शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे २० टक्के रुग्ण चाळिशीच्या आतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:29 IST

जागतिक हृदय दिन : बदलती जीवनशैली कारणीभूत, तणाव अन् फास्टफूडही धोकादायक

ठळक मुद्देसोलापूर शहरात प्रदूषण व धूळ जास्त आहे. याचा थेट संबंध हृदयरोगाशी येत नाही फुप्फुसाचे आजार असल्याने त्याचा ताण हा हृदयावर पडतोकामाच्या बदललेल्या वेळामुळे तसेच आठ तासांपेक्षा अधिक काम केल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात

सोलापूर : हृदयविकाराच्या आजाराला चाळीस वर्षांपुढील लोक बळी पडतात, हा समज आता खोटा ठरत आहे. या आजाराच्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण हे चाळिशीच्या आतील आहेत. २० वर्षांपूर्वी हे प्रमाण फक्त दोन टक्के होते. यात आता वाढ झाली आहे.

चाळिशीच्या आत हृदयविकार होणे याचे प्रमुख कारण म्हणजे बदलती जीवनशैली, खाण्याच्या पद्धतीत बदल, फास्ट फूड, तणाव ही आहेत. मधुमेह आणि रक्तदाबाचा आजार असणाºया रुग्णाला हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. कामाचा ताण वाढल्यामुळे तरुणाई मोबाईल, लॅपटॉपशिवाय राहू शकत नाही. कामाव्यतिरिक्त स्वत:ला वेळ देणे महत्त्वाचे आहे. तणाव कमी करण्यासाठी आपल्या आवडीच्या क्षेत्र किंवा कलेला वेळ देऊन त्यातून आनंद घ्यायला हवा. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप हे देखील महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप घेतल्यास थकलेल्या शरीराला आराम मिळतो. शरीर पुन्हा काम करण्यास सज्ज होते. कामाच्या बदललेल्या वेळामुळे तसेच आठ तासांपेक्षा अधिक काम केल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.

सोलापूर शहरात प्रदूषण व धूळ जास्त आहे. याचा थेट संबंध हृदयरोगाशी येत नाही, तरी देखील या वातावरणामुळे अस्थमा किंवा फुफ्फुसासंबंधी आजार उद्भवू शकतात. फुप्फुसाचे आजार असल्याने त्याचा ताण हा हृदयावर पडतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येत नसला तरी हृदयासंबंधी इतर आजार होऊ शकतात.--------प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीची गरजयेत्या १० ते १५ वर्षांमध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना पाहण्यापेक्षा हा आजार होऊ नये, यावर काम करणाºया डॉक्टरांची संख्या वाढेल. याला प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी असे म्हणतात. काही पाश्चिमात्य देशात सध्या अशा पद्धतीचे उपचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. भारतात हृदयविकाराचे रुग्ण वाढत असल्याने भविष्यात भारतातही ही उपचार पद्धती वाढण्याची शक्यता आहे. प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये हृदयविकार होऊ नये, यासाठी सल्ला देणे, उपचार करणे आदी बाबी येतात.

हृदयविकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत अधिक जागृती करण्याची गरज आहे. हृदयविकार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा हा आजार होऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी जीवनशैलीत चांगले बदल, व्यायाम, योग्य पद्धतीचा आहार घेणे गरजेचे आहे.- डॉ. अमजद सय्यद,हृदयरोगतज्ज्ञ 

टॅग्स :SolapurसोलापूरHeart DiseaseहृदयरोगHealthआरोग्य