शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्था विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 12:32 IST

रेशन दुकानदारांच्या तक्रारी : कंत्राटदार प्रशासनावर वरचढ

ठळक मुद्दे१ ते १५ तारखेपर्यंत रेशन दुकानांमधून धान्य वाटप होणे अपेक्षितरेशन दुकानदारांना धान्य पुरविणारी यंत्रणा पुन्हा विस्कळीतजिल्हा प्रशासनाच्या स्तरावरही कागदी घोडे नाचविण्याचे काम

सोलापूर : जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना धान्य पुरविणारी यंत्रणा पुन्हा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी रेशन दुकानदार करीत आहेत. शासनाने नेमलेला वाहतूक कंत्राटदार जिल्हा प्रशासनावरच वरचढ झाल्याचे रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे. 

शासनाने आता थेट दुकानदारांपर्यंत धान्य पोहोचविण्याची योजना सुरु केली आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना अन्नधान्य पुरवठा करण्याचा ठेका मुंबईतील एका कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीकडे राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्याचे काम देण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातही आॅगस्ट २०१७ पासून मुंबईची कंपनी पुरवठा करीत आहे.

शासन निर्देशानुसार दर महिन्याच्या १ ते १५ तारखेपर्यंत रेशन दुकानांमधून धान्य वाटप होणे अपेक्षित आहे, परंतु आॅक्टोबर २०१७ पासून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वेळेवर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. पुरवठादार थेट तालुक्याच्या गोदामामध्येच धान्य पोहोच करतो. तिथून दुकानापर्यंत घेऊन जाण्यासाठी हमाली आणि वाहतूक खर्च द्यावा लागतो, असेही दुकानदारांचे म्हणणे आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाने रेशन दुकानदार आणि पुरवठादाराची बैठकही घेतली होती, परंतु अद्यापही दुकानदारांच्या तक्रारी थांबलेल्या नाहीत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरही कागदी घोडे नाचविण्याचे काम होत आहे. 

जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण यंत्रणा विस्कळीत झाली आहे. आॅक्टोबर २०१७ पासून आजतागायत पुरवठादाराला २७ नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. पुन्हा २८ वी नोटीस देत आहोत. वाहतुकीत गोंधळ आणि रेशन दुकानदारांच्या तक्रारी असल्या तरी आजवर जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य मिळावे यासाठी पाठपुरावा सुरु आहे.- रामचंद्र उगले, जिल्हा पुरवठा अधिकारी 

आम्ही सर्वप्रकारची वाहतूक यंत्रणा चांगल्या पद्धतीने लावलेली आहे. प्रशासनाने आजवर दिलेल्या सर्व नोटिसींना उत्तरही दिलेले आहे. तालुक्याच्या गोदामाला धान्याची गाडी पाठविल्यानंतर बºयाचदा लवकर रिकामी होत नाही. तिथे हमाल नसतात. गाडी तिथेच थांबून राहते. अनेकदा प्रशासनाकडून परमीटही वेळेवर मिळत नाही. केवळ आमच्याच बाजूने अडचणी आहेत, असे नाहीत. - रमेश शहा, वाहतूक कंत्राटदार 

रेशन दुकानदारांना वेळेवर धान्य मिळत नाही असे आम्ही आॅक्टोबरपासून सांगत आहोत. प्रशासनाला निवेदनही दिले आहे. वेळेवर धान्यच दिले नाही तर आम्ही वेळेवर कसा पुरवठा करणार. प्रशासनाने यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे अपेक्षित आहे.- बापू गंदगे, अध्यक्ष, जिल्हा रेशन दुकानदार संघटना 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय