शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी केवळ पंधरा दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 13:24 IST

कोरोना संसर्ग : मृत्यूदर कमी करण्यावर मात्र सुरू आहेत प्रशासनाचे प्रयत्न

ठळक मुद्देग्रामीणमध्ये सद्यस्थितीत ७१३ प्रतिबंधित क्षेत्र कार्यरत असून, यात ३ लाख २४ हजार ७५३ इतकी लोकसंख्या निरीक्षणाखाली कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात अँटिजेन टेस्टसह पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर राबवली जात आहे

सोलापूर : ग्रामीणमध्ये जुलै महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १२ दिवसांचा होता तर तो आता आॅगस्टमध्ये १५ दिवसांवर आला आहे. चाचण्या वाढल्याने रुग्णांचा शोध होत आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली.

जुलैअखेर जिल्हा आरोग्य विभागाने २६ हजार ७१५ चाचण्या केल्या होत्या. यात २३ हजार १९ रुग्ण निगेटिव्ह तर ३ हजार ६५३ रुग्ण पॉझिटीव्ह आले होते. आता १७ आॅगस्टपर्यंत ६३ हजार ३६६ चाचण्या झाल्या. त्यात ६३ हजार २६0 अहवाल प्राप्त झाले. यात ५५ हजार ३८३ जण निगेटिव्ह आले तर ७ हजार ८७८ जण निगेटिव्ह आले. पॉझिटीव्ह येण्याचा दर १२.४५ टक्के आहे. जुलैअखेर हा दर १३.६९ टक्के होता. आॅगस्ट महिन्यात बरे होण्याचे प्रमाणही ५८ टक्क्यावरून ६१ टक्क्यावर गेले आहे. ग्रामीणमध्ये १६ आॅगस्टपर्यंत ४५ हजार ५७१ रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या असून, यात ४ हजार ३९ जण पॉझिटीव्ह आले आहेत तर ४0 हजार ३२६ जण निगेटिव्ह आले आहेत.

ग्रामीणमध्ये सद्यस्थितीत ७१३ प्रतिबंधित क्षेत्र कार्यरत असून, यात ३ लाख २४ हजार ७५३ इतकी लोकसंख्या निरीक्षणाखाली आहे. या क्षेत्रात जिल्हा आरोग्य विभागाची ८८७ पथके सर्वेक्षणासाठी कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून  कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात अँटिजेन टेस्टसह पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर राबवली जात आहे.

बाधित गावांची संख्या वाढली

  • - १३ आॅगस्टपर्यंत ग्रामीणमध्ये १0२९ पैकी ६0९ गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग पोहोचला नव्हता. ४२0 गावातच आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले होते. पण आता गेल्या चार दिवसात ही संख्या वाढली आहे. 
  • - ४७८ गावात आता कोरोना पोहोचला आहे. चार दिवसात ५८ गावांची भर पडली आहे. यात बार्शी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १३0 पैकी ७५ गावे, पंढरपूर:  ९४ पैकी ५७ गावे, अक्कलकोट: ११७ पैकी ४७ गावे, करमाळा: १0५ पैकी २४ गावे, माढा: १0८ पैकी ३९ गावे, माळशिरस: १0७ पैकी ५४, मंगळवेढा: ७९ पैकी ३0, मोहोळ: ९४ पैकी ४४, सांगोला: ७६ पैकी ३१, दक्षिण सोलापूर: ८३ पैकी ५२ आणि उत्तर सोलापुरातील ३६ पैकी २५ गावे बाधित झाली आहेत.
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद