीचे काम पूर्ण करण्यासाठी १० जून २०१९ चा कालावधी देण्यात आला होता. कंपनीला १७ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. करारपत्राप्रमाणे कंपनीने शहरात उत्तम दर्जाचे दिवे बसविणे आवश्यक असताना हलक्या दर्जाचे दिवे बसविले आहेत. आजवर ३० हजार ३५६ दिवे बसविले आहेत. त्यातील २० टक्के दिवे बंद आहेत. ज्या ठिकाणी १०० किंवा ७० वॅटचे दिवे बसविण्यात येणार होते त्या ठिकाणी ४५, ३५ आणि २४ वॅटचे दिवे बसविले आहेत. रस्त्यावर पुरेसा प्रकाश न पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरसेवकांनी वेळोवेळी लक्षवेधी उपस्थित करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. 

विद्युत विभाग म्हणते ३९ लाख रुपयांची बचत - एलईडी बसविल्यामुळे महापालिकेचा वीज बचतीचा उद्देश सफल झाला नसल्याचा आरोप भाजप, शिवसेना आणि एमआयएमचे नगरसेवक करीत आहेत; मात्र महापालिकेच्या गेल्या महिन्यातील वीज बिलात ३९ लाख रुपयांची बचत झाल्याचा दावा विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी यांनी केला आहे. एलईडी दिवे बंद पडण्याच्या तक्रारी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 

एलईडी दिवे बसविण्याचे काम कंत्राटदार करीत आहे. मनपाच्या विद्युत विभागातील कर्मचारी बसून आहेत. त्यांनी किमान बंद पडलेले दिवे बदलून घ्यायला हवेत. विद्युत विभागाच्या प्रमुखाने याकडे लक्ष द्यायला हवे. प्रशासनाचा वचक नसल्याने अनेक भागातील एलईडी बंद पडले आहेत. लोक वैतागले आहेत. त्यासाठी कंत्राटदाराचा मक्ता रद्द करायला हवा. - नागेश वल्याळ, नगरसेवक, भाजप. 

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीmahavitaranमहावितरणSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका