शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

नीरेच्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी वाहू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 15:14 IST

पुंडलिकासह अन्य मंदिरांना पाण्याचा वेढा; भाविकांनी घेतला नौकाविहाराचा आनंद

ठळक मुद्देनीरा नदीतून २२ हजार ९८० क्युसेकचा विसर्ग संगम येथे भीमा नदीपात्रात पंढरपुरातील चंद्रभागेतील पाणी पातळीतही वाढ झाली आहेभक्त पुंडलिक मंदिरासह अनेक समाधी आणि मंदिरांना पाण्याने वेढा टाकला

पंढरपूर :  नीरा नदीतून २२ हजार ९८० क्युसेकचा विसर्ग संगम येथे भीमा नदीपात्रात मिसळत असल्याने पंढरपुरातील चंद्रभागेतील पाणी पातळीतही वाढ झाली आहे़ त्यामु*ळे भक्त पुंडलिक मंदिरासह अनेक समाधी आणि मंदिरांना पाण्याने वेढा टाकला आहे.  दरम्यान वाढलेल्या पाण्यामुळे भाविकांनी नौकाविहाराचा आनंद लुटला.

आषाढी वारी संपल्यानंतरही चंद्रभागा नदीपात्रात पाणी शिल्लक होते़ त्यात १ आॅगस्ट रोजी नीरेच्या पाण्याची भर पडली़ त्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे़ वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी होत असल्यामुळे ३१ जुलै रोजी वीर धरणातून जवळपास १८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी केला होता; मात्र त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता त्यात वाढ करून ५ दरवाज्यातून २२ हजार ९८० क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले होते़ त्यामुळे पाण्याचा वेग कायम राहिल्याने दोनच दिवसात पाणी चंद्रभागा पात्रात मिसळले़ 

चंद्रभागा नदीपात्रात भरपूर पाणी आल्याने नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले आहे़ पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले भाविक पाणी भरपूर असल्याचे पाहून नौका विहाराचा आनंद घेताना दिसून आले़ आषाढीसाठी मे महिन्याच्या अखेरीस गोपाळपूरचा बंधारा पूर्ण क्षमतेने अडविण्यात आला होता़ तेव्हापासून म्हणजेच जवळपास दोन महिने पाणी चंद्रभागेत होते़ दरम्यान, आषाढी वारीत तर लाखो भाविकांनी पवित्र स्नान केले होते़ 

सोलापूर जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस पडला नाही़ त्यामुळे अद्यापही दुष्काळसदृश स्थिती आहे़ नीरेतून भीमा नदीत पाणी आल्याने त्याचा माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर  तालुक्यातील शेतकºयांना लाभ होणार आहे़ पावसाअभावी आणि नदीपात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या गावांतील ऊस लागवड व कांदा लागवड रखडली होती; मात्र भीमा नदीत पाणी आल्याचे कळताच आता ऊस, कांदा लागवडींना वेग येणार आहे़ शिवाय पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांनाही जीवदान मिळणार आहे़ 

- १ आॅगस्ट रोजी सकाळी नीरेचे पाणी चंद्रभागा नदीत आले़ दुपारी १२ वाजेपर्यंत नदीपात्र भरले़ त्यानंतर नदी दुथडी भरून वाहू लागली़ परिणामी चंद्रभागेतील  पुंडलिक मंदिरासह अन्य छोटी मंदिरे व समाधी यांना पाण्याने वेढा मारला होता़ शिवाय स्नान केल्यानंतर महिलांसाठी उभारलेल्या चेंजिंग रुमलाही पाण्याने वेढा दिला आहे़ ती निम्म्यापेक्षा जास्त पाण्यात आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरRainपाऊसAshadhi Ekadashiआषाढी एकादशीwater transportजलवाहतूक