शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

हार, फुलांऐवजी बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी घेऊन या ‘वही-पेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:23 IST

गती शिक्षणाला : सत्यशोधक परिवाराचा उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना दिली जाते भेट

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर चौकात मोठी गर्दी होते लाखोंच्या संख्येने लोक अभिवादन करण्यासाठी येतातअभिवादनाच्या माध्यमातून मिळालेली वही आणि पेन विविध शाळांमध्ये शिकत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना दिले जाते

सोलापूरशिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करील, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा कानमंत्र दिलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी अभिवादनाला येणाºया भीमसैनिकांकडून एक वही व पेन देण्याचे आवाहन सत्यशोधक परिवाराच्या वतीने केले जाते. अभिवादनाच्या माध्यमातून मिळालेली वही आणि पेन विविध शाळांमध्ये शिकत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना दिले जाते. 

दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर चौकात मोठी गर्दी होते. लाखोंच्या संख्येने लोक अभिवादन करण्यासाठी येतात. पुष्पहार, फुले, मेणबत्ती आणि अगरबत्ती लावून अभिवादन करतात. 

अभिवादनानंतर दुसºया दिवशी या सर्व साहित्याचे रूपांतर निर्माल्या (कचरा) मध्ये होते. सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भावना होती. आजही समाजात असे कुटुंब आहेत की जे केवळ शाळेला जाण्यासाठी वही व पेन नसल्याने काही वर्षातच शाळा सोडून देतात. 

शाळा शिकवण्याची इच्छा खूप असते, मात्र त्यांचा शैक्षणिक खर्च पालकांना उचलता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना किमान वही व पेन देऊन शिक्षणासाठी मदत करावी या उद्देशाने सत्यशोधक परिवाराच्या वतीने हा उपक्रम सुरू केला आहे. १४ एप्रिल २0१४ रोजी पहिल्यांदा हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सुरू केला. प्रतिवर्षी या उपक्रमास प्रतिसाद वाढत आहे. लोक वही व पेन आणून देतात, त्याचे संकलन केले जाते. जून महिन्यात जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा महापालिकेच्या शाळा व अन्य खासगी शाळेत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचे वाटप केले जाते. शाळा सुरू झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप केले जाते तेव्हा ते मनापासून खूप आनंदी होतात. 

आजतागायत ४0 शाळांमधून २ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले आहे. बहुतांश शाळा संस्थेच्या या उपक्रमाची वाट बघतात. 

फोन करून विचारणा करतात, गरजू विद्यार्थ्यांची संख्या सांगतात. यंदाही हा उपक्रम राबवला जाणार आहे़ एक वही आणि पेन घेऊन यावे, असे सांगण्यात आले आहे.

शिक्षणाला आधार हीच खरी आंबेडकर जयंती : विक्रम गायकवाड - बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, ते मोठ्या पदांवर जावेत, स्वत:बरोबरच कुटुंबाचा आणि समाजाचा उद्धार करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्याचा संदेश दिला आहे. आजही बहुतांश कुटुंबातील पालक हे सकाळी उठून कामाला गेल्याशिवाय रात्री एकवेळचे पोटभर जेवण करू शकत नाहीत अशी अवस्था आहे. केवळ पैसा नसल्याने शिक्षणाची इच्छा असतानाही अनेक विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतात. त्यांना कुठेतरी छोटीशी मदत व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून १४ एप्रिल रोजी अभिवादनासाठी केवळ एक वही आणि पेन घेऊन येण्याचे आवाहन केले जाते. या उपक्रमाला लोकांचा प्रतिसाद वाढत आहे आणि हिच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे असे मला वाटते, अशी माहिती सत्यशोधक परिवाराचे विक्रम गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती