शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

डॉक्टरांनाही घाम फुटला; दंश केलेला साप घेऊनच ‘ती’ चक्क रुग्णालयात अवतरली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:02 IST

बीबीदारफळमधील महिला शिंदेंचा धाडसी प्रयत्न; रात्रीच्या सुमारास पाणी देताना घडली घटना

ठळक मुद्देबालिका शिंदे यांनी सोबत साप आणल्याने डॉक्टरांना उपचार करणे सोयीचे झालेडॉक्टरांनी साप विषारी असल्याचे किमान पाच दिवस उपचारासाठी थांबावे लागेल, असे त्यांना सांगितलेन घाबरता त्यांनी उपचाराला साथ दिली आणि त्यांचे प्राण वाचले

अरुण बारसकर  सोलापूर: रात्रीच वीज सुरू होणार अन् पिकांना पाणी द्यावे लागणार म्हणून मोबाईलच्या उजेडात दार फोडले... बहिणीचा मोबाईल आल्याने बोलणे सुरू असताना पायाला सापाने दंश केला़़. काहीतरी चावल्याची त्यांना जाणीव झाली... मोबाईल बंद केला अन् बघते तर काय साप... मग काय?...त्यांनी धाडसाने साप धरला अन् सोबत घेऊन  चक्क शासकीय रुग्णालयात अवतरल्या... हे पाहून डॉक्टरांनाही घाम फुटला... मात्र, त्यांना औषधोपचार करणे सोयीचे झाले. 

त्या वाचलेल्या धाडसी महिलेचे नाव आहे बालिका अशोक शिंदे. तीन दिवसांपूर्वी बीबीदारफळ शिवारात ही घटना घडली. वीज पुरवठा कधी सुरू होणार अन् कधी बंद होणार हे सांगता येत नाही़ मात्र वीज सुरू झाल्यानंतर विद्युत मोटार सुरू करून पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. अशाच स्थितीत बीबीदारफळ येथील बालिका अशोक शिंदे (वय ४०) या महिला रात्री ९ वाजता वीज येणार असल्याने तिने पिकाला पाणी देण्यासाठी दार फोडले. इतक्यात बहिणीचा फोन आला अन् त्यांनी मोबाईल उचलला़ त्या बोलू लागल्या. यावेळी कांदा पिकात लपलेल्या सापाने पायाला दंश केला. आपल्याला काहीतरी चावले आहे, याची जाणीव झाली अन् त्यांनी खाली पाहिले तर चक्क साप. 

सापाने दंश केल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या सापाला धाडसाने धरले़ त्याला सोबत घेतले. गावात उपचार करण्याचा प्रयत्न केला़  मात्र साप चावल्याने शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला मिळाला. त्यांनी थेट सोलापूर   शासकीय रुग्णालय गाठले. सोबत आणलेला साप पाहून डॉक्टरांनाही घाम फुटला. त्या सापाची पाहणी करून डॉक्टरांनी लागलीच त्यांच्यावर उपचार सुरू केले. 

बालिका शिंदे यांनी सोबत साप आणल्याने डॉक्टरांना उपचार करणे सोयीचे झाले व प्राणही वाचले. हा साप घोणस असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी साप विषारी असल्याचे किमान पाच दिवस उपचारासाठी थांबावे लागेल, असे त्यांना सांगितले होते. न घाबरता त्यांनी उपचाराला साथ दिली आणि त्यांचे प्राण वाचले.

सलग तीन महिने रात्रीच वीज येते- बीबीदारफळ गावासाठी अकोलेकाटी व बीबीदारफळ उपकेंद्रातून वीज पुरवठा होतो. दोन्ही उपकेंद्रांतून डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी असे सलग तीन महिने शेतीपंपासाठी रात्रीच वीज पुरवठा केला जात आहे. ज्वारी, गहू, हरभरा, कांदा तसेच अन्य पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीचे जागरण करावे लागते. ऐन रब्बी पिकांचा कालावधी असताना एकाच गावाला सलग तीन महिने रात्रीचा वीज पुरवठा सुरू आहे.

मागील वर्षी पाणी नसल्याने पिके घेता आली नाहीत. यावर्षी पाणी आहे, मात्र वीज रात्री ८ ते सकाळी ६ वाजेदरम्यान असते. थंडी व अंधार असला तरी पिकांना पाणी दिल्याशिवाय पर्याय नाही. एकाच गावाला सलग तीन महिने रात्रीच वीज देण्याचे नियोजन कसले?- शिवाजी पाटील, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्त समिती

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यWomenमहिला