शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

काहीही झालं तरी नियमाचं अनलॉकिंग नकोच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 13:03 IST

‘काहीही झालं तरी मी नियम पाळत राहणार....’ अशी भीष्म प्रतिज्ञा करण्याची ही वेळ आहे. सध्याच्या ‘अनलॉकिंग’ परिस्थितीमध्ये आणखी जास्त काळजी घेणे अनिवार्य आहे.

मार्चचा शेवटचा आठवडा, एप्रिल आणि मे महिन्यातील असे एकूण जवळपास सत्तर दिवस आपण कोविड-१९ मुळे लॉकडाऊनमध्ये होतो. हा संपूर्ण प्रकारच अतिशय अनपेक्षित असा होता. आपण सारेजण गेल्या अनेक दशकांपासून आपल्याच ‘तालात’ जीवनाचं हे गाणं गात असतानाच टोळधाडीप्रमाणं कोरोना विषाणूंचा हल्ला चोहोबाजूंनी झाला आणि पुन्हा एकदा ही पृथ्वी फक्त माणूस नावाच्या प्राण्यासाठीच नाही हे सिद्ध झाले. 

मुळात हा विषाणू एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे राक्षसाप्रमाणे पसरतो. यासाठी काही नियम समोर आले आणि या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक बनून गेलं. ‘सरकारी नियम’ म्हणून आपण सारेजण हे नियम काटेकोरपणे पाळले. तरीसुद्धा ग्रीन ते आॅरेंज आणि तिथून लगेच ‘रेड झोन’ मध्ये आपण अवतरलो. दिवसागणिक ‘ब्रेकिंग’, ‘धक्कादायक’ अशा कोरोनाबाधितांच्या बातम्या निमूटपणे आपण ऐकत आणि वाचत राहिलो.... ही शृंखला आणखी सुरूच आहे. 

सगळं बंद राहून नक्कीच चालणार नाही. लहान-मोठे उद्योग, दुकाने हे जीवनचक्र सुरू ठेवावंच लागणार असल्यामुळे  जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉकिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यानुसार अंमलबजावणीचीही सुरुवात झाली. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे भोंगे वाजायला लागले. 

कामाला जायची लगबग आणि वेगवेगळ्या कारखान्यातून यंत्रांची धडधड सुरू झाली. मानवाच्या गतिमान जीवनमानाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. खरोखरच ही एक चांगली सुरुवात म्हणायला हवी. या सगळ्या गोष्टी करत असताना मात्र नियमांचं पालन आवश्यकच आहे कारण अजूनही नियमांचं अनलॉकिंग झालेलं नाही. कोरोना विषाणूंचं अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आलेलं नाही. आणखी बरेच दिवस पाळायला अतिशय सोपे असलेले हे नियम आपल्याला काटेकोरपणे पाळायचे आहेत. आजूबाजूला सारं  काही सुरू होणं म्हणजे ‘आपण आता सुटलो, कोरोना नाहीसा झाला’ ...असं वाटत राहणं साहजिक आहे, परंतु हे खरं नाही. ‘काहीही झालं तरी मी नियम पाळत राहणार....’ अशी भीष्म प्रतिज्ञा करण्याची ही वेळ आहे. सध्याच्या ‘अनलॉकिंग’ परिस्थितीमध्ये आणखी जास्त काळजी घेणे अनिवार्य आहे, हे सुजाण नागरिकांना सांगण्याची गरज नाही परंतु आज काही ठिकाणी जे चित्र दिसते त्यावरून ‘जन प्रबोधनाची’ गरज असल्याचे लक्षात येते म्हणून हा लेखन प्रपंच ! 

रस्त्यावरून जाताना मास्क न वापरणे, बेफिकीरपणे कुठेही थुंकणे, कोणत्याही वस्तूला अकारण स्पर्श करणे, जमावाने फिरणे, गर्दी करणे या आणि अशा तत्सम गोष्टी बंद करणं आवश्यक आहे. बरं या गोष्टी दिसल्यानंतर ‘आॅन द स्पॉट’ सांगत राहणं तितकंच गरजेचं आहे.  या नियमांना ‘सरकारी नियम’ पेक्षा ‘माझे नियम’ समजून पाळले गेले तर नियमांची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे नक्कीच होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नियमांचं पालन हे १०० टक्के होणं अपेक्षित आहे कारण इथे चुकीला माफी नाही आणि नियम न पाळण्याच्या चुकीमुळे होणारे नुकसान खूप मोठे आहे. इतके दिवस सुरक्षित असलेल्या ग्रामीण भागातली परिस्थिती आता बदलते आहे. काही दिवसांसाठी शहरी भागाचा संपर्क कटाक्षाने टाळला जावा. ग्रामीण आणि शहरी भागातले दळणवळण आणखी काही दिवसांसाठी संपूर्णपणे बंद ठेवणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता प्रत्येकजण कोरोनाशी लढणारा एक ‘योद्धा’ आहे. नियमांचं पालन करणारी प्रत्येक व्यक्ती अभिनंदनास आणि  पुरस्कार देण्यास पात्र आहे. याठिकाणी ‘स्वत:ची काळजी घेणे’ म्हणजेच ‘समाजाची आणि देशाची काळजी घेण्यासारखे’ आहे. कोणत्याही परिस्थितीत नियमांचं पालन करणारी प्रत्येक व्यक्ती ‘वंदनीय’ आहे, हेच खरे ! स्वत:साठी, आपल्या कुटुंबीयांसाठी, आपल्या देशासाठी नियम पाळूया?...! धन्यवाद !- अरविंद म्हेत्रे(लेखक ‘निसर्ग माझा सखा’चे  समन्वयक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या