शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

केल्याने देशाटन, मनुजा येते शहाणपण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 20:12 IST

जागतिक पर्यटन आणि देशांतर्गत पर्यटन नक्कीच वाढलेले आहे.

ही म्हण प्रचलित आहे आणि ती खरीच आहे. निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालवणे, नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेणे ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्तीच पर्यटनाचा मूळ आधार आहे. प्राचीन भारताचा इतिहास पाहता ‘फाहियान’ आणि ‘युआन शॉन’ हे भारतात आलेले दोन चिनी प्रवासी जगप्रसिद्ध आहेत. कोलंबसने लावलेला अमेरिकेचा शोध, वास्को-द -गामाचे भारतातील आगमन ही पर्यटनाची उदाहरणे सर्वश्रुत आहेत. पर्यटनाचे हे महत्त्व ओळखूनच १९८० पासून २७ सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जागतिक पर्यटन विभागाने ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले. ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे १९७० साली ‘यूएनडब्लूटीओ’ने परिनियम स्वीकारले. परिनियम स्वीकारणे ही जागतिक पर्यटनातील प्रगतिदर्शक घटना समजली जाते. या दिनाचा उद्देश पर्यटन हे क्षेत्र आंतरराष्ट्रीय समुदायात वठवत असलेल्या भूमिकेची तसेच जगभरातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक मूल्यांवर पडणाºया प्रभावाची जागरुकता निर्माण व्हावी, हा होता.

 २०१७ मध्ये या दिवसाची सूत्रयोजना ‘शाश्वत पर्यटन’ होती. २०१८ मध्ये ‘पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन’ ही सूत्रयोजना होती. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणूनच भविष्याचा वेध घेत या भूमिकेला अधिक महत्त्व प्राप्त व्हावे, यासाठी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाला ‘शाश्वत पर्यटन विकासाचे साधन’ असे घोषवाक्य निश्चित केले आहे. पर्यटन व्यवसायामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणविषयक विकास होण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरात राहणाºया नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडून येतो.

पर्यटकाला आवश्यक असणारी निवास, भोजन, वाहतूक, मनोरंजन, माहिती आदी व्यवस्थेसोबतच त्या भागातील स्थानिक उत्पादनांना देखील मागणी निर्माण होते. सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या माध्यमातून नागरिकांना एकमेकांना जोडण्याचे काम होते. पर्यायाने त्या भागातील अर्थकारणाला देखील गती प्राप्त होते. पर्यटकांना सोयीसुविधा पुरविण्याकडे जितके लक्ष दिले जाते तितके लक्ष त्या भागातील खाद्यसंस्कृती, पारंपरिक कला, साहित्य, लोकजीवन, लोकपरंपरा, निसर्ग यांचा विचार केला जात नाही. या सर्व स्थानिक बाबींचा विचार करून त्याचे योग्य मार्के टिंग झाले पाहिजे, स्थानिक लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळाला पाहिजे. महागड्या पंचतारांकित उपाहारगृहातील वास्तव्यापेक्षा पर्यटनस्थळी घरगुती निवास, भोजन अशी सर्वांना परवडेल, अशी सुविधा निर्माण केली पाहिजे.पाश्चत्त्य राष्ट्रांनी आपल्या पारंपरिक गोष्टींचे जतन व संगोपन केले आहे तसेच आपण देखील केले पाहिजे.

विदेशी पर्यटकांना भुरळ घालणारी आपली संस्कृती, आपल्या गौरवशाली परंपरा, आपली वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधता असलेली वेशभूषा, लोकनृत्य, खाद्यसंस्कृती याचे योग्य पद्धतीने मार्केटिंग झाले पाहिजे. विदेशी चलनाचे प्रमाण त्यामुळे वाढेल व स्थानिकांच्या रोजगाराबरोबर अर्थकारणाला देखील चालना मिळेल. अतिथी देवो भव’ ही आपल्या भारतीय संस्कृतीची वैभवशाली परंपरा आहे. त्यास अनुसरून आदरातिथ्य, विनयशीलता, प्रामाणिकपणा, नि:स्पृहता या गुणांचा पुरस्कार केला पाहिजे. त्यास अनुसरून अप्रामाणिकपणा, उद्धटपणा, अस्वच्छता अशा काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, ज्यामुळे देशाची प्रतिमा जगात मलिन होऊ शकते. दळणवळणाच्या वाढलेल्या सोयीसुविधा, उंचावलेले आर्थिक जीवनमान , ‘मागणी तसा पुरवठा’ करणाºया प्रवासकंपन्या, वेळेचा अपव्यय टाळणारी विमानसेवा यामुळे जागतिक पर्यटन आणि देशांतर्गत पर्यटन नक्कीच वाढलेले आहे.

 या साºया बाबींचा विचार पर्यटन विकासाच्या योजना आखताना केला गेला पाहिजे, त्याचप्रमाणे पायाभूत, मूलभूत सुविधा देखील निर्माण केल्या गेल्या पाहिजेत, तरच पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल आणि सर्वांना परवडणारे स्वस्तातले पर्यटन निर्माण होईल.- वसुंधरा शर्मा(लेखिका शिक्षिका आहेत.)