शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

धोकादायक; दोघांचे बळी जाऊनही सोलापूर शहरातून जडवाहतूक सर्रास सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 15:06 IST

बायपास रोड बनतोय धोकादायक; लॉकडाऊनमध्ये वाहतुकीला बंधनच नाही

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यावर शहर व ग्रामीण परिसरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहेशहरातील नागरिकांसाठी सर्वच बायपास रस्ते धोकादायक बनले आहेतनेहमी वर्दळ असलेल्या बायपास रस्त्यांवर पुन्हा एकदा जड वाहतुकीचा प्रश्न निर्माण

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : लॉकडाऊनपूर्वी अन् लॉकडाऊनमध्ये... पूर्वी जडवाहतुकीला शहरात येण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये मात्र वेळेचे बंधनच नाही. दिवस-रात्र जडवाहतूक होत असताना बायपास रोड धोकादायक बनतोय. जून महिन्यात दोघांचे बळी जाऊनही पोलीस प्रशासन मात्र गप्पच आहे, असा सूर नागरिकांमधून ऐकावयास मिळत आहे. 

लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यावर शहर व ग्रामीण परिसरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशात पुन्हा एकदा शहरातील नागरिकांसाठी सर्वच बायपास रस्ते धोकादायक बनले आहेत. नेहमी वर्दळ असलेल्या बायपास रस्त्यांवर पुन्हा एकदा जड वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. सकाळी सहा ते दुपारी एकपर्यंत जड वाहतुकीला बंदी आहे. दुपारी एक ते चारपर्यंत जड वाहतुकीला परवानगी आहे. पुन्हा सायंकाळी ४ ते ७ पर्यंत जड वाहतुकीला बंदी आहे. सायंकाळी सातनंतर जड वाहतुकीला मार्ग मोकळा असतो, परंतु या वेळेचे पालन जड वाहतूक वाहन चालक करत नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

विजापूर रोड ते महावीर चौक, गुरुनानक चौक, अशोक चौक, डब्ल्यूआयटी कॉलेज, शांती चौक, बोरामणी चौक, दयानंद कॉलेज, रुपाभवानी मार्ग, तुळजापूर रोड तसेच बोरामणी चौक ते हैदराबाद रोड आणि शांती चौक ते अक्कलकोट रोड या मार्गावर वारंवार अपघात होत असतात. 

जड वाहतुकीवर नियंत्रण आले होते...सरकारी कर्मचारी संघटनेचे अशोक इंदापुरे यांनी व्यापक जनआंदोलन उभारले होते. त्यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाला काहीकाळ जड वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे लागले. अशोक इंदापुरे म्हणतात, जून महिन्यात जड वाहतुकीने दोघांचे प्राण घेतले.प्रशासनाने याकडे कानाडोळा करू नये. सोलापूर शहरातील चौकाचौकातील सिग्नलजवळ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यांचा उपयोग करावा तसे चौका-चौकात वाहतूक पोलिसाची व्यवस्था करावी. 

नोंदी होत नाहीत..शहराच्या प्रमुख मार्गावरून जाणाºया जड वाहतुकीमुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक अपघात झालेले आहेत. यातून तीनशे लोकांचा जीव गेला असून, साडेसातशेहून अधिक नागरिकांना कायमचे अपंगत्व प्राप्त झाले आहे. यात सर्वाधिक शाळकरी मुले तसेच महाविद्यालयीन युवक-युवतींचा समावेश आहे. इतर किरकोळ स्वरुपाच्या अपघाताची नोंद राहत नाही. 

 

टॅग्स :Solapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूकSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसDeathमृत्यू