शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

थकबाकीमुळे एक हजार पाणीपुरवठा योजनांचा अन् दीड हजार पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित

By appasaheb.patil | Updated: June 29, 2021 12:53 IST

महावितरणची वीजबिल वसुली मोहीम वेगात - गावागावात अंधाराचे साम्राज्य - अनेक गावांना करावा लागणार पाणीटंचाईचा सामना

आप्पासाहेब पाटील

सोलापूर - वारंवार सांगूनही वीजबिल न भरलेल्या जिल्ह्यातील १ हजार ७ पाणीपुरवठा वर्गवारीतील योजनांचा तर १ हजार १४३ पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकी असल्याने जिल्ह्यातील २५ हजार ८४२ ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली.

सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मध्यंतरी वीज देयक वसुलीला ‘ब्रेक’ लागला होता. त्यामुळे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पाणीपुरवठा, पथदिवे यासह इतर वर्गवारीतील वीज वापर करणाऱ्या ग्राहकांकडे २८ जून अखेर ५१६३.०९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कोरोनाचे संसर्गाचे संकट ओसरू लागताच महावितरणनेही वीज देयक वसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. यासाठी महावितरण प्रशासनाने विविध पथके तैनात केली आहेत. या पथकात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीही महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवली आहेत.

-----------

अशी आहे वर्गवारीनुसार ग्राहक संख्या अन् थकबाकी (कोटीत)

र्गवारी     थकीत ग्राहक           थकीत रक्कम (कोटीत)

  • घरगुती -    ३,८३,३६५ -                        १२७.१७
  • व्यापारी - ३८,५४४ -                               २५.४०
  • औद्योगिक - ८,८९६ -                               १४.३३
  • सार्वजनिक सेवा - २,६९४ -                        २.८५
  • पाणीपुरवठा - २,११० -                           ७२.४४
  • पथदिवे - ५,३६१ -                                  ४४६.९८
  • शेती - ३,६१,०२६ -                             ४४७२.९२
  • इतर - २७६ -                                       १.००
  • एकूण - ८०२२७२ -                            ५१६३.०९

-------------

५००० पेक्षा जास्त थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

माहे-जून २०२१ मध्ये वीजबिल मोहिमेतंर्गत सोलापूर जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी व औद्योगिक वर्गवारीतील ५ हजार रूपये पेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या २५ हजार ८४२ ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ५९ हजार ८९६ ग्राहकांकडून ४०. ३० कोटी थकबाकी वसूल करण्यात आली आहे.

--------------

विद्युत पुरवठा खंडितची मोहीम वेगात

पाणीपुरवठा योजनेतील १ हजार ७ पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. एकूण २ हजार ११० ग्राहकांकडे ७२.४४ काेटी रूपयांची थकबाकी आहे. ८५ ग्राहकांकडून ०.२९ लाख इतकी रक्कम वसूल करण्यात आली. उर्वरित ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

 

सध्या सोलापूर जिल्ह्यात वीजबिल वसुलीची मोहीम वेगात सुरू आहे. ५ हजारापेक्षा जास्त थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. ग्राहकांनी वीजबिल भरून कारवाईच्या मोहिमेपासून दूर रहावे. आतापर्यंत २५ हजार ८४२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

- ज्ञानदेव पडळकर,

अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल, महावितरण.

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणwater transportजलवाहतूक