शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

ईव्हीएममध्ये २४२ मतांचा फरक; आंबेडकरांची तक्रार न्यायालयाने फेटाळली

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: April 3, 2024 20:36 IST

आंबेडकरांची तक्रार न्यायालयाने फेटाळल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली आहे.

सोलापूर : प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी आणि मतमोजणीची आकडेवारी यात तफावत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे २०१९ चे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. यावर सुनावणी पूर्ण झाली असून मंगळवारी, २ एप्रिल रोजी कोर्टाने या प्रकरणी निकाल दिला आहे. आंबेडकरांची तक्रार न्यायालयाने फेटाळल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघातून २०१९ साली प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती. मतदान आणि मतमोजणी यात २४२ मतांची तफावत आहे. तसेच ईव्हीएम मध्ये मतांची तफावत जाणवत असल्याची तक्रार करत त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयात धाव घेतली होती. मतदान दिनी सायंकाळी निवडणूक आयोगाला मतदानाची प्राथमिक आकडेवारी दिली जाते. दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी पाठवली जाते. प्राथमिक आकडेवारीत आणि मतमोजणीतील आकडेवारी काही मतांचा फरक जाणवला. परंतू, मतदान दिनाची अंतिम आकडेवारी अन् मतमोजणीची आकडेवारी यात फरक नव्हता. ही माहिती आम्ही कोर्टात सादर केली. कोर्टाने आंबेडकरांची तक्रार फेटाळून लावली आहे, असे गणेश निऱ्हाळी यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर