शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलन मांगी, कुंभेज तलावात पाणी सोडा; संघर्ष समितीची मागणी

By admin | Updated: May 6, 2014 17:17 IST

करमाळा :

करमाळा : करमाळा तालुक्याच्या हक्काचे म्हणजेच कुकडीचे पाणी टंचाईच्या परिस्थितीत मांगी व कंुभेज तलावात सोडावे या प्रमुख मागणीसाठी आज येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना व कुकडी संघर्ष समितीच्या वतीने प्रचंड घोषणाबाजीत दीड तास धरणे आंदोलन करण्यात आले.करमाळा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाणवू लागली असून, ४० गावांतून पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मांगी तलावाखालील १६ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू होण्यास दीड महिना बाकी असून, त्याकरिता कुकडी धरणातून मांगी तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे व कुकडी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुजित बागल यांनी केले. या आंदोलनात पं.स.चे माजी सभापती बापूराव गायकवाड, बाजार समितीचे संचालक दादासाहेब जाधव, बाळासाहेब गायकवाड, अण्णा सुपनवर, प्रमोद कुलकर्णी,ॲड़ शिवाजीराव मांगले, गोवर्धन करगळ, संभाजीराजे बागल, बाळासाहेब बागल, दिवाण बागल, अण्णासाहेब बागल, हनुमंत बागल,विलास बरडे,गणेश नरसाळे,उमेश बागल,आनंद भांडवलकर आदींसह मांगी,रावगाव,भोसे,हिवरवाडी,वडगाव भागातील शेतकरी उपस्थित होते.यावेळी पं.स.चे माजी सभापती बापूराव गायकवाड, महेश चिवटे यांची भाषणे झाली. यावेळी तहसीलदार राजंेद्र पोळ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस यांनी बंदोबस्त ठेवला होता. वार्ताहरचौकट घेणेपाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याबिगर राहणार नाही, कुकडीचे पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर दिल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.कोट करणेस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार गतवर्षी वीज बंद काळातील वीज बिल माफ करून बिले दुरूस्त करून शेतकर्‍यांना देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविला असून मान्यता मिळताच शेतकर्‍यांना गतवर्षीचे वीज बिल कमी करून नवीन बिल तयार करून दिले जाईल, असे वीज वितरण कं.चे सहायक अभियंता पोपटराव चव्हाण यांनी सांगितले.