शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

बदलत्या हवामानामुळे सोलापूर जिल्ह्यातील नुकसान वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:54 IST

जागतिक हवामान दिन विशेष - सोलापूर जिल्ह्यात प्रभावी तंत्रज्ञानाची गरज

ठळक मुद्देअवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान शासनाने प्रभावी यंत्रणा स्थापन करण्याची गरज

समीर इनामदार सोलापूर: अचानक येणारा पाऊस, होणारी गारपीट तसेच वातावरणातील बदलांमुळे पिकांचे होणारे नुकसान यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी भांबावला असून, होणाºया परिणामांचा वेध घेण्यासाठी  प्रभावी यंत्रणांची गरज निर्माण झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हा कालावधी पावसाचा आहे. त्याशिवाय आॅक्टोबर ते डिसेंबर या काळातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडतो. मात्र आता कोणत्याही महिन्यात पाऊस पडू शकेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याशिवाय हवामानात बदल झाल्याने सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी पाऊस अशी विचित्र स्थितीही सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे या बदलत्या हवामानात कोणते पीक घ्यावे किंवा या बदलाचा आरोग्यावर होणारा परिणाम याचा अभ्यास आता करावा लागणार आहे.

राज्यात हवामान बदलाचा स्वतंत्र विभाग आहे. त्याशिवाय उपग्रह, संगणकाचा वापर करूनही शेतकºयांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. अशा स्थितीत शेतकºयांनी कोणते वाण घ्यावे?, कोणत्याही वातावरणात टिकणारे बी-बियाणे संशोधित होत आहेत, त्याचीही माहिती मिळत नाही, ही अनेक शेतकºयांची खंत आहे.

२०३० पर्यंत सर्वसाधारणपणे ०.५ अंश इतके तापमान वाढेल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. अर्थात हवामान बदल होतो आहे किंवा नाही, याबाबत शास्त्रज्ञात दुमत आहे. काहींच्या मते ठराविक कालावधीनंतर असे बदल होत राहतात आणि हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे, याचा बाऊ करण्याचे काही कारण नाही. सोलापूरचे तापमान ४५ अंशांपर्यंत जाणे हे १५० वर्षांपासून सुरूच आहे. अलीकडच्या काळातच केवळ तापमानात वाढ झाली आहे, हे म्हणणे देखील तितके खरे नाही.

जगभरात पृथ्वीचे तापमान, वातावरण, हवामानाच्या प्रत्यक्ष नोंदी या १८५० पासून उपलब्ध आहेत. १९०६ ते २००५ या काळात तापमान ०.७४ अंशाने वाढले आहे. तर १९९६ ते २००८ या १२ वर्षांपैकी ११ वर्षे उष्ण तापमानाची म्हणून गणली गेली. २०१६ आणि २०१७ ही वर्षे सर्वाधिक उष्ण वर्षे म्हणूनही ओळखली जातात. हवामान बदलामुळे २०२० सालापर्यंत जगभरात २५ कोटी लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. काही देशात कृषी  उत्पन्न वाढेल तर काही देशात ते  कमी होईल. गारपीट, दुष्काळ,  महापूर, विजा कोसळण्याचे प्रमाण वाढेल, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

सोलापूरचे नुकसान- २०११, २०१४, २०१६, २०१७ या वर्षात सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. दरवर्षी अशा नुकसानीमुळे शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे. अवकाळी पावसाविषयी अगोदरच कल्पना आली तर हे नुकसान कमी होईल. शासनाने प्रभावी यंत्रणा स्थापन करण्याची यानिमित्ताने गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरenvironmentवातावरणTemperatureतापमान