शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या हवामानामुळे सोलापूर जिल्ह्यातील नुकसान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:54 IST

जागतिक हवामान दिन विशेष - सोलापूर जिल्ह्यात प्रभावी तंत्रज्ञानाची गरज

ठळक मुद्देअवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान शासनाने प्रभावी यंत्रणा स्थापन करण्याची गरज

समीर इनामदार सोलापूर: अचानक येणारा पाऊस, होणारी गारपीट तसेच वातावरणातील बदलांमुळे पिकांचे होणारे नुकसान यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी भांबावला असून, होणाºया परिणामांचा वेध घेण्यासाठी  प्रभावी यंत्रणांची गरज निर्माण झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हा कालावधी पावसाचा आहे. त्याशिवाय आॅक्टोबर ते डिसेंबर या काळातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडतो. मात्र आता कोणत्याही महिन्यात पाऊस पडू शकेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याशिवाय हवामानात बदल झाल्याने सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी पाऊस अशी विचित्र स्थितीही सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानात कोणते पीक घ्यावे किंवा या बदलाचा आरोग्यावर होणारा परिणाम याचा अभ्यास आता करावा लागणार आहे.

राज्यात हवामान बदलाचा स्वतंत्र विभाग आहे. त्याशिवाय उपग्रह, संगणकाचा वापर करूनही शेतकºयांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. अशा स्थितीत शेतकºयांनी कोणते वाण घ्यावे?, कोणत्याही वातावरणात टिकणारे बी-बियाणे संशोधित होत आहेत, त्याचीही माहिती मिळत नाही, ही अनेक शेतकºयांची खंत आहे.

२०३० पर्यंत सर्वसाधारणपणे ०.५ अंश इतके तापमान वाढेल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. अर्थात हवामान बदल होतो आहे किंवा नाही, याबाबत शास्त्रज्ञात दुमत आहे. काहींच्या मते ठराविक कालावधीनंतर असे बदल होत राहतात आणि हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे, याचा बाऊ करण्याचे काही कारण नाही. सोलापूरचे तापमान ४५ अंशांपर्यंत जाणे हे १५० वर्षांपासून सुरूच आहे. अलीकडच्या काळातच केवळ तापमानात वाढ झाली आहे, हे म्हणणे देखील तितके खरे नाही.

जगभरात पृथ्वीचे तापमान, वातावरण, हवामानाच्या प्रत्यक्ष नोंदी या १८५० पासून उपलब्ध आहेत. १९०६ ते २००५ या काळात तापमान ०.७४ अंशाने वाढले आहे. तर १९९६ ते २००८ या १२ वर्षांपैकी ११ वर्षे उष्ण तापमानाची म्हणून गणली गेली. २०१६ आणि २०१७ ही वर्षे सर्वाधिक उष्ण वर्षे म्हणूनही ओळखली जातात. हवामान बदलामुळे २०२० सालापर्यंत जगभरात २५ कोटी लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. काही देशात कृषी  उत्पन्न वाढेल तर काही देशात ते  कमी होईल. गारपीट, दुष्काळ,  महापूर, विजा कोसळण्याचे प्रमाण वाढेल, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

सोलापूरचे नुकसान- २०११, २०१४, २०१६, २०१७ या वर्षात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. दरवर्षी अशा नुकसानीमुळे शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे. अवकाळी पावसाविषयी अगोदरच कल्पना आली तर हे नुकसान कमी होईल. शासनाने प्रभावी यंत्रणा स्थापन करण्याची यानिमित्ताने गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरenvironmentवातावरणTemperatureतापमान