शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी केवळ पंधरा दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 13:24 IST

कोरोना संसर्ग : मृत्यूदर कमी करण्यावर मात्र सुरू आहेत प्रशासनाचे प्रयत्न

ठळक मुद्देग्रामीणमध्ये सद्यस्थितीत ७१३ प्रतिबंधित क्षेत्र कार्यरत असून, यात ३ लाख २४ हजार ७५३ इतकी लोकसंख्या निरीक्षणाखाली कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात अँटिजेन टेस्टसह पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर राबवली जात आहे

सोलापूर : ग्रामीणमध्ये जुलै महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १२ दिवसांचा होता तर तो आता आॅगस्टमध्ये १५ दिवसांवर आला आहे. चाचण्या वाढल्याने रुग्णांचा शोध होत आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली.

जुलैअखेर जिल्हा आरोग्य विभागाने २६ हजार ७१५ चाचण्या केल्या होत्या. यात २३ हजार १९ रुग्ण निगेटिव्ह तर ३ हजार ६५३ रुग्ण पॉझिटीव्ह आले होते. आता १७ आॅगस्टपर्यंत ६३ हजार ३६६ चाचण्या झाल्या. त्यात ६३ हजार २६0 अहवाल प्राप्त झाले. यात ५५ हजार ३८३ जण निगेटिव्ह आले तर ७ हजार ८७८ जण निगेटिव्ह आले. पॉझिटीव्ह येण्याचा दर १२.४५ टक्के आहे. जुलैअखेर हा दर १३.६९ टक्के होता. आॅगस्ट महिन्यात बरे होण्याचे प्रमाणही ५८ टक्क्यावरून ६१ टक्क्यावर गेले आहे. ग्रामीणमध्ये १६ आॅगस्टपर्यंत ४५ हजार ५७१ रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या असून, यात ४ हजार ३९ जण पॉझिटीव्ह आले आहेत तर ४0 हजार ३२६ जण निगेटिव्ह आले आहेत.

ग्रामीणमध्ये सद्यस्थितीत ७१३ प्रतिबंधित क्षेत्र कार्यरत असून, यात ३ लाख २४ हजार ७५३ इतकी लोकसंख्या निरीक्षणाखाली आहे. या क्षेत्रात जिल्हा आरोग्य विभागाची ८८७ पथके सर्वेक्षणासाठी कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून  कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात अँटिजेन टेस्टसह पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर राबवली जात आहे.

बाधित गावांची संख्या वाढली

  • - १३ आॅगस्टपर्यंत ग्रामीणमध्ये १0२९ पैकी ६0९ गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग पोहोचला नव्हता. ४२0 गावातच आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले होते. पण आता गेल्या चार दिवसात ही संख्या वाढली आहे. 
  • - ४७८ गावात आता कोरोना पोहोचला आहे. चार दिवसात ५८ गावांची भर पडली आहे. यात बार्शी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १३0 पैकी ७५ गावे, पंढरपूर:  ९४ पैकी ५७ गावे, अक्कलकोट: ११७ पैकी ४७ गावे, करमाळा: १0५ पैकी २४ गावे, माढा: १0८ पैकी ३९ गावे, माळशिरस: १0७ पैकी ५४, मंगळवेढा: ७९ पैकी ३0, मोहोळ: ९४ पैकी ४४, सांगोला: ७६ पैकी ३१, दक्षिण सोलापूर: ८३ पैकी ५२ आणि उत्तर सोलापुरातील ३६ पैकी २५ गावे बाधित झाली आहेत.
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद