शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

मोहोळ मतदारसंघातील चार गावांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 17:12 IST

सरपंच आले एकत्र;  खराब रस्त्यामुळे निष्पाप लोकांचे बळी गेल्याची भावना

ठळक मुद्देऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या बिकट स्थितीपंढरपूर तालुक्यातील तारापूर, खरसोळी, विटे व पोहोरगाव या चार गावांनी विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला

सुस्ते : ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या बिकट स्थितीमुळे अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला, गावकºयांचे होणारे हाल या कारणावरुन मोहोळ मतदारसंघातील चार गावच्या सरपंचासह ग्रामस्थांनी एकत्र येऊन यंदाच्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

तिºहेमार्गे पंढरपूर-सोलापूर रस्त्यापासून विटे, पोहोरगावपर्यंतच्या सुमारे १५ किमी रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण अनेक वर्षांपासून करण्यात आलेले नाही. या रस्त्याच्या प्रश्नावरून मोहोळ मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील तारापूर, खरसोळी, विटे व पोहोरगाव या चार गावांनी विधानसभामतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. 

पंढरपूरकडे येण्यासाठी सदरच्या चार गावांना एकच रस्ता आहे. गावातील १५०० विद्यार्थी  माध्यमिक व महाविद्यालयाचे शिक्षण घेण्यासाठी सुस्ते व पंढरपूरला जावे लागते; मात्र हा रस्ता खराब असल्याने वेळेत एसटी येत नाही. घरी परत येण्यास वेळ होत असल्याने या भागातील तरुणांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अचानक एखाद्या रुग्णास पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागते; मात्र  रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्याने रुग्ण वेळेत रुग्णालयात दाखल होत नाहीत. अनेकवेळा रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच जीव गमवावा लागतो.

गेल्या वीस वर्षांपासून या चार गावच्या गावातील नागरिकांना या रस्त्यावरून खडतर प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता नूतनीकरणासाठी अनेकवेळा ग्रामपंचायतीने ठराव देऊनसुद्धा कोणत्याही प्रकारची संबंधित विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. तसेच यापूर्वी अनेक नेतेमंडळींकडे रस्त्याची मागणी केली असता, नेत्यांनी ठोस निर्णय घेतला नसल्याने या रस्त्याचे नूतनीकरण झाले नाही. रस्त्यावरून जात असताना अनेकांना कमरेचे, मणक्याचे आजार झाले आहेत. या खराब रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत. या गावच्या सरपंचांनी एकत्र येऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

यावेळी गावचे सरपंच संगीता कांबळे, विट्याचे  सरपंच सिंधुबाई दांडगे, पोहोरगावचे सरपंच लता काळे, तारापूरचे सरपंच समाधान शिंदे , मोहन दांडगे, सौदागर गायकवाड, रेवणसिद्ध पुजारी, विठ्ठल पाटील, बालाजी वाघ, दिगंबर कांबळे, छगन पवार, राजूबापू पाटील, प्रताप पवार, बाबासाहेब पाटील, अमोल पाटील, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब सपाटे, वैभव डोळे, लाखात मुलाणी,  अल्ताफ मुलाणी,  सिद्धेश्वर गायकवाड, संजय परकाळे, दिलीप पवार, शरद पवार, आनंदा पवार, अमर पवार, बंडू पवार, सागर पवार, दादा सलगर, हनुमंत पाटील, श्रीकांत डोळे, सिद्धाराम वाघमोडे, गणेश शिंदे, लक्ष्मण डोंगरे, अरुण परे, बाबासाहेब गवळी आदी उपस्थित होते.

चार गावात ७९०० मतदार- तारापूर २ हजार ५००, खरसोळी १ हजार ९००, विटे १ हजार १०० व पोहोरगाव २ हजार ४०० असे एकूण चार गावचे मतदान ७ हजार ९०० इतके मतदान आहे. 

आम्ही गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. तरी शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. तसेच गेल्या आठवड्यात या रस्त्यावरून विद्यार्थी घेऊन जाणारी शाळेची बस घसरली होती. त्या अनुषंगाने आम्ही या चार गावचे लोक एकत्र येऊन रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.         - दिगंबर कांबळे, खरसोळी

नादुरुस्त रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. तो रस्ता व्हावा यासाठी  मतदानावर बहिष्कार टाकणार आहे. - समाधान शिंदे, सरपंच, तारापूर

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकmohol-acमोहोळpandharpur-acपंढरपूरroad safetyरस्ते सुरक्षाVotingमतदान