शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक; दोघांचे बळी जाऊनही सोलापूर शहरातून जडवाहतूक सर्रास सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 15:06 IST

बायपास रोड बनतोय धोकादायक; लॉकडाऊनमध्ये वाहतुकीला बंधनच नाही

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यावर शहर व ग्रामीण परिसरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहेशहरातील नागरिकांसाठी सर्वच बायपास रस्ते धोकादायक बनले आहेतनेहमी वर्दळ असलेल्या बायपास रस्त्यांवर पुन्हा एकदा जड वाहतुकीचा प्रश्न निर्माण

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : लॉकडाऊनपूर्वी अन् लॉकडाऊनमध्ये... पूर्वी जडवाहतुकीला शहरात येण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये मात्र वेळेचे बंधनच नाही. दिवस-रात्र जडवाहतूक होत असताना बायपास रोड धोकादायक बनतोय. जून महिन्यात दोघांचे बळी जाऊनही पोलीस प्रशासन मात्र गप्पच आहे, असा सूर नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहे. 

लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यावर शहर व ग्रामीण परिसरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशात पुन्हा एकदा शहरातील नागरिकांसाठी सर्वच बायपास रस्ते धोकादायक बनले आहेत. नेहमी वर्दळ असलेल्या बायपास रस्त्यांवर पुन्हा एकदा जड वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. सकाळी सहा ते दुपारी एकपर्यंत जड वाहतुकीला बंदी आहे. दुपारी एक ते चारपर्यंत जड वाहतुकीला परवानगी आहे. पुन्हा सायंकाळी ४ ते ७ पर्यंत जड वाहतुकीला बंदी आहे. सायंकाळी सातनंतर जड वाहतुकीला मार्ग मोकळा असतो, परंतु या वेळेचे पालन जड वाहतूक वाहन चालक करत नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

विजापूर रोड ते महावीर चौक, गुरुनानक चौक, अशोक चौक, डब्ल्यूआयटी कॉलेज, शांती चौक, बोरामणी चौक, दयानंद कॉलेज, रुपाभवानी मार्ग, तुळजापूर रोड तसेच बोरामणी चौक ते हैदराबाद रोड आणि शांती चौक ते अक्कलकोट रोड या मार्गावर वारंवार अपघात होत असतात. 

जड वाहतुकीवर नियंत्रण आले होते...सरकारी कर्मचारी संघटनेचे अशोक इंदापुरे यांनी व्यापक जनआंदोलन उभारले होते. त्यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाला काहीकाळ जड वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे लागले. अशोक इंदापुरे म्हणतात, जून महिन्यात जड वाहतुकीने दोघांचे प्राण घेतले.प्रशासनाने याकडे कानाडोळा करू नये. सोलापूर शहरातील चौकाचौकातील सिग्नलजवळ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यांचा उपयोग करावा तसे चौका-चौकात वाहतूक पोलिसाची व्यवस्था करावी. 

नोंदी होत नाहीत..शहराच्या प्रमुख मार्गावरून जाणाºया जड वाहतुकीमुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक अपघात झालेले आहेत. यातून तीनशे लोकांचा जीव गेला असून, साडेसातशेहून अधिक नागरिकांना कायमचे अपंगत्व प्राप्त झाले आहे. यात सर्वाधिक शाळकरी मुले तसेच महाविद्यालयीन युवक-युवतींचा समावेश आहे. इतर किरकोळ स्वरुपाच्या अपघाताची नोंद राहत नाही. 

 

टॅग्स :Solapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूकSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसDeathमृत्यू