शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

कोरोना काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात सोलापूर जिल्ह्यात दिसून आले नवीन चेहरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 12:59 IST

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान : संसर्ग कमी झाला अन्‌ गुन्हेही वाढले

सोलापूर :  कोरोनाकाळात झालेल्या गुन्ह्यांमध्ये नवीन चेहरे पुढे आले आहेत. त्यामुळे तपास कामात पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाच्या बंदोबस्तापासून आता कुठे थोडाफार आराम पोलिसांना मिळाला असला तरी झालेल्या गुन्ह्यांचा तपास हे एक आव्हान पोलिसांसमोर आहे. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी जाहीर केली होती. 

सलग तीन ते चार महिने संचारबंदी लागू करण्यात आली होती. जून २०२० मध्ये हळूहळू संचारबंदी शिथिल करण्यात येऊ लागली होती. मात्र, नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी पोलिसांकडून घेतली जात होती. कोरोनाची संख्या कमी होऊ लागल्याने व्यवहार सुरळीत होऊ लागले होते. दरम्यान, पुन्हा फेब्रुवारी २०२१ मध्ये अचानक त्याचा प्रादुर्भाव वाढला आणि पुन्हा शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा चोऱ्यामाऱ्या, खून, खुनाचे प्रयत्न हाणामारीसारख्या घटना वाढल्या होत्या. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये असलेल्या २५ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले होते. दाखल गुन्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा नवीन गुन्हेगार पुढे येत होते. या प्रकारामुळे पोलिसांना तपास करणे आव्हान ठरत होते. 

कोरोनाकाळामध्ये संचारबंदीमुळे एवढे गुन्हे दाखल झाले नव्हते. मात्र, नंतरच्या काळात काही प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने गुन्ह्यांचा तपास लावण्यास सुरुवात करण्यात आली. तडीपार एमपीडीएसारख्या कारवाया करून गुन्हेगारीवर आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काहींवर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.-अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक

कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद असल्याने अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. हा मार्ग चुकीचा असल्याचे कळत असले तरी मानसिक ताण व आर्थिक विवंचनेतून ते असे पाऊल उचलतात. यात युवक वर्ग जास्त असतो. तो हुशार असतो. आता अडचणीत असलो तरी भविष्याचा विचार करून चांगल्या मार्गाकडे जाणे गरजेचे आहे. यात त्यांच्या कुटुंबाची महत्त्वाची भूमिका आहे.- डॉ. कुंदन कांबळे,  मानसोपचारतज्ज्ञ, शासकीय रुग्णालय

गुन्हेगारीत नवे चेहरे का आले?

  • - कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेल्यामुळे तरुणवर्ग गुन्हेगारीकडे वळला आहे. चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
  • - आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळेही गुन्हेगार वाढल्याचे प्रकार आढळून आले आहेत.
  • - शेतजमिनीचा वाद, संपत्तीचा वाद यातूनही अनेक गावांमध्ये हाणामारीसारख्या घटना घडल्या आहेत. 

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस