शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

निराधा, विधवा महिलांना महिन्याला दोन हजार मिळणार; लाभार्थ्यांनो, फक्त एवढं करा!

By appasaheb.patil | Updated: October 4, 2022 16:50 IST

अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या तहसिल कार्यालयात भेट द्या..

सोलापूर : गोरगरीब, वंचित, दुर्बल, निराधार अन् अंध-अपंगांसाठी अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ घ्या म्हणून सरकार सांगते. योजनेसाठी लागणारी कागदपत्रं जमा करण्याचाच अधिक त्रास आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत योजना पोहोचतेच असे नाही. असे असले तरी काही गोरगरिबांचे जीवनमान मात्र उंचावताना दिसत आहे. दुसरीकडे काही लाभार्थी आपले जीवनमान कधी उंचावेल, याच प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निराधार, विधवा, परित्यक्ता महिलांना महिन्याला दीड ते दोन हजारांपर्यंत रक्कम मिळते. त्यासाठी संबंधित तहसील कार्यालयातून माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

-------------

२५ हजार पिवळे रेशन कार्डधारक

दारिद्र्यरेषेखालील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. योजनांचा बहुतांश लोकांना फायदा होत असून, जीवन पद्धती बदलत आहे. संजय गांधी, श्रावणबाळसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून निराधार व गरीब कुटुंबांना फायदा होत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात २४ हजार ३०५ कुटुंबीयांची नोंद दारिद्र्यरेषेखाली झाली आहे.

--------------

या योजना राबविल्या जातात

समाजातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजार, विधवा आणि अनाथ बालकांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करीत असते. यातील काही योजना राज्य सरकारद्वारे तर काही योजना केंद्र सरकारच्या मदतीने राबविल्या जातात.

-------------

घर बांधकामासाठीही मदत...

सोलापूर शहर व जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ अशा विविध योजनांद्वारे संबंधितांना लाभ दिला जात आहे. झोपडपट्टीमधील आर्थिक मागास व दारिद्र्यरेषेखालील लोकांकरिता शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे बांधण्यासाठीही आर्थिक मदत केली जात आहे.

 

-----------

२००५ साली झाले सर्वेक्षण

० सोलापूर शहर व जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील घरांचे जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. हा सर्व्हे २००५ साली झाला होता. सर्वेक्षणानंतर दारिद्र्यरेषेखालील लोकांची यादी तयार करण्यात आली होती. सर्वेक्षणानंतर दारिद्र्यरेषेखालील लोकांना पिवळे रेशन कार्ड देण्यात आले होते.

टॅग्स :SolapurसोलापूरGovernmentसरकारSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय