शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

आधुनिक शेतीसाठी भविष्यात शेतकऱ्यांच्या हाती असणार ड्रोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:24 IST

आजही शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. बदलत्या हवामानामुळे पिकांवर विविध प्रकारचे रोग पडत असतात. पिकांवर रोग पडल्याने उत्पादनात ...

आजही शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. बदलत्या हवामानामुळे पिकांवर विविध प्रकारचे रोग पडत असतात. पिकांवर रोग पडल्याने उत्पादनात घट येत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तसेच कामगार मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी वाढल्या आहेत.

यामुळे श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रशांत पवार यांनी ड्रोनच्या सहाय्याने पिकांवर लक्ष ठेवण्याचे संशोधन सुरु केले आहे. या संशोधनासाठी महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी रिचर्स फाउंडेशनने ४५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तीन वर्षांत संशोधन पूर्ण करुन शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.

संशोधनासाठी शासनमान्य १२ लाख रुपयांचे ड्रोन घेण्यात येणार आहे. ड्रोनच्या साहाय्याने १५ लिटरपर्यंत पिकांवर औषध फवारणी करण्यात येणार आहे. पिकांचे फोटो काढता येतील. यामुळे पिकांच्या वाढीवर लक्ष राहणार आहेत. पक्षी पिकांची नासाडी करू नये, यासाठी ड्रोनमधून विविध आवाज देखील येणार आहेत. ड्रोनमधून घेण्यात येणाऱ्या फोटोच्या माध्यमातून पिकांच्या उत्पादनाचा अंदाज बांधणे. त्यानंतर आवश्यकतेनुसार करणे. अशी कामे करता येणार. हे संशोधन शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणार असल्याचे डॉ. प्रशांत पवार यांनी सांगितले.

ड्रोन बनवण्यासाठी प्रयत्न

बाजारात विविध कंपनीचे, विविध पद्धतीचे ड्रोन आहेत. मात्र भारतीय बनावटीचेच ड्रोन वापरावे लागणार आहेत. तसेच शासन मान्यता असलेले ड्रोन शेतकऱ्यांना घ्यावे लागणार आहेत. आवश्यक तेवढ्या उंचीवर उडणारे व कमी किमतीत ड्रोन मिळावे यासाठी ड्रोन बनवण्यासाठी देखील संशोधन करणार असल्याचे डॉ. प्रशांत पवार यांनी सांगितले.