शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

अधिकाºयांच्या सुमार कामगिरीमुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा केवळ ५७ टक्के खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 13:01 IST

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ मधील सर्व विभागांच्या खर्चाचा ताळमेळ अद्यापही जुळलेला नाही. यावरुन अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थ विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार मार्च २०१८ अखेर जिल्हा वार्षिक योजना, शासन योजना आणि सेस निधीचा एकूण एकंदर खर्च ५७ टक्के झाला आहे. वार्षिक ...

ठळक मुद्देग्रामपंचायत, कृषी यासारख्या विभागांनाही व्यवस्थित खर्च करता आलेला नाहीव्यक्तिगत लाभाच्या योजनेत सर्व विभागांचा सरासरी २५ टक्के खर्च

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ मधील सर्व विभागांच्या खर्चाचा ताळमेळ अद्यापही जुळलेला नाही. यावरुन अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थ विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार मार्च २०१८ अखेर जिल्हा वार्षिक योजना, शासन योजना आणि सेस निधीचा एकूण एकंदर खर्च ५७ टक्के झाला आहे. वार्षिक योजना, शासन योजनेचे जवळपास ३३ कोटी रुपये अखर्चित राहिले आहेत. ते शासनाकडे परत जाणार आहेत. ही जिल्हा परिषदेची सुमार कामगिरी असल्याचे अर्थ समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. 

जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची सभा गुरुवारी सभापती विजयराज डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. झेडपीचा मार्चअखेर अद्यापही संपलेला नाही. दलित वस्ती योजनेचे १८ कोटी रुपये परत जाणार असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने नुकतेच प्रकाशित केले होते. त्याचे पडसाद या बैठकीतही उमटले. खातेप्रमुखांकडील खर्चाची आकडेवारी आणि अर्थ विभागाने सादर केलेल्या आकडेवारीत तफावत दिसली. त्यावरुन अ‍ॅड़  सचिन देशमुख, भारत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

तुम्ही प्रथम तुमचे हिशेब पूर्ण करा आणि मगच बैठकीला या, असे देशमुख यांनी सुनावले. कृषी विभागाचा एकूण खर्च ४० टक्के तर पशुसंवर्धन विभागाचा खर्च ४५ टक्के झाला आहे. समाजकल्याण व अपंग कल्याण विभागाच्या कारभारावर यंदा खूपच टीका झाली. या विभागात ४० टक्के खर्च झाला आहे. समाजकल्याण सभापती शीला शिवशरण यांनी अखर्चित प्रकरणाला तत्कालीन अधिकाºयांनाच जबाबदार धरले आहे. जिल्हा वार्षिक योजना आणि शासन योजना (हस्तांतर) यातील ३३ कोटी ४८ लाख शासनाला परत करावे लागणार असल्याचे अर्थ विभागातून सांगण्यात आले. 

सर्वच विभागांचा निधी वेळवर खर्च व्हावा यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे  आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी बैठका घेतल्या होत्या. डॉ. भारुड यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आढावा घेण्यासाठी तालुकास्तरावर पाठविले होते. पण यंत्रणेने फायलींचे घोळ कायम ठेवले. या अखर्चित निधीवरुनही सर्वसाधारण सभेत गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. 

ग्रामपंचायत, कृषी यासारख्या विभागांनाही व्यवस्थित खर्च करता आलेला नाही. व्यक्तिगत लाभाच्या योजनेत सर्व विभागांचा सरासरी २५ टक्के खर्च झालेला दिसतो. ही नामुष्की आहे. समाजकल्याण विभागाचे १७.५० कोटी रुपये शासनाला परत जाणे ही फार वाईट गोष्ट आहे. असे काही झालेच नाही, असे अधिकाºयांचे म्हणणे होते. गोरगरीब दलितांसाठी शासनाने दिलेला निधी परत जात असेल तर अधिकाºयांवर कारवाई झालीच पाहिजे. - अ‍ॅड़  सचिन देशमुख, सदस्य, अर्थ समिती.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद