शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

काहीही झालं तरी नियमाचं अनलॉकिंग नकोच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 13:03 IST

‘काहीही झालं तरी मी नियम पाळत राहणार....’ अशी भीष्म प्रतिज्ञा करण्याची ही वेळ आहे. सध्याच्या ‘अनलॉकिंग’ परिस्थितीमध्ये आणखी जास्त काळजी घेणे अनिवार्य आहे.

मार्चचा शेवटचा आठवडा, एप्रिल आणि मे महिन्यातील असे एकूण जवळपास सत्तर दिवस आपण कोविड-१९ मुळे लॉकडाऊनमध्ये होतो. हा संपूर्ण प्रकारच अतिशय अनपेक्षित असा होता. आपण सारेजण गेल्या अनेक दशकांपासून आपल्याच ‘तालात’ जीवनाचं हे गाणं गात असतानाच टोळधाडीप्रमाणं कोरोना विषाणूंचा हल्ला चोहोबाजूंनी झाला आणि पुन्हा एकदा ही पृथ्वी फक्त माणूस नावाच्या प्राण्यासाठीच नाही हे सिद्ध झाले. 

मुळात हा विषाणू एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे राक्षसाप्रमाणे पसरतो. यासाठी काही नियम समोर आले आणि या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक बनून गेलं. ‘सरकारी नियम’ म्हणून आपण सारेजण हे नियम काटेकोरपणे पाळले. तरीसुद्धा ग्रीन ते आॅरेंज आणि तिथून लगेच ‘रेड झोन’ मध्ये आपण अवतरलो. दिवसागणिक ‘ब्रेकिंग’, ‘धक्कादायक’ अशा कोरोनाबाधितांच्या बातम्या निमूटपणे आपण ऐकत आणि वाचत राहिलो.... ही शृंखला आणखी सुरूच आहे. 

सगळं बंद राहून नक्कीच चालणार नाही. लहान-मोठे उद्योग, दुकाने हे जीवनचक्र सुरू ठेवावंच लागणार असल्यामुळे  जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉकिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यानुसार अंमलबजावणीचीही सुरुवात झाली. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे भोंगे वाजायला लागले. 

कामाला जायची लगबग आणि वेगवेगळ्या कारखान्यातून यंत्रांची धडधड सुरू झाली. मानवाच्या गतिमान जीवनमानाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. खरोखरच ही एक चांगली सुरुवात म्हणायला हवी. या सगळ्या गोष्टी करत असताना मात्र नियमांचं पालन आवश्यकच आहे कारण अजूनही नियमांचं अनलॉकिंग झालेलं नाही. कोरोना विषाणूंचं अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आलेलं नाही. आणखी बरेच दिवस पाळायला अतिशय सोपे असलेले हे नियम आपल्याला काटेकोरपणे पाळायचे आहेत. आजूबाजूला सारं  काही सुरू होणं म्हणजे ‘आपण आता सुटलो, कोरोना नाहीसा झाला’ ...असं वाटत राहणं साहजिक आहे, परंतु हे खरं नाही. ‘काहीही झालं तरी मी नियम पाळत राहणार....’ अशी भीष्म प्रतिज्ञा करण्याची ही वेळ आहे. सध्याच्या ‘अनलॉकिंग’ परिस्थितीमध्ये आणखी जास्त काळजी घेणे अनिवार्य आहे, हे सुजाण नागरिकांना सांगण्याची गरज नाही परंतु आज काही ठिकाणी जे चित्र दिसते त्यावरून ‘जन प्रबोधनाची’ गरज असल्याचे लक्षात येते म्हणून हा लेखन प्रपंच ! 

रस्त्यावरून जाताना मास्क न वापरणे, बेफिकीरपणे कुठेही थुंकणे, कोणत्याही वस्तूला अकारण स्पर्श करणे, जमावाने फिरणे, गर्दी करणे या आणि अशा तत्सम गोष्टी बंद करणं आवश्यक आहे. बरं या गोष्टी दिसल्यानंतर ‘आॅन द स्पॉट’ सांगत राहणं तितकंच गरजेचं आहे.  या नियमांना ‘सरकारी नियम’ पेक्षा ‘माझे नियम’ समजून पाळले गेले तर नियमांची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे नक्कीच होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नियमांचं पालन हे १०० टक्के होणं अपेक्षित आहे कारण इथे चुकीला माफी नाही आणि नियम न पाळण्याच्या चुकीमुळे होणारे नुकसान खूप मोठे आहे. इतके दिवस सुरक्षित असलेल्या ग्रामीण भागातली परिस्थिती आता बदलते आहे. काही दिवसांसाठी शहरी भागाचा संपर्क कटाक्षाने टाळला जावा. ग्रामीण आणि शहरी भागातले दळणवळण आणखी काही दिवसांसाठी संपूर्णपणे बंद ठेवणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता प्रत्येकजण कोरोनाशी लढणारा एक ‘योद्धा’ आहे. नियमांचं पालन करणारी प्रत्येक व्यक्ती अभिनंदनास आणि  पुरस्कार देण्यास पात्र आहे. याठिकाणी ‘स्वत:ची काळजी घेणे’ म्हणजेच ‘समाजाची आणि देशाची काळजी घेण्यासारखे’ आहे. कोणत्याही परिस्थितीत नियमांचं पालन करणारी प्रत्येक व्यक्ती ‘वंदनीय’ आहे, हेच खरे ! स्वत:साठी, आपल्या कुटुंबीयांसाठी, आपल्या देशासाठी नियम पाळूया?...! धन्यवाद !- अरविंद म्हेत्रे(लेखक ‘निसर्ग माझा सखा’चे  समन्वयक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या