शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे २० टक्के रुग्ण चाळिशीच्या आतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:29 IST

जागतिक हृदय दिन : बदलती जीवनशैली कारणीभूत, तणाव अन् फास्टफूडही धोकादायक

ठळक मुद्देसोलापूर शहरात प्रदूषण व धूळ जास्त आहे. याचा थेट संबंध हृदयरोगाशी येत नाही फुप्फुसाचे आजार असल्याने त्याचा ताण हा हृदयावर पडतोकामाच्या बदललेल्या वेळामुळे तसेच आठ तासांपेक्षा अधिक काम केल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात

सोलापूर : हृदयविकाराच्या आजाराला चाळीस वर्षांपुढील लोक बळी पडतात, हा समज आता खोटा ठरत आहे. या आजाराच्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण हे चाळिशीच्या आतील आहेत. २० वर्षांपूर्वी हे प्रमाण फक्त दोन टक्के होते. यात आता वाढ झाली आहे.

चाळिशीच्या आत हृदयविकार होणे याचे प्रमुख कारण म्हणजे बदलती जीवनशैली, खाण्याच्या पद्धतीत बदल, फास्ट फूड, तणाव ही आहेत. मधुमेह आणि रक्तदाबाचा आजार असणाºया रुग्णाला हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. कामाचा ताण वाढल्यामुळे तरुणाई मोबाईल, लॅपटॉपशिवाय राहू शकत नाही. कामाव्यतिरिक्त स्वत:ला वेळ देणे महत्त्वाचे आहे. तणाव कमी करण्यासाठी आपल्या आवडीच्या क्षेत्र किंवा कलेला वेळ देऊन त्यातून आनंद घ्यायला हवा. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप हे देखील महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप घेतल्यास थकलेल्या शरीराला आराम मिळतो. शरीर पुन्हा काम करण्यास सज्ज होते. कामाच्या बदललेल्या वेळामुळे तसेच आठ तासांपेक्षा अधिक काम केल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.

सोलापूर शहरात प्रदूषण व धूळ जास्त आहे. याचा थेट संबंध हृदयरोगाशी येत नाही, तरी देखील या वातावरणामुळे अस्थमा किंवा फुफ्फुसासंबंधी आजार उद्भवू शकतात. फुप्फुसाचे आजार असल्याने त्याचा ताण हा हृदयावर पडतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येत नसला तरी हृदयासंबंधी इतर आजार होऊ शकतात.--------प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीची गरजयेत्या १० ते १५ वर्षांमध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना पाहण्यापेक्षा हा आजार होऊ नये, यावर काम करणाºया डॉक्टरांची संख्या वाढेल. याला प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी असे म्हणतात. काही पाश्चिमात्य देशात सध्या अशा पद्धतीचे उपचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. भारतात हृदयविकाराचे रुग्ण वाढत असल्याने भविष्यात भारतातही ही उपचार पद्धती वाढण्याची शक्यता आहे. प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये हृदयविकार होऊ नये, यासाठी सल्ला देणे, उपचार करणे आदी बाबी येतात.

हृदयविकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत अधिक जागृती करण्याची गरज आहे. हृदयविकार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा हा आजार होऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी जीवनशैलीत चांगले बदल, व्यायाम, योग्य पद्धतीचा आहार घेणे गरजेचे आहे.- डॉ. अमजद सय्यद,हृदयरोगतज्ज्ञ 

टॅग्स :SolapurसोलापूरHeart DiseaseहृदयरोगHealthआरोग्य