शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हार, फुलांऐवजी बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी घेऊन या ‘वही-पेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:23 IST

गती शिक्षणाला : सत्यशोधक परिवाराचा उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना दिली जाते भेट

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर चौकात मोठी गर्दी होते लाखोंच्या संख्येने लोक अभिवादन करण्यासाठी येतातअभिवादनाच्या माध्यमातून मिळालेली वही आणि पेन विविध शाळांमध्ये शिकत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना दिले जाते

सोलापूरशिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करील, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा कानमंत्र दिलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी अभिवादनाला येणाºया भीमसैनिकांकडून एक वही व पेन देण्याचे आवाहन सत्यशोधक परिवाराच्या वतीने केले जाते. अभिवादनाच्या माध्यमातून मिळालेली वही आणि पेन विविध शाळांमध्ये शिकत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना दिले जाते. 

दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर चौकात मोठी गर्दी होते. लाखोंच्या संख्येने लोक अभिवादन करण्यासाठी येतात. पुष्पहार, फुले, मेणबत्ती आणि अगरबत्ती लावून अभिवादन करतात. 

अभिवादनानंतर दुसºया दिवशी या सर्व साहित्याचे रूपांतर निर्माल्या (कचरा) मध्ये होते. सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भावना होती. आजही समाजात असे कुटुंब आहेत की जे केवळ शाळेला जाण्यासाठी वही व पेन नसल्याने काही वर्षातच शाळा सोडून देतात. 

शाळा शिकवण्याची इच्छा खूप असते, मात्र त्यांचा शैक्षणिक खर्च पालकांना उचलता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना किमान वही व पेन देऊन शिक्षणासाठी मदत करावी या उद्देशाने सत्यशोधक परिवाराच्या वतीने हा उपक्रम सुरू केला आहे. १४ एप्रिल २0१४ रोजी पहिल्यांदा हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सुरू केला. प्रतिवर्षी या उपक्रमास प्रतिसाद वाढत आहे. लोक वही व पेन आणून देतात, त्याचे संकलन केले जाते. जून महिन्यात जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा महापालिकेच्या शाळा व अन्य खासगी शाळेत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचे वाटप केले जाते. शाळा सुरू झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप केले जाते तेव्हा ते मनापासून खूप आनंदी होतात. 

आजतागायत ४0 शाळांमधून २ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले आहे. बहुतांश शाळा संस्थेच्या या उपक्रमाची वाट बघतात. 

फोन करून विचारणा करतात, गरजू विद्यार्थ्यांची संख्या सांगतात. यंदाही हा उपक्रम राबवला जाणार आहे़ एक वही आणि पेन घेऊन यावे, असे सांगण्यात आले आहे.

शिक्षणाला आधार हीच खरी आंबेडकर जयंती : विक्रम गायकवाड - बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, ते मोठ्या पदांवर जावेत, स्वत:बरोबरच कुटुंबाचा आणि समाजाचा उद्धार करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्याचा संदेश दिला आहे. आजही बहुतांश कुटुंबातील पालक हे सकाळी उठून कामाला गेल्याशिवाय रात्री एकवेळचे पोटभर जेवण करू शकत नाहीत अशी अवस्था आहे. केवळ पैसा नसल्याने शिक्षणाची इच्छा असतानाही अनेक विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतात. त्यांना कुठेतरी छोटीशी मदत व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून १४ एप्रिल रोजी अभिवादनासाठी केवळ एक वही आणि पेन घेऊन येण्याचे आवाहन केले जाते. या उपक्रमाला लोकांचा प्रतिसाद वाढत आहे आणि हिच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे असे मला वाटते, अशी माहिती सत्यशोधक परिवाराचे विक्रम गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती