शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

चाचणी लेखापरीक्षणामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या पदाधिकाºयांच्या अडचणी वाढणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 08:57 IST

सखोल तपासणीसाठी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश तत्कालीन विभागीय सहनिबंधक दीपक तावरे यांनी दिले

ठळक मुद्देचाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश तत्कालीन विभागीय सहनिबंधक दीपक तावरे यांनी दिले जिल्हा बँकेच्या पदाधिकाºयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

सोलापूर: विनातारण, असुरक्षित कर्ज वाटप करणे, अशा प्रकारचे कर्ज वसूल न करता अनावश्यक मुदतवाढ देणे, तारण साखरेची परस्पर विक्री करणे व विक्रीचे पैसे बँकेच्या कर्जापोटी भरले नसतानाही लेखापरीक्षकांनी जुजबी आक्षेप नोंदविले. यामुळेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाशी संबंधित ४३ युनिटच्या  कर्ज मंजुरीपासून विनियोगापर्यंतच्या सखोल तपासणीसाठी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश तत्कालीन विभागीय सहनिबंधक दीपक तावरे यांनी दिले आहेत. यामुळे जिल्हा बँकेच्या पदाधिकाºयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केल्याने थकबाकीचे प्रमाण वाढल्याच्या मुद्यावर बार्शीचे माजी आ. राजेंद्र राऊत हे उच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतरही संचालक मंडळाशी संबंधित संस्थांचे कर्ज वसूल झाले नाही. विनातारण, असुरक्षित कर्ज वाटप करणे, अशा प्रकारचे कर्ज वसूल न करता अनावश्यक मुदतवाढ देणे, तारण साखरेची परस्पर विक्री करणे व विक्रीचे पैसे बँकेच्या कर्जापोटी भरले नाहीत. संचालकांशी संबंधित साखर कारखाने, शिक्षण संस्था व अन्य संस्थांना दिलेल्या कर्जाबाबत लेखापरीक्षकांनी जुजबी आक्षेप नोंदविले. वाढणाºया थकबाकीकडे संचालकांनी गांभीर्याने पाहिले नसल्याने बँकेच्या ‘एनपीए’ त दरवर्षी वाढच होत आहे. असे असतानाही संचालक कर्ज भरत नसल्याने नाबार्डने तपासणीत आक्षेप नोंदविले. याकडेही गांभीर्याने पाहिले नसल्याने संचालक मंडळ बरखास्त झाले व प्रशासक नियुक्त झाले. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार विभागीय सहनिबंधकांनी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले असून विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ पुण े(फिरते पथक) सी.वाय. पिंगळे यांची नियुक्ती केली आहे. पिंगळे यांना एक महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संचालकांवरील आक्षेप

  • - अनेक साखर कारखान्यांचा नेटवर्क वजा असताना शासनाची थकहमी न घेता कर्ज मंजूर व वितरित केले. संचालक (विश्वस्त)च्या संस्थांना कर्ज देण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतली नाही.
  • - खासगी गूळ व साखर कारखान्यांना दिलेले अल्पमुदतीचे कर्ज थकीत जाऊ नये यासाठी अनावश्यक मुदतवाढ दिली.
  • - खासगी व सहकारी साखर कारखान्यांकडे साखर साठा शिल्लक नसल्याने मालतारण कर्ज विनातारण झाले आहे. असे असताना संचालकांवर कारवाई केली नाही.
  • - बँकेच्या कर्जविषयक धोरणात संचालकांशी संबंधित संस्थांना दिलेल्या कर्जाचा समावेश नसल्याने कंपन्यांना दिलेले कर्ज धोरणाबाह्य झाले आहे. दिलेल्या कर्जाचा बोजा काटेकोरपणे नोंदविला नाही.
टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र