शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

या कारणामुळे झाले सोलापूर जिल्ह्यातील आयुष्यमान योजनेचे काम कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 10:30 IST

नोडल अधिकारी नियुक्ती करण्यात झाली चूक: जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घातल्यावर दिले तालुका अधिकाऱ्यांना अधिकार

ठळक मुद्देगरीब कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यासाठी पाच लाखांच्या विम्याचे कवचसोलापूर जिल्ह्याने सर्वेक्षणाचे काम वेगाने केल्याने सर्वेक्षणात आलेल्या कुटुंबांना आयुष्यमान योजनेचे कार्ड वितरित

सोलापूर : नोडल अधिकारी नियुक्त करण्यात गफलत झाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या आयुष्यमान योजनेचे काम कमी झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येक तालुक्याच्या वैद्यकीय अधिकाºयांना अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.  गरीब कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यासाठी पाच लाखांच्या विम्याचे कवच देण्यासाठी केंद्र शासनाने आयुष्यमान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जिल्ह्यात सन २०१७-१८ मध्ये सर्वेक्षण करून आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्यात आला. राज्यात सोलापूर जिल्ह्याने सर्वेक्षणाचे काम वेगाने केल्याने सर्वेक्षणात आलेल्या कुटुंबांना आयुष्यमान योजनेचे कार्ड वितरित करण्याची जिल्हा आरोग्य विभागावर जबाबदारी देण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अधिपत्याखाली झालेल्या बैठकीत या योजनेचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आयुष्यमान योजनेचे कार्ड वितरण करण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या योजनेत राज्यात अव्वल असलेल्या सोलापूरचे नाव खाली आले.  ही बाब निदर्शनाला आल्यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आरोग्य विभागाच्या दोन वेळा बैठका घेतला. जिल्ह्यात आरोग्य विभागाचे काम दोन विभागात चालते. ग्रामीण रुग्णालयाची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांवर आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या अधिपत्याखाली येतात. यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी जमादार यांच्या नियंत्रणाखालील तालुका आरोग्य अधिकाºयांनी आयुष्यमानचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप ढेले यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. यामुळे आयुष्यमान योजनेची अंमलबजावणी म्हणावी तशी झाली नाही. आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांमार्फत हे काम वेगाने उरकणे अपेक्षित होते. पण यात गडबड होत असल्याचे लक्षात आल्यावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मुख्य कार्यकारी प्रकाश वायचळ व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना योजनेच्या अंमलबजावणीत लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. आतापर्यंत दोन लाख कार्डांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले यांनी दिली. महापालिकेच्या क्षेत्रातही हे काम मागे पडल्याचे दिसून आले आहे. याबाबत महापालिका आयुक्त दीपक तावरे व आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना सूचना करण्यात आली आहे.  

आयुष्यमान योजना राबविण्यात त्रुटी असल्याचे दिसून आल्यावर आरोग्य विभागाच्या बैठका घेऊन अंमलबजावणीस गती दिली आहे. हे काम जलदगतीने उरकण्यासाठी आता तालुका वैद्यकीय अधिकाºयांनाच अधिकार दिले असून, त्यांना कामाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे आता हे काम वेगाने होईल, अशी अपेक्षा आहे.  -मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयayushman bharatआयुष्मान भारत